शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षापेक्षा यंदा वाढले उसाचे क्रशिंग; अर्ध्या मराठवाड्यात ऊस गाळपाची कोटीची उड्डाणे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 13:02 IST

यंदाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात; मागील तीन-चार वर्षांत पाऊसमान चांगले राहिल्याने उसाचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

नांदेड : मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम आता संपत आले असून, आतापर्यंत या साखर कारखान्यांनी १ कोटी ५ लाख ६० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. गतवर्षाच्या तुलनेत ऊस गाळप वाढल्याने शेतकऱ्यांसमोरील प्रश्न मिटला आहे.

मागील तीन-चार वर्षांत पाऊसमान चांगले राहिल्याने उसाचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी उसाचे उत्पादन वाढले आहे. पाण्याची उपलब्धता, सिंचनाच्या वाढत्या सुविधा आणि मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उभा ऊस गाळप करण्याचे आव्हान साखर कारखान्यांसमोर होते.

येथील प्रादेशिक उपसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेडसह परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांचा कारभार पाहिला जातो. या कार्यालयाच्या अंतर्गत एकूण ३० साखर कारखाने असून, त्यापैकी २८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. या चार जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी २ एप्रिलपर्यंत १ कोटी ५ लाख ६० हजार २६३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक ऊस गाळप करण्यात आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांची चिंता दूर झाली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती गाळपउसाच्या गाळपात लातूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून, या जिल्ह्यात ४३ लाख ७७ हजार १०६ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. त्या खालोखाल परभणी जिल्ह्यात २८ लाख ९४ हजार ९८३ मे. टन, नांदेड १७ लाख ७४ हजार ४४१ मे. टन आणि हिंगोली जिल्ह्यात १५ लाख ५६ हजार ५५० मे. टन उसाचे गाळप झाले आहे.

जिल्हानिहाय साखर कारखानेपरभणी : ७हिंगोली : ५नांदेड : ६लातूर : १२

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNandedनांदेडFarmerशेतकरी