शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

गतवर्षापेक्षा यंदा वाढले उसाचे क्रशिंग; अर्ध्या मराठवाड्यात ऊस गाळपाची कोटीची उड्डाणे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 13:02 IST

यंदाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात; मागील तीन-चार वर्षांत पाऊसमान चांगले राहिल्याने उसाचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

नांदेड : मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम आता संपत आले असून, आतापर्यंत या साखर कारखान्यांनी १ कोटी ५ लाख ६० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. गतवर्षाच्या तुलनेत ऊस गाळप वाढल्याने शेतकऱ्यांसमोरील प्रश्न मिटला आहे.

मागील तीन-चार वर्षांत पाऊसमान चांगले राहिल्याने उसाचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी उसाचे उत्पादन वाढले आहे. पाण्याची उपलब्धता, सिंचनाच्या वाढत्या सुविधा आणि मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उभा ऊस गाळप करण्याचे आव्हान साखर कारखान्यांसमोर होते.

येथील प्रादेशिक उपसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेडसह परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांचा कारभार पाहिला जातो. या कार्यालयाच्या अंतर्गत एकूण ३० साखर कारखाने असून, त्यापैकी २८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. या चार जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी २ एप्रिलपर्यंत १ कोटी ५ लाख ६० हजार २६३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक ऊस गाळप करण्यात आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांची चिंता दूर झाली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती गाळपउसाच्या गाळपात लातूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून, या जिल्ह्यात ४३ लाख ७७ हजार १०६ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. त्या खालोखाल परभणी जिल्ह्यात २८ लाख ९४ हजार ९८३ मे. टन, नांदेड १७ लाख ७४ हजार ४४१ मे. टन आणि हिंगोली जिल्ह्यात १५ लाख ५६ हजार ५५० मे. टन उसाचे गाळप झाले आहे.

जिल्हानिहाय साखर कारखानेपरभणी : ७हिंगोली : ५नांदेड : ६लातूर : १२

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNandedनांदेडFarmerशेतकरी