शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

पालक सचिवांनी केली पिकांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:02 IST

पालकसचिव तथा राज्याचे जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी मुखेड तालुक्यातील सलगरा, अखरगा येथील शिवारात भेट देवून पिकांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा नियोजन भवन येथे बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांतील कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देनियोजन भवनमध्ये बैठकटंचाई गावांतील कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पालकसचिव तथा राज्याचे जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी मुखेड तालुक्यातील सलगरा, अखरगा येथील शिवारात भेट देवून पिकांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा नियोजन भवन येथे बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांतील कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.डवले यांनी मुखेड तालुक्यातील सलगरा, आखरगा शिवारात जावून पीकपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आ. डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदींसह अधिकारी, पदाधिका-यांची उपस्थिती होती. सलगरा येथे ज्वारी, कापूस, तूर पिकांची पाहणी केल्यानंतर डवले यांनी शेतकºयांशीही संवाद साधून पिकांच्या नुकसानीबाबतची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आढावा बैठकीत अधिका-यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, पाटबंधारे मंडळाचे एस. बी. सब्बीनवार, नांदेड पाटबंधारे विभागाचे आर. एम. देशमुख आदींसह अधिका-यांची उपस्थिती होती.

  • राष्टÑीय पेयजल कार्यक्रमातील कामांना वेग देण्याची आवश्यकता व्यक्त करीत टंचाई गावांतील कामांना प्राधान्याने पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याने या अभियानातंर्गतची तसेच प्रत्येक योजनांची कामे येत्या डिसेंबरपर्यत पूर्ण करण्याचे निर्देश देत जलयुक्त शिवार कामाचा त्यांनी आढावा घेतला. मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मनरेगा योजनांचा फायदा शेतक-यांना झाला पाहिजे यासाठी अधिकारी, कर्मचा-यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डवले यांनी केले.

नांदेड जिल्ह्यात यंदा सुमारे ७९ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली असली तरी काही तालुक्यांत अत्यल्प पाऊस झालेला आहे. या ठिकाणची पिके वाळून गेल्याने शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :NandedनांदेडagricultureशेतीFarmerशेतकरी