शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नांदेडच्या दुष्काळाचा आढावा पालकमंत्री घेणार आता मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:54 IST

एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बैठक बोलावली असून नांदेडच्या दुष्काळाचा आढावा तिथे घेतला जाणार आहे.

ठळक मुद्दे२७ मेची बैठक रद्द २८ रोजी अधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले

नांदेड : एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बैठक बोलावली असून नांदेडच्यादुष्काळाचा आढावा तिथे घेतला जाणार आहे.राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. जिल्ह्याचे पालकसचिव आणि पालकमंत्र्यांनी थेट जिल्ह्यात जावून पाहणी करुन दुष्काळाचा आढावा घ्यावा, असेही नमूद करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याचे पालकसचिव एकनाथ डवले यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. काही दुष्काळी भागातही त्यांनी पाहणी केली. तसेच प्रशासकीय पातळीवरही आढावा घेतला.पालकमंत्री रामदास कदम यांचाही दौरा २७ मे रोजी नियोजित होता. नांदेडमध्ये ते दुष्काळी परिस्थितीचा आढावा तसेच जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेणार होते. मात्र आता ऐनवेळी त्यांचा नांदेड दौरा रद्द झाला आहे.जिल्हा दुष्काळासंदर्भातील बैठक आता २७ ऐवजी २८ मे रोजी नांदेड ऐवजी मुंबई येथे मंत्रालयात घेतली जाणार आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.एकूणच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना पालकमंत्र्यांनी स्वत: जिल्ह्यात दुष्काळी भागांना भेटी देवून पाहणी करणे तसेच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनाच्या संदर्भात प्रशासनाला आदेशित करणे आवश्यक आहे. मात्र असे न होता पालकमंत्र्यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती सोडून २८ मे रोजी अधिका-यांना मुंबईला जावे लागणार आहे.या बैठकीसाठी २७ मे रोजीच जिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, जि.प.चे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यासह दुष्काळी तालुके असलेल्या देगलूर, मुखेड तसेच लोहा आणि नांदेड तहसीलदारांनाही मुंबईकडे रवाना व्हावे लागणार आहे.शेतक-यांची चिंता वाढली, नांदेड शहरही तहानलेलेचराज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांची वर्तवला आहे. ८ जूनपर्यंत तरी मान्सूनपूर्वीचा पाऊस राज्यात होणार नाही. त्यामुळे तापमानाचा पारा वाढताच राहणार आहे. याचा फटका पाणी टंचाई असलेल्या भागांना बसणार आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णूपुरी प्रकल्प कोरडा पडला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळMantralayaमंत्रालयRamdas Kadamरामदास कदम