शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

कंधार शहरात लिंबोटीचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:36 IST

शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ आणि ५ मे रोजी शहरात पाणी दाखल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला़

ठळक मुद्देअडथळ्याच्या शर्यतीवर मात : शहरवासियांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ आणि ५ मे रोजी शहरात पाणी दाखल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला़शहराला सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सुजल निर्मल अभियानांतर्गत २५ कोटी ६७ लाख ७२ हजारांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली़ साडेतीन वर्षे संपत आले; पण योजना कार्यान्वित होवू शकली नाही़ एक्स्प्रेस फिडरचे काम प्रगतीपथावर असल्याचे सातत्याने सांगितले जाते़ ते पूर्ण कधी होणार? हा खरा प्रश्न आहे़ लिंबोटी येथील पाणीपुरवठा योजनेचे पूर्ण काम होऊनच शहराची खरी तहान भागणार आहे़ अन्यथा तात्पुरती व पर्यायी व्यवस्था कधी कोलमडेल, याचा भरवसा नाही़शहरात जवळपास १० दिवस पाण्याचा ठणठणाट झाल्यानंतर ऩप़ने लिंबोटी येथील पाणी आणण्याची कसरत सुरू केली़ विद्युत पुरवठा नसल्याने जनरेटरचा वापर केला़ आणि २० एच़पी़च्या मोटारीने पाणी आणण्याचा प्रयत्न केला़ जलवाहिनीत पाणी येत असताना मध्येच जलवाहिनी फुटली़ त्याची दुरुस्ती करण्यात आली़ पुन्हा जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला़ त्यामुळे प्रयत्नाला खीळ बसली़ त्यानंतर मोठ्या क्षमतेच्या जनरेटरचा वापर करून प्रयत्न सुरू झाले़ आणखी अडथळा आला़ त्यावर मात करून अखेर ५ मे रोजी रात्री शहरात पाणी दाखल झाले़ आणि ६ मे रोजी काही भागात पाणीपुरवठा करण्यात आला़ ‘लोकमत’ने शहर पाणी पुरवठ्याचा प्रश्न लावून धरला होता़ नगराध्यक्षा शोभा नळगे, मुख्याधिकारी सवाखंडे, पाणीपुरवठा विभागाचे लुंगारे, एजाज, नगरसेवक शहाजी नळगे आदींनी मोठी अडथळ्यांची शर्यत पार करीत पाणी आणले़ परंतु, ९० एच़पी़ च्या मोटारीने पाणी शहरात आले तरच पाणी संकट पूर्णत: टळणार आहे़ अन्यथा नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़दरम्यान, पाणी जपून वापरण्याची गरज आहे़ त्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन केले आहे़शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ऩप़ने कोणतीही कसर ठेवली नाही़ अनेक तांत्रिक अडचणी आल्या़ त्यावर मात करत पाणी शहरात आणले़ आता ९ एच़पी़च्या मोटारीने जनरेटरचा वापर करत पाणी दोन दिवसांत शहरात आणले जाईल़ विद्युतची कामे करण्यावर भर राहील व पाणीसमस्या दूर होईल -शोभा अरविंद नळगे, नगराध्यक्षा, कंधाऱ

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक