शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सरकार पाठिशी असल्याने कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट; धनंजय मुंडे यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 15:02 IST

कोरेगाव - भीमामध्ये झालेला हल्ला कुणी केला ? ते सरकारला माहित आहे. या संपूर्ण दंगलीला राज्य शासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत सरकार पाठिशी असल्यानेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोरेगाव - भीमामध्ये झालेला हल्ला कुणी केला ? ते सरकारला माहित आहे. या संपूर्ण दंगलीला राज्य शासनच जबाबदार आहे सरकार पाठिशी असल्यानेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

नांदेड :कोरेगाव - भीमामध्ये झालेला हल्ला कुणी केला ? ते सरकारला माहित आहे. या संपूर्ण दंगलीला राज्य शासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत सरकार पाठिशी असल्यानेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. हल्लाबोल यात्रेचा दुसर्‍या टप्प्यात मराठवाड्यात २६ सभा घेणार असून यामाध्यमातून शेतकर्‍यांच्या प्रलंबीत प्रश्नाबाबत सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात येणार असल्याचे ही ते म्हणाले.

मुंडे यांनी सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला़ कोरेगाव-भीमा प्रकरणी राज्यशासनाने १ तारखेपूर्वी अनेक बाबी हाताळण्याची आवश्यकता होती. मात्र, त्याकडे कानाडोळा केल्यानेच १ तारखेची र्दुदैवी घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले़ डिसेंबरमध्ये राष्ट्रवादीच्यावतीने हल्लाबोल यात्रा काढण्यात आली होती़ ११ दिवस चाललेल्या या यात्रेच्यामाध्यमातून शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यात आला़ सरकार त्यावेळी पुर्णत: हतबल दिसले़ आमच्या मागण्यानुसार त्यांनी काही निर्णयही घेतले. परंतू, त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही़ त्यामुळेच येत्या १६ तारखेपासून तुळजापूर येथुन हल्लाबोल यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार असूऩ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील २७ विधानसभा मतदार संघात या अंतर्गत २६ सभा घेण्यात येणार आहेत़ या यात्रेत माझ्यासह राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खा़ सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांच्यासह सर्व नेते सहभागी होणार असूऩ यात्रेचा समारोप ३ फेब्रुवारीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढुन होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्रात मोफत वीज का नाही ?शेजारचे तेलंगणा राज्य शेतकर्‍यांना कर्जमाफी देते़ त्यासोबतच २४ तास सलग वीज पुरवठा आणि तो ही मोफत दिला जातो़ तेलंगणा सारख्या छोट्या राज्याला हा निर्णय घेता येतो़ मग महाराष्ट्र शासन या बाबत उदासिन का ? असा सवाल करीत, शेतकर्‍यांना मोफत वीज पुरवठा देण्याची मागणी या यात्रेच्या माध्यमातुन करण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

कापुस उत्पादक शेतकर्‍यांची फसवणुक हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापुस उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी आम्ही केली होती़ यावर केंद्र, राज्य तसेच बी-बियाणे कंपनीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते़ प्रत्यक्षात बी-बियाणे कंपनीने अशी भरपाई देण्यास नकार दिल्याने सरकारने केलेली बोंडअळी बाबतच्या मदतीची घोषणा फसवी असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.

‘मौका सभी को मिलता है ’देश पातळीवर समविचारी पक्षाने एकत्रित यावे असा सूर आहे़ त्यामुळेच नागपूर अधिवेशनावेळी झालेल्या मोर्चाच्या समारोपाची सभा काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या उपस्थितीत एकत्रित घेण्यात आली़ याच्या पुढे जात नांदेड जिल्हा बँक निवडणूकीत आम्ही काँग्रेसच्या सहकार्याने अध्यक्षपद मिळविले़ मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी विश्वासात घेणे गरजेचे आहे़ स्थानिक पातळीवर दुजाभाव होत असेल तर ‘मौका सभी को मिलता है ’अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला इशारा दिला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाGovernmentसरकार