शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

हदगावात शेतकरी आत्महत्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:53 IST

सन २०१३ ते एप्रिल २०१८ पर्यंत हदगाव तालुक्यात ८६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्यापैकी ६० आत्महत्येची प्रकरणे पात्र ठरली.

ठळक मुद्देपीक विमा, राष्ट्रीय महामार्ग जमिनीच्या मोबदल्याचा परिणाम: २०१७ मध्ये १३ तर २०१८ च्या चार महिन्यांत ५ आत्महत्या

सुनील चौरेलोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : सन २०१३ ते एप्रिल २०१८ पर्यंत हदगाव तालुक्यात ८६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्यापैकी ६० आत्महत्येची प्रकरणे पात्र ठरली.तर २४ शेतकरी आत्महत्या प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहेत. सन २०१७-१८ या दोन वर्षांत मात्र ही संख्या घटली. हे एक चांगले लक्षण असून पीक विमा व राष्ट्रीय महामार्गाने जमिनीचा मोबदला हे एक कारण त्यापाठीमागे असल्याची चर्चा आहे.पूर्वी शेतकरी खाजगी सावकारांकडून पेरणी, लग्न, शिक्षणासाठी कर्ज घेत. पिकाला उतारा न आल्याने सावकाराचे कर्ज फिटत नसे व हा आकडा फुगत जायचा. आता शेतकरी हुशार झाले. शेतात पेरलेल्या पिकाचा विमा काढू लागले व अतिवृष्टीने किंवा अल्प पावसाने पीक गेले तर त्याला पीक विम्याचे कवच मिळाले. शासनाच्या वेगवेगळ्या योजना, अनुदानामुळेही शेतकरी सुखावला. पिकाला मिळणारा हमीभाव बाजारपेठेत त्याची होणारी लूटही कायद्याने खरेदी- विक्री आॅनलाईन करुन थांबविल्याने व्यापाºयाचा नफा कमी होऊन तो शेतकºयाच्या पदरात पडू लागला.खते, बी-बियाणे, औषधी यांची खरेदी- विक्री आॅनलाईन झाल्याने काळा बाजार मंदावला. शेततळी, सिंचन विहिरी, जलयुक्त शिवारअंतर्गत केलेली बंडींगची कामे याचाही आधार शेतकºयांना झाला.शेतकºयांच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलत मिळाली. त्यामुळे त्यांचा खर्च कमी झाला ही काही प्रमुख कारणे सांगता येतील.शेतीला पुरक योजना दुधाळ जनावरे, फळबागा ठिबक, तुषार यांचा पुरवठा करण्यात आला. कमी पावसात येणारे वाण बाजारात आल्याने शेतकºयांना फायदा झाला. १३ गावांतील शेतकºयांच्या जमिनीचे मोजमाप २०१७ पासून सुरू झाले.त्यामुळे जमिनीचा मोबदला चांगला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या व मोबदला मिळालाही. या रकमेचा फायदा सामान्य शेतकºयांसह सधन शेतकºयांनाही झाला. त्याचबरोबर त्यांच्या लेकीबाळी पाहुणे यांनाही झाला.युवक मंडळी पारंपरिक शेती न करता नगदी पिकांकडे वळली. भाजीपाला घेत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कमी पाण्यात चांगले उत्पन्न घेऊ लागले आहेत. आत्महत्या करणारी गावे पाहिली तर एकाच गावात वारंवार आत्महत्या घडल्या आहेत.यामध्ये हरडप, मनाठा, निवघा, चोरंबा (बु.), कोहळी, चिकाळा, कोहली, येवली, वायफना, तळेगाव, ल्याहरी, निमगाव, सावरगाव, बरडशेवाळा, पाथरड, पिंगळी, तळणी ही ठरलेली गावे आहेत. यामध्ये भीषण वास्तव म्हणजे मराठा समाजाच्या ४० आत्महत्या आहेत. हा चिंतनाचा विषय आहे.२४ शेतकरी कुुटुंबांना छदामही नाहीसन २०१३ मध्ये ८ आत्महत्या झाल्या. सन २०१४ हाच आकडा १५ वर गेला. सन २०१५ मध्ये २० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. सन २०१६ मध्ये हीच संख्या २३ वर गेली. परंतु, २०१७ मध्ये आकडा कमी झाला व ही संख्या १३ वर आली. सन २०१८ च्या चार महिन्यांत ५ आत्महत्या शेतकºयांनी केल्या. सहा वर्षातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी ८६ आहे. त्यापैकी ६० शेतकरी आत्महत्या प्रकरणे पात्र ठरली तर २४ प्रकरणे अपात्र ठरली. २ प्रकरणे कार्यवाही सुरू आहे. ज्या शेतकºयांची प्रकरणे पात्र ठरली त्यांच्या कुटुंबाना थोडीफार आर्थिक मदत शासनाकडून मिळाली. परंतु, २४ शेतकरी कुटुंबांना छदामही मिळाला नाही. त्यामुळे त्या कुटुंबांच्या अडचणीत वाढच झाली.सावकाराचा जाचक पाशही आवळला !शेतकºयाने आत्महत्या केली की त्यांच्या कुुटुंबाला आर्थिक मदत मिळते. त्यामुळे ते आत्महत्या करतात. असा सूर काही वर्षांपूर्वी निघत होता. परंतु, सन २००८ पासूनची अनेक प्रकरणे समितीने अपात्र ठरविल्यामुळे हा आरोप खोटा ठरतो. परंतु, या दोन वर्षांमध्ये आत्महत्येचे प्रमाण मात्र तालुक्यामध्ये कमी झाले आहे. सतत वाढणारा आकडा सन २०१७ मध्ये १३ वर आला. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता शेतकºयांना मिळणारा पीक विमा. यामुळे अनेक शेतकºयांना पेरणीसाठी वरदान ठरला. खाजगी सावकाराचा जाचक पाशही कायद्याने तोडला.

टॅग्स :Nandedनांदेडhighwayमहामार्गfarmer suicideशेतकरी आत्महत्याfundsनिधी