शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कंधारचा आरोग्य विभाग औषधीच्या दुष्काळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:58 IST

शहरासह ग्रामीण भागातील सामान्य, गोरगरीब रूग्ण व नातेवाईक यांची उपचारासाठी मोठी परवड सुरु असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. आरोग्य विभाग औषधी दुष्काळात अडकला आहे.

ठळक मुद्देसामान्यांच्या खिशाला कात्रीखाजगी औषधी दुकानदारांची चांदी

कंधार : शहरासह ग्रामीण भागातील सामान्य, गोरगरीब रूग्ण व नातेवाईक यांची उपचारासाठी मोठी परवड सुरु असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. आरोग्य विभाग औषधी दुष्काळात अडकला आहे. साध्या आजाराचा उपचार घेताना सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. मात्र, खाजगी औषधी दुकानदाराची चांदी होत असल्याचे रूग्ण व नातेवाईक उघडपणे बोलत आहेत.आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. आणि शहरात ग्रामीण रूग्णालय निर्माण करण्यात आले. परंतु, हे आरोग्य सेवेचे केंद्र मात्र सतत नानाविध कारणांनी चर्चेत असतात. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाणवा, अस्वच्छता आदींने रूग्णांची होणारी हेळसांड चर्चेचा विषय ठरतो. आता गत काही महिन्यांपासून आरोग्य विभागात औषधीतुटवडा असल्याने रूग्ण व नातेवाईकांची दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे.उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात गत काही महिन्यांपासून वातावरणबदलाने सर्दी, ताप, खोकला आदींचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच स्थिती शहरातील ग्रामीण रूग्णालयात आहे. परंतु, पॅरासेटमल, कफसिरफ, सेट्रीज, सेट्रान अशी औषधीची वाणवा आहे. मलमपट्टीचे साहित्य व औषधी नाहीत. ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांना रूग्ण व नातेवाईकांच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे.तालुक्यातील बारूळ, कुरूळा, उस्माननगर, पेठवडज, पानशेवडी या पाच आरोग्य केंद्रांत बाह्यरूग्ण विभागात प्रतिदिन ६०० ते ७०० रूग्ण उपचारासाठी येतात. आता खिशात दमडी असेल तरच या केंद्रात यावे लागते. अशी स्थिती झाली आहे. मलेरियाची औषधी नसल्याने नागरिकांचा रोष सहन करण्याचा प्रसंग कर्मचाºयांवर आला आहे. मुळात सामान्य कुटुंबातील नागरिक येथे येतात. साधा आजार असला तरी कंधारला उपचारासाठी पाठविले जात आहे. पण आगीतून फुफाट्यात अशी गत कंधारात आहे. ‘नाव मोठे लक्षण खोटे’ असा औषधी तुटवड्याचा ग्रामीण रूग्णालयात अनुभव घ्यावा लागतो आहे. एक तर स्वखर्चाने औषधी खरेदी करावी लागतात, अन्यथा नांदेडला पाठवले जाते. असा उपचार प्रवास खडतर झाला आहे.पाच प्राथमिक आरोग्य केंद्राला कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे वार्षिक उद्दिष्ट १ हजार ३०० पेक्षा अधिक असते. परंतु, कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेच्या अत्यावश्यक औषधीचासुद्धा तुटवडा असल्याने हे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार? असा सवाल आहे. सर्दी, ताप, खोकला या औषधींचा दुष्काळ असताना प्रतिजैविके औषधी तुटवड्याची त्यात भर आहे. रूग्णकल्याण समितीच्या निधीतून औषधीची सोय तोकडेपणाने करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले आहे.तालुक्यातील खरीप हंगाम पावसाअभावी होरपळून गेला आहे. परंतु दुष्काळी नोंद होण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नागरिक खरीप हंगामाचा खर्च निघत नसल्याने हवालदिल झाला आहे. परंतु, आरोग्य विभाग औषधी दुष्काळात अडकल्याने नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. कंधार तालुक्यातील लोकप्रतिनिधींना आरोग्य समस्येकडे लक्ष देता येईल का? असा खोचक सवाल सामान्य नागरिकांतून केला जात आहे. राजकीय शह काटशहाचे राजकारण तापले असताना आरोग्य विषय गौण आहे का? असा संतप्त सवाल केला जात आहे.

राज्यपातळीवरुन औषधींचा पुरवठा होईना !राज्य व जिल्हा पातळीवरून औषधींचा पुरवठा पुरेसा होत नाही. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. परंतु, रूग्णकल्याण समितीच्या निधीतून खर्च करत औषधी उपलब्ध केली जात आहेत आणि रूग्णसेवा केली जात आहे -डॉ. एस.पी.ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी, कंधार

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यMedicalवैद्यकीयmedicineऔषधं