शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

राज्यातील एकमेव कंधारचे लाल कंधारी गोसंवर्धन केंद्र अंबाजोगाईला हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 13:10 IST

लाल कंधारी हा मराठवाडा विभागात सर्वत्र आढळणारा देशी गोवंश आहे. त्याचे मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधार मानले जाते.

कंधार (जि.नांदेड) : राज्यातील एकमेव असलेले कंधार तालुक्यातील गऊळ येथील लाल कंधारी गोसंवर्धन केंद्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

१६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय झाला आहे. लाल कंधारी गोवंश प्रजातीचे जतन व संवर्धन करण्यासाठी अंबेजोगाई तालुक्यातील मौजे साकुड येथे पशुसंवर्धन विभागाची ८१ हेक्टर जमीन प्रक्षेत्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. लाल कंधारी हा मराठवाडा विभागात सर्वत्र आढळणारा देशी गोवंश आहे. त्याचे मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधार मानले जाते. कंधार, लोहा, मुखेड, बिलोली तसेच परभणी जिल्ह्यातील पालम, गंगाखेड तालुक्यात या गायीचे पालन करतात. संपूर्ण लाल रंग, मस्तक मध्यम आकाराचे, डोळे लांबट व काळे, नाकपुडी काळी, लहानसर, दुधाची शीर स्पष्ट व सरळ असते. कातडी अत्यंत चमकदार व खूर करड्या रंगाचे व टणक असतात.

परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता गफूर व माजी आमदार केशवराव धोंडगे यांनी भारत सरकारकडे पाठपुरावा करून लालकंधारी जात ही इतर पशुधनापेक्षा वेगळी असल्याची मान्यता मिळविली. या पशुधनाचा शास्त्रीय पायाभूत विकास व्हावा आणि पशु मालकाला आर्थिक स्त्रोत उपलब्ध व्हावा, यासाठी राज्यातील एकमेव लाल कंधारी गोसंवर्धन केंद्राची स्थापना गऊळ येथे करण्यात आली. त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. शंकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. लाल कंधारी या देशी गोवंशाचे मूळ पैदास क्षेत्र मराठवाड्यात असून, सदर गोवंशाचे अस्तित्व मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यात आहे. या स्थानिक जातींचे वैशिष्ट्ये म्हणजे सदर जाती या दूध उत्पादन व नर पशुधन शेती कामासाठी उपयुक्त आहेत.

मुख्यमंत्र्यांना भेटणारजिल्ह्याचे वैभव असलेले लाल कंधारी गोसंवर्धन केंद्र कै. भाई डॉ. केशवरावजी धोंडगे यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्याचे काम केले. तब्बल ९ ते १० वेळेस येथील गाय व वळूला राष्ट्रीयस्तरावर गौरविण्यात आले. अशी पार्श्वभूमी असल्याने कंधार तालुक्यातील गऊळ येथे संवर्धन केंद्र स्थापन केले होते; पण पाहिजे तेवढा निधी मिळाला नव्हता. आता हे केंद्रच हलविण्यात आले. त्यांचा मी निषेध करतो. याकरता पाठपुरावा करणारा असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पशुसंवर्धन मंत्री यांची भेट घेणार आहे. - ॲड. मुक्तेश्वर केशवराव धोंडगे, शिवसेना नेते.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडDhananjay Mundeधनंजय मुंडे