शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

एका राज्यात तोफा डागल्या जाताहेत अन् प्रधानमंत्री आरत्या करत फिरताहेत: संजय राऊत

By अविनाश पाईकराव | Updated: September 12, 2024 16:26 IST

चीनची घुसखोरी, मणिपूर, लडाख, अरुणाचल प्रदेश येथील प्रश्नावर प्रधानमंत्री, गृहमंत्री का बोलत नाहीत : संजय राऊत

नांदेड: चीनने भारताचा चार हजार किलोमीटर भाग गिळकृंत केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्येही ६५ कि.मी. आतपर्यंत चीनच्या सैन्याने घुसखोरी केली आहे. मणिपूरमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. असे असताना हे सरकार राजकारणात अडकून पडले असून देशाचे पंतप्रधान आरत्या करत फिरत आहेत, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

लोहा येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते गुरुवारी नांदेड येथे आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन याबाबत बोलत असले तरी आम्ही महिनाभरापासून हा विषय मांडत आहोत. मणिपूर हातातून गेले आहे. लडाखचा अर्धा भाग चीनने ताब्यात घेतला असून तेथे गावं वसवले आहे. या देशाला संरक्षण मंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री आहेत का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मणिपूरची जनता सुद्धा देशाची नागरिक आहे. लडाखचे सोनम वांगचू हे काही प्रश्न घेऊन लडाखपासून दिल्लीला चालत निघाले आहेत. त्या प्रश्नामध्ये चीनची घुसखोरी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण या प्रश्नावर भाजपाचे नेते, प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री बोलणार नाहीत. तर ते आमच्यावर बोलतील. आमच्यावर टीका करतील. मणिपूर, लडाख, अरुणाचल प्रदेश येथील प्रश्नावर ते का बोलत नाहीत. आमचे ५६ इंची सरकार गप्प बसले असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली.

एका राज्यात तोफा डागल्या जाताहेतदेशात फाळणीच्या वेळी जी परिस्थिती होती. त्यापेक्षा भयंकर परिस्थिती मणिपूर आसाममध्ये निर्माण झालेली आहे. एका राज्यात मिसाईल चालवले जाताहेत, ड्रोन हल्ले केले जाताहेत. तोफा डागल्या जाताहेत. राज्यपाल पळून जाताहेत. १९६१ ला जेव्हा चीनसोबत युद्ध झाले तेव्हा ईशान्येकडील राज्यातील सरकार पळून गेले. त्याचप्रमाणे आसाममध्ये देखील राज्यपाल आणि सरकार पळून गेले असल्याचेही खासदार संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदी