शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

नांदेडच्या दुष्काळाचा आढावा पालकमंत्री घेणार आता मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:54 IST

एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बैठक बोलावली असून नांदेडच्या दुष्काळाचा आढावा तिथे घेतला जाणार आहे.

ठळक मुद्दे२७ मेची बैठक रद्द २८ रोजी अधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले

नांदेड : एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बैठक बोलावली असून नांदेडच्यादुष्काळाचा आढावा तिथे घेतला जाणार आहे.राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. जिल्ह्याचे पालकसचिव आणि पालकमंत्र्यांनी थेट जिल्ह्यात जावून पाहणी करुन दुष्काळाचा आढावा घ्यावा, असेही नमूद करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याचे पालकसचिव एकनाथ डवले यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. काही दुष्काळी भागातही त्यांनी पाहणी केली. तसेच प्रशासकीय पातळीवरही आढावा घेतला.पालकमंत्री रामदास कदम यांचाही दौरा २७ मे रोजी नियोजित होता. नांदेडमध्ये ते दुष्काळी परिस्थितीचा आढावा तसेच जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेणार होते. मात्र आता ऐनवेळी त्यांचा नांदेड दौरा रद्द झाला आहे.जिल्हा दुष्काळासंदर्भातील बैठक आता २७ ऐवजी २८ मे रोजी नांदेड ऐवजी मुंबई येथे मंत्रालयात घेतली जाणार आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.एकूणच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना पालकमंत्र्यांनी स्वत: जिल्ह्यात दुष्काळी भागांना भेटी देवून पाहणी करणे तसेच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनाच्या संदर्भात प्रशासनाला आदेशित करणे आवश्यक आहे. मात्र असे न होता पालकमंत्र्यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती सोडून २८ मे रोजी अधिका-यांना मुंबईला जावे लागणार आहे.या बैठकीसाठी २७ मे रोजीच जिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, जि.प.चे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यासह दुष्काळी तालुके असलेल्या देगलूर, मुखेड तसेच लोहा आणि नांदेड तहसीलदारांनाही मुंबईकडे रवाना व्हावे लागणार आहे.शेतक-यांची चिंता वाढली, नांदेड शहरही तहानलेलेचराज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांची वर्तवला आहे. ८ जूनपर्यंत तरी मान्सूनपूर्वीचा पाऊस राज्यात होणार नाही. त्यामुळे तापमानाचा पारा वाढताच राहणार आहे. याचा फटका पाणी टंचाई असलेल्या भागांना बसणार आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णूपुरी प्रकल्प कोरडा पडला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळMantralayaमंत्रालयRamdas Kadamरामदास कदम