शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

एका राज्यात तोफा डागल्या जाताहेत अन् प्रधानमंत्री आरत्या करत फिरताहेत: संजय राऊत

By अविनाश पाईकराव | Updated: September 12, 2024 16:26 IST

चीनची घुसखोरी, मणिपूर, लडाख, अरुणाचल प्रदेश येथील प्रश्नावर प्रधानमंत्री, गृहमंत्री का बोलत नाहीत : संजय राऊत

नांदेड: चीनने भारताचा चार हजार किलोमीटर भाग गिळकृंत केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्येही ६५ कि.मी. आतपर्यंत चीनच्या सैन्याने घुसखोरी केली आहे. मणिपूरमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. असे असताना हे सरकार राजकारणात अडकून पडले असून देशाचे पंतप्रधान आरत्या करत फिरत आहेत, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

लोहा येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते गुरुवारी नांदेड येथे आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन याबाबत बोलत असले तरी आम्ही महिनाभरापासून हा विषय मांडत आहोत. मणिपूर हातातून गेले आहे. लडाखचा अर्धा भाग चीनने ताब्यात घेतला असून तेथे गावं वसवले आहे. या देशाला संरक्षण मंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री आहेत का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मणिपूरची जनता सुद्धा देशाची नागरिक आहे. लडाखचे सोनम वांगचू हे काही प्रश्न घेऊन लडाखपासून दिल्लीला चालत निघाले आहेत. त्या प्रश्नामध्ये चीनची घुसखोरी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण या प्रश्नावर भाजपाचे नेते, प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री बोलणार नाहीत. तर ते आमच्यावर बोलतील. आमच्यावर टीका करतील. मणिपूर, लडाख, अरुणाचल प्रदेश येथील प्रश्नावर ते का बोलत नाहीत. आमचे ५६ इंची सरकार गप्प बसले असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली.

एका राज्यात तोफा डागल्या जाताहेतदेशात फाळणीच्या वेळी जी परिस्थिती होती. त्यापेक्षा भयंकर परिस्थिती मणिपूर आसाममध्ये निर्माण झालेली आहे. एका राज्यात मिसाईल चालवले जाताहेत, ड्रोन हल्ले केले जाताहेत. तोफा डागल्या जाताहेत. राज्यपाल पळून जाताहेत. १९६१ ला जेव्हा चीनसोबत युद्ध झाले तेव्हा ईशान्येकडील राज्यातील सरकार पळून गेले. त्याचप्रमाणे आसाममध्ये देखील राज्यपाल आणि सरकार पळून गेले असल्याचेही खासदार संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदी