शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

येसगीची शाळा आता कायमची बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:05 IST

बिलोली तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या जुन्या येसगी येथील जिल्हा परिषद शाळा निम्मा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर बंद करण्याचा निर्णय पुणे येथील शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जि. प़ शिक्षण विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसाननिम्मा शेैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर शाळेचे दरवाजे होणार बंद

सगरोळी : बिलोली तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या जुन्या येसगी येथील जिल्हा परिषद शाळा निम्मा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर बंद करण्याचा निर्णय पुणे येथील शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जि. प़ शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र येसगी येथील शाळेच्या आसपास ४ कि़ मी़ अंतरापर्यंत एकही शाळा उपलब्ध नसल्याने या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या निर्णयाविरूद्ध येथील नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.येसगी येथील शाळा बंद न करता शाळा सुरू ठेवावी, अशी मागणी गावक-यांच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत चार जिल्हा परिषद सदस्य आणि आ़सुभाष साबणे यांनी जिल्हा परिषद आणि शासनाकडे येथील विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांच्याकडेही निवेदन दिले होते. सीमावर्ती भागांच्या माध्यमातूनही याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता.महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवरील बिलोली तालुक्यातील येसगी जुने हे अंतिम टोकाचे गाव आहे. या गावालगत मांजरा नदी वाहते. १९८३ साली येथील मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे या गावातील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या पुनर्वसनात अनेक कुटुंबांनी तेथेच राहणे पसंत केल्यामुळे अर्ध्याच गावाचे पुनर्वसन झाले असून अनेक कुटुंब तेथेच राहिले आहेत़ येसगी जुने येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. येथील शिक्षक प्रामाणिक प्रयत्न करून विद्यार्थ्यांसाठी झटत आहेत़ असे असताना विद्यार्थीसंख्या वाढल्यावर शाळा बंद करण्याचे पातक करण्यात आले.गावाचे पुनर्वसन झाल्यामुळे व वाढत्या इंग्रजी शाळांमुळे या शाळेची विद्यार्थीसंख्या कमी होत गेली. या शाळेतील विद्यार्थी संख्येच्या निकषावरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू होऊन ४ महिन्यानंतर शाळा बंद करण्याचा निर्णय घेवून पत्र शाळेस पाठविले आहे. तसेच शिक्षकांची अन्यत्र बदली करण्यात आली. शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे़लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधलेयेसगी (जुने) या गावाच्या आसपास तीन ते चार किलोमीटर अंतराच्या आत दुसरी शाळा नाही. त्यामुळे येथील जि.प़ची शाळा सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत सीमावर्ती भागाचे गोविंद मुंडकर, गंगाधर प्रचंड, राजू पाटील शिंदे, राजेंद्र जामनोर, व्यंकटराव पाटील सगरोळीकर, चंद्रकांत लोखंडे, हनुमंत कामशेटे यांनी हा विषय वरिष्ठ अधिकाºयांकडे प्रभावीपणे मांडला होता. याकडे आमदार आणि जिल्हा परिषदेचे चार सदस्य यांचे लक्ष वेधण्यात आले होते.

शाळा बंदचा निर्णय अगोदर का नाही ?विशेष म्हणजे, गतवर्षी या शाळेतील रिक्त असलेले एक शिक्षकाचे पद शिक्षण विभागाच्या वतीने भरण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी मोफत कपडे वाटप करण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती मागवून शालेय गणवेशासाठीचे पैसे शाळेच्या बँक खात्यात जमाही करण्यात आले आहेत. जर शिक्षण विभागाला येथील शाळा बंद करायचीच होती तर सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीसच शाळा बंदचा निर्णय न घेता शाळा सुरू होऊन ४ महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटल्यावर बंदचा निर्णय घेतला ? व तसेच येथील शाळा बंद करायचीच होती तर गतवर्षी रिक्त असलेले एका शिक्षकाचे पद यावर्षी का भरण्यात आले? असे प्रश्न गावक-यांना पडले आहेत.

गावक-यांत असंतोषसीमावर्ती भागाचा तेलंगणा समावेशाचा प्रश्न उपस्थित झालेला असताना जिल्हाधिकारी विकासा- संदर्भात चर्चा करीत असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या येसगी (जुने) येथील जि़ प़ शाळा बंद करण्याचे आदेश देत आहेत. त्यामुळे गावक-यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाEducationशिक्षण