शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

कंधार शहरात लिंबोटीचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:36 IST

शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ आणि ५ मे रोजी शहरात पाणी दाखल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला़

ठळक मुद्देअडथळ्याच्या शर्यतीवर मात : शहरवासियांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ आणि ५ मे रोजी शहरात पाणी दाखल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला़शहराला सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सुजल निर्मल अभियानांतर्गत २५ कोटी ६७ लाख ७२ हजारांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली़ साडेतीन वर्षे संपत आले; पण योजना कार्यान्वित होवू शकली नाही़ एक्स्प्रेस फिडरचे काम प्रगतीपथावर असल्याचे सातत्याने सांगितले जाते़ ते पूर्ण कधी होणार? हा खरा प्रश्न आहे़ लिंबोटी येथील पाणीपुरवठा योजनेचे पूर्ण काम होऊनच शहराची खरी तहान भागणार आहे़ अन्यथा तात्पुरती व पर्यायी व्यवस्था कधी कोलमडेल, याचा भरवसा नाही़शहरात जवळपास १० दिवस पाण्याचा ठणठणाट झाल्यानंतर ऩप़ने लिंबोटी येथील पाणी आणण्याची कसरत सुरू केली़ विद्युत पुरवठा नसल्याने जनरेटरचा वापर केला़ आणि २० एच़पी़च्या मोटारीने पाणी आणण्याचा प्रयत्न केला़ जलवाहिनीत पाणी येत असताना मध्येच जलवाहिनी फुटली़ त्याची दुरुस्ती करण्यात आली़ पुन्हा जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला़ त्यामुळे प्रयत्नाला खीळ बसली़ त्यानंतर मोठ्या क्षमतेच्या जनरेटरचा वापर करून प्रयत्न सुरू झाले़ आणखी अडथळा आला़ त्यावर मात करून अखेर ५ मे रोजी रात्री शहरात पाणी दाखल झाले़ आणि ६ मे रोजी काही भागात पाणीपुरवठा करण्यात आला़ ‘लोकमत’ने शहर पाणी पुरवठ्याचा प्रश्न लावून धरला होता़ नगराध्यक्षा शोभा नळगे, मुख्याधिकारी सवाखंडे, पाणीपुरवठा विभागाचे लुंगारे, एजाज, नगरसेवक शहाजी नळगे आदींनी मोठी अडथळ्यांची शर्यत पार करीत पाणी आणले़ परंतु, ९० एच़पी़ च्या मोटारीने पाणी शहरात आले तरच पाणी संकट पूर्णत: टळणार आहे़ अन्यथा नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़दरम्यान, पाणी जपून वापरण्याची गरज आहे़ त्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन केले आहे़शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ऩप़ने कोणतीही कसर ठेवली नाही़ अनेक तांत्रिक अडचणी आल्या़ त्यावर मात करत पाणी शहरात आणले़ आता ९ एच़पी़च्या मोटारीने जनरेटरचा वापर करत पाणी दोन दिवसांत शहरात आणले जाईल़ विद्युतची कामे करण्यावर भर राहील व पाणीसमस्या दूर होईल -शोभा अरविंद नळगे, नगराध्यक्षा, कंधाऱ

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक