शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात शिक्षणाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:58 IST

शिक्षकांचा प्रश्न असो की शिक्षण क्षेत्राबाबतचा निर्णय असो केवळ जीआर काढण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. या शासनाने पूर्ण शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा केला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्र्यांनी केली शासनाच्या शैक्षणिक धोरणावर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर : शिक्षकांचा प्रश्न असो की शिक्षण क्षेत्राबाबतचा निर्णय असो केवळ जीआर काढण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. या शासनाने पूर्ण शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा केला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात १४ आॅक्टोबर रोजी जिल्हा व तालुकास्तरीय गुरूगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. विक्रम काळे, आ. सुभाष साबणे, आ. अमर राजूरकर, आ.डी. पी.सावंत, आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. रावसाहेब अंतापूरकर, माजी आ. गंगाराम सौदागर, जि. प. उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती माधवराव मिसाळे, पं. स. सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष शंकरराव कंतेवार, जि. प. सदस्य अ‍ॅड. रामराव नाईक, अनुराधा अनिल पाटील खानापूरकर, दिलीप धोंडगे, प्रकाशराव भोसीकर, शेषराव चव्हाण, गटविकास अधिकारी गंगाधर मेथेवाड, उपनगराध्यक्ष बालाजी टेकाळे, दीपक शहाणे आदींची उपस्थिती होती.माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षकांवरच असते मात्र शासन दरबारी शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षणाचे खाजगीकरण, कायम विनाअनुदानित शाळेचा प्रश्न व जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न याबाबत चव्हाणांनी शासनाला धारेवर धरले. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून केली जात आहे. याकडे सध्याच्या शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन यातून मार्ग काढावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. शालेय अभ्यासक्रमात छत्रपती संभाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापण्याचा उद्योग मधल्या काळात झाला, त्याचा मी जाहीर निषेध करतो. तसेच ज्यांनी हे छापून आणले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे़ नांदेड जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांच्या वर दाखवण्यात आली. ही चिंताजनक बाब असून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. शासनाने नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करण्याची मागणी चव्हाण यांनी यावेळी केली. सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले़ देगलूर तालुक्यातील ३० तर जिल्ह्यातील ३४ शिक्षकांना गुरू गौरव पुरस्काराने यावेळी सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.शालेय अभ्यासक्रमात आक्षेपार्ह मजकुराचा निषेधशालेय अभ्यासक्रमात छत्रपती संभाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापण्याचा उद्योग मधल्या काळात झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो. तसेच ज्यांनी हे छापून आणले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे स्पष्ट करीत पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच मराठवाडा सध्या दुष्काळाने होरपळत आहे. नांदेड जिल्ह्याची ५० पैशांच्यावर आणेवारी दाखवण्यात आली ही चिंताजनक बाब असून शेतक-यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. शासनाने नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करण्याची मागणी चव्हाण यांनी यावेळी केली.

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणEducationशिक्षणTeacherशिक्षक