शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या दुष्काळाचा आढावा पालकमंत्री घेणार आता मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:54 IST

एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बैठक बोलावली असून नांदेडच्या दुष्काळाचा आढावा तिथे घेतला जाणार आहे.

ठळक मुद्दे२७ मेची बैठक रद्द २८ रोजी अधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले

नांदेड : एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बैठक बोलावली असून नांदेडच्यादुष्काळाचा आढावा तिथे घेतला जाणार आहे.राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. जिल्ह्याचे पालकसचिव आणि पालकमंत्र्यांनी थेट जिल्ह्यात जावून पाहणी करुन दुष्काळाचा आढावा घ्यावा, असेही नमूद करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याचे पालकसचिव एकनाथ डवले यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. काही दुष्काळी भागातही त्यांनी पाहणी केली. तसेच प्रशासकीय पातळीवरही आढावा घेतला.पालकमंत्री रामदास कदम यांचाही दौरा २७ मे रोजी नियोजित होता. नांदेडमध्ये ते दुष्काळी परिस्थितीचा आढावा तसेच जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेणार होते. मात्र आता ऐनवेळी त्यांचा नांदेड दौरा रद्द झाला आहे.जिल्हा दुष्काळासंदर्भातील बैठक आता २७ ऐवजी २८ मे रोजी नांदेड ऐवजी मुंबई येथे मंत्रालयात घेतली जाणार आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.एकूणच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना पालकमंत्र्यांनी स्वत: जिल्ह्यात दुष्काळी भागांना भेटी देवून पाहणी करणे तसेच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनाच्या संदर्भात प्रशासनाला आदेशित करणे आवश्यक आहे. मात्र असे न होता पालकमंत्र्यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती सोडून २८ मे रोजी अधिका-यांना मुंबईला जावे लागणार आहे.या बैठकीसाठी २७ मे रोजीच जिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, जि.प.चे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यासह दुष्काळी तालुके असलेल्या देगलूर, मुखेड तसेच लोहा आणि नांदेड तहसीलदारांनाही मुंबईकडे रवाना व्हावे लागणार आहे.शेतक-यांची चिंता वाढली, नांदेड शहरही तहानलेलेचराज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांची वर्तवला आहे. ८ जूनपर्यंत तरी मान्सूनपूर्वीचा पाऊस राज्यात होणार नाही. त्यामुळे तापमानाचा पारा वाढताच राहणार आहे. याचा फटका पाणी टंचाई असलेल्या भागांना बसणार आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णूपुरी प्रकल्प कोरडा पडला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळMantralayaमंत्रालयRamdas Kadamरामदास कदम