शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नांदेड जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना डॉक्टरांतर्फे मोफत सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:28 IST

जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीला नाम ही संघटना धावून आली असून आता या सामाजिक उपक्रमात योगदान देण्यासाठी नांदेडचे नामवंत डॉक्टर्सही पुढे आले आहेत़ नामच्या वतीने हे डॉक्टर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नि:शुल्क आरोग्य सेवा देणार आहेत़

नांदेड : जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीला नाम ही संघटना धावून आली असून आता या सामाजिक उपक्रमात योगदान देण्यासाठी नांदेडचे नामवंत डॉक्टर्सही पुढे आले आहेत़ नामच्या वतीने हे डॉक्टर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नि:शुल्क आरोग्य सेवा देणार आहेत़ त्यासाठी नामच्या पदाधिकाऱ्यांसोबत डॉक्टरांची बैठकही घेण्यात आली आहे़

नाम फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यात अनेक कामे सुरु आहेत़ त्यासाठी स्वयंसेवी संघटनांकडून भरभरुन मदत करण्यात येत आहे़ त्यात आता नांदेडातील नामवंत डॉक्टरांनीही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या सुदृढ आरोग्यासाठी निर्धार केला आहे़ यासंदर्भात इमा भवन येथे बैठक घेण्यात आली़ या बैठकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शहरातील नामवंत डॉक्टर्स, रुग्णालये नि:शुल्क सेवा पुरविणाऱ आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने तालुकानिहाय दुर्गम व अतिगरजेच्या ठिकाणी रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे़ रुग्णांची रक्त तपासणी, दंत तपासणी, समुपदेशन व जनजागरण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत़ डॉ़ आश्विन लव्हेकर यांच्या पुढाकाराने टेलीमेडीसीनद्वारे बहिरेपणा तपासणी व निदान करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे़ 

सर्वसामान्य रुग्णांसाठी जेनेरिक औषधींची उपलब्धता करुन देण्याची जबाबदारी डॉ़ हंसराज वैद्य व डॉ़आश्विन तळणीकर यांनी घेतली आहे़ तर डॉ़ येळीकर यांच्या रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची आरोग्यविषयक जबाबदारी आधारचे डॉ़ प्रदीप जाधव, डॉ़सुरेश कदम, डॉ़ संजय कदम यांनी घेण्याचे मान्य केले आहे़ तर डॉ़दत्ता मोरे हे दंत चिकित्सा व निदान करणार आहेत़ अशाप्रकारे शहरातील नामवंत डॉक्टरांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला आहे़ 

यावेळी झालेल्या बैठकीला नामचे जिल्हा समन्वयक डॉ़ अशोक बेलखोडे, प्रा़ डॉ़ बालाजी कोम्पलवार, आयएमचे अध्यक्ष डॉ़सुरेश कदम, नामचे सल्लागार दीपनाथ पत्की, डॉ़ बी़ जी़ मोरे, राठोड, पांडुरंग कंधारे, प्रा़ उमेद महाजन, गायकवाड, राजकुमार जाधव यांची उपस्थिती होती़ दरम्यान, नामच्या वतीने जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांवर स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने शिबिरे चालविण्यात येतात़ त्याला आता तज्ज्ञ डॉक्टरांची जोड मिळणार आहे. नामच्या पदाधिकाऱ्यांसोबत इमाची बैठक घेण्यात आली आहे़ या बैठकीत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आरोग्य सेवा देण्यासाठी अनेक नामवंत डॉक्टर पुढे आले आहेत़ याबाबत आणखी एक बैठक होणार असून कार्यक्रमाची रुपरेषा ठरविणार असल्याची माहिती इमाचे अध्यक्ष डॉ़ सुरेश कदम यांनी दिली़ 

टॅग्स :doctorडॉक्टरFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याFamilyपरिवार