शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कंधार शहरात लिंबोटीचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:36 IST

शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ आणि ५ मे रोजी शहरात पाणी दाखल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला़

ठळक मुद्देअडथळ्याच्या शर्यतीवर मात : शहरवासियांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ आणि ५ मे रोजी शहरात पाणी दाखल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला़शहराला सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सुजल निर्मल अभियानांतर्गत २५ कोटी ६७ लाख ७२ हजारांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली़ साडेतीन वर्षे संपत आले; पण योजना कार्यान्वित होवू शकली नाही़ एक्स्प्रेस फिडरचे काम प्रगतीपथावर असल्याचे सातत्याने सांगितले जाते़ ते पूर्ण कधी होणार? हा खरा प्रश्न आहे़ लिंबोटी येथील पाणीपुरवठा योजनेचे पूर्ण काम होऊनच शहराची खरी तहान भागणार आहे़ अन्यथा तात्पुरती व पर्यायी व्यवस्था कधी कोलमडेल, याचा भरवसा नाही़शहरात जवळपास १० दिवस पाण्याचा ठणठणाट झाल्यानंतर ऩप़ने लिंबोटी येथील पाणी आणण्याची कसरत सुरू केली़ विद्युत पुरवठा नसल्याने जनरेटरचा वापर केला़ आणि २० एच़पी़च्या मोटारीने पाणी आणण्याचा प्रयत्न केला़ जलवाहिनीत पाणी येत असताना मध्येच जलवाहिनी फुटली़ त्याची दुरुस्ती करण्यात आली़ पुन्हा जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला़ त्यामुळे प्रयत्नाला खीळ बसली़ त्यानंतर मोठ्या क्षमतेच्या जनरेटरचा वापर करून प्रयत्न सुरू झाले़ आणखी अडथळा आला़ त्यावर मात करून अखेर ५ मे रोजी रात्री शहरात पाणी दाखल झाले़ आणि ६ मे रोजी काही भागात पाणीपुरवठा करण्यात आला़ ‘लोकमत’ने शहर पाणी पुरवठ्याचा प्रश्न लावून धरला होता़ नगराध्यक्षा शोभा नळगे, मुख्याधिकारी सवाखंडे, पाणीपुरवठा विभागाचे लुंगारे, एजाज, नगरसेवक शहाजी नळगे आदींनी मोठी अडथळ्यांची शर्यत पार करीत पाणी आणले़ परंतु, ९० एच़पी़ च्या मोटारीने पाणी शहरात आले तरच पाणी संकट पूर्णत: टळणार आहे़ अन्यथा नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़दरम्यान, पाणी जपून वापरण्याची गरज आहे़ त्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन केले आहे़शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ऩप़ने कोणतीही कसर ठेवली नाही़ अनेक तांत्रिक अडचणी आल्या़ त्यावर मात करत पाणी शहरात आणले़ आता ९ एच़पी़च्या मोटारीने जनरेटरचा वापर करत पाणी दोन दिवसांत शहरात आणले जाईल़ विद्युतची कामे करण्यावर भर राहील व पाणीसमस्या दूर होईल -शोभा अरविंद नळगे, नगराध्यक्षा, कंधाऱ

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक