शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

कंधारचा आरोग्य विभाग औषधीच्या दुष्काळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:58 IST

शहरासह ग्रामीण भागातील सामान्य, गोरगरीब रूग्ण व नातेवाईक यांची उपचारासाठी मोठी परवड सुरु असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. आरोग्य विभाग औषधी दुष्काळात अडकला आहे.

ठळक मुद्देसामान्यांच्या खिशाला कात्रीखाजगी औषधी दुकानदारांची चांदी

कंधार : शहरासह ग्रामीण भागातील सामान्य, गोरगरीब रूग्ण व नातेवाईक यांची उपचारासाठी मोठी परवड सुरु असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. आरोग्य विभाग औषधी दुष्काळात अडकला आहे. साध्या आजाराचा उपचार घेताना सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. मात्र, खाजगी औषधी दुकानदाराची चांदी होत असल्याचे रूग्ण व नातेवाईक उघडपणे बोलत आहेत.आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. आणि शहरात ग्रामीण रूग्णालय निर्माण करण्यात आले. परंतु, हे आरोग्य सेवेचे केंद्र मात्र सतत नानाविध कारणांनी चर्चेत असतात. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाणवा, अस्वच्छता आदींने रूग्णांची होणारी हेळसांड चर्चेचा विषय ठरतो. आता गत काही महिन्यांपासून आरोग्य विभागात औषधीतुटवडा असल्याने रूग्ण व नातेवाईकांची दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे.उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात गत काही महिन्यांपासून वातावरणबदलाने सर्दी, ताप, खोकला आदींचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच स्थिती शहरातील ग्रामीण रूग्णालयात आहे. परंतु, पॅरासेटमल, कफसिरफ, सेट्रीज, सेट्रान अशी औषधीची वाणवा आहे. मलमपट्टीचे साहित्य व औषधी नाहीत. ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांना रूग्ण व नातेवाईकांच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे.तालुक्यातील बारूळ, कुरूळा, उस्माननगर, पेठवडज, पानशेवडी या पाच आरोग्य केंद्रांत बाह्यरूग्ण विभागात प्रतिदिन ६०० ते ७०० रूग्ण उपचारासाठी येतात. आता खिशात दमडी असेल तरच या केंद्रात यावे लागते. अशी स्थिती झाली आहे. मलेरियाची औषधी नसल्याने नागरिकांचा रोष सहन करण्याचा प्रसंग कर्मचाºयांवर आला आहे. मुळात सामान्य कुटुंबातील नागरिक येथे येतात. साधा आजार असला तरी कंधारला उपचारासाठी पाठविले जात आहे. पण आगीतून फुफाट्यात अशी गत कंधारात आहे. ‘नाव मोठे लक्षण खोटे’ असा औषधी तुटवड्याचा ग्रामीण रूग्णालयात अनुभव घ्यावा लागतो आहे. एक तर स्वखर्चाने औषधी खरेदी करावी लागतात, अन्यथा नांदेडला पाठवले जाते. असा उपचार प्रवास खडतर झाला आहे.पाच प्राथमिक आरोग्य केंद्राला कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे वार्षिक उद्दिष्ट १ हजार ३०० पेक्षा अधिक असते. परंतु, कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेच्या अत्यावश्यक औषधीचासुद्धा तुटवडा असल्याने हे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार? असा सवाल आहे. सर्दी, ताप, खोकला या औषधींचा दुष्काळ असताना प्रतिजैविके औषधी तुटवड्याची त्यात भर आहे. रूग्णकल्याण समितीच्या निधीतून औषधीची सोय तोकडेपणाने करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले आहे.तालुक्यातील खरीप हंगाम पावसाअभावी होरपळून गेला आहे. परंतु दुष्काळी नोंद होण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नागरिक खरीप हंगामाचा खर्च निघत नसल्याने हवालदिल झाला आहे. परंतु, आरोग्य विभाग औषधी दुष्काळात अडकल्याने नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. कंधार तालुक्यातील लोकप्रतिनिधींना आरोग्य समस्येकडे लक्ष देता येईल का? असा खोचक सवाल सामान्य नागरिकांतून केला जात आहे. राजकीय शह काटशहाचे राजकारण तापले असताना आरोग्य विषय गौण आहे का? असा संतप्त सवाल केला जात आहे.

राज्यपातळीवरुन औषधींचा पुरवठा होईना !राज्य व जिल्हा पातळीवरून औषधींचा पुरवठा पुरेसा होत नाही. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. परंतु, रूग्णकल्याण समितीच्या निधीतून खर्च करत औषधी उपलब्ध केली जात आहेत आणि रूग्णसेवा केली जात आहे -डॉ. एस.पी.ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी, कंधार

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यMedicalवैद्यकीयmedicineऔषधं