शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात २४ तास राहणार इंटरनेट सेवा बंद; जिल्हाधिका-यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 15:27 IST

जिल्ह्यात सोशल मिडीयावरून अफवा पसरवू नये व कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा शुक्रवार सकाळी १० वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हधिकारी यांनी दिले आहेत.

नांदेड : महाराष्ट्र बंद दरम्यान बुधवारी जिल्ह्यात भीमा कोरेगाव येथील घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. हदगाव येथील पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात वातावरण आणखी चिघळले आहे. यामुळे जिल्ह्यात सोशल मिडीयावरून अफवा पसरवू नये व कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा शुक्रवार सकाळी १० वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हधिकारी यांनी दिले आहेत.  

हदगाव येथे पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील वातावरण आणखी शांत झाले नाही. याबाबत सोशल मिडियावरून अफवा पसरवू नयेत व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्याधिकारी अरुण डोंगरे यांनी इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

शांतता समितीची बैठक ठरली वादळी

जिल्हाधिकारी कार्यालयात बचतभवन येथे बुधवारी सायंकाळी झालेली शांतता समितीची बैठक वादळी ठरली़ आ.डी.पी.सावंत, आ.हेमंत पाटील यांच्यासह महापौर शीलाताई भवरे, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, भदंत पैय्याबोधी आदींनी जिल्हाधिकार्‍यांसमोर प्रशासनाला धारेवर धरले़ या बैठकीत पोलिसांनी अतिरेकी बळाचा वापर करत महिला, मुले, वृद्धांना मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध केला. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, मात्र घरातील चिमुकली मुले, महिला, वृद्धांना गुन्हेगाराप्रमाणे मारहाण कशासाठी, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला. 

टॅग्स :InternetइंटरनेटNandedनांदेडSocial Mediaसोशल मीडिया