शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इसापूरचे पाणी अनेक गावांपर्यंत पोहोचलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:07 IST

या भागातील शेतकरी इसापूर धरणाचे पाणी कॅनॉलला आज येईल, उद्या येईल याच प्रतीक्षेत आहेत़ परंतु तळणी कालव्याला इसापूर धरणाचे पाणी सुटून १५ दिवस उलटले तरी अद्याप या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले नाही़

निवघा बाजार : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणाचेपाणी परिसरातील शिरड, येळंब, धानोरा गावच्या शेतीपर्यंत पोहोचलेच नसल्याने मागील १५ दिवसांपासून या भागातील शेतकरी इसापूर धरणाचेपाणी कॅनॉलला आज येईल, उद्या येईल याच प्रतीक्षेत आहेत़ परंतु तळणी कालव्याला इसापूर धरणाचे पाणी सुटून १५ दिवस उलटले तरी अद्याप या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले नाही़तर इसापूर धरणातून पाणी सोडण्याचा कालावधी संपण्याची वेळ आल्याने शिरड, येळंब, धानोरा शिवारात इसापूर धरणाचे पाणी येण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत़इसापूर धरणात यावर्षी ६९ टक्के पाणीसाठा असल्याने या वेळेस आपणापर्यंत कॅनॉलला पाणी येईल म्हणून शेतक-यांनी रबी हंगामातील हरभरा, गहू पीक पेरणी करण्यासाठी जमीन तयार केली आहे़इसापूरच्या पाण्यासाठी शेतक-यांना अनेक दिवस संघर्षही करावा लागला होता़ जवळपास २२ दिवस शेतक-यांनी पैनगंगेच्या पात्रात आंदोलन केले होते़ पंधरा दिवसांपूर्वी तळणी कालव्याला पाणी सुटले़ तेव्हापासून या भागातील शेतकरी चार दिवसांत येईल, आठ दिवसांत पाणी येईल म्हणून जमीन भिजविण्याकरिता लागणारे पाईप, स्प्रिंकलर, इंजीन आदी साहित्य घेवून रात्रीला शेतात शेतकरी जागरण करीत आहेत़परंतु अद्यापही परिसरातील अनेक गावांपर्यंत हे पाणी पोहोचलेच नाही़ पाण्याच्या मार्गावरही अनेक शेतक-यांना या पाण्याचा लाभ घेताच आला नाही़ दुष्काळामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकºयांची मात्र पंचाईत झाली आहे़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरणFarmerशेतकरी