शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

रबीचा विमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 5:25 PM

किनवट तालुक्यातून केवळ दोन शेतकऱ्यांनी रबीचा पीकविमा भरला आहे़ 

ठळक मुद्दे१७ हजार शेतकऱ्यांचे अर्ज विमा भरण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत

नांदेड : नैसर्गिक आपत्तीद्वारे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेचा लाखो शेतकरी दरवर्षी फायदा घेत आहेत़ परंतु, यंदाच्या रबी हंगामातील पिकांचा विमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी कानाडोळा केल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात केवळ १६ हजार ९३० शेतकऱ्यांनीच अर्ज केले आहेत़ 

राज्यात रबी हंगाम २०१९ -२० या वर्षाकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे़ प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी बंधनकारक असून बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. विमा भरण्याची अंतिम मुदत मंगळवार, ३१ डिसेंबर असून शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याचे काम सध्या सुरू आहे़  

जिल्ह्यात आजपर्यंत १६ हजार ९३० शेतकऱ्यांनी रबीच्या पिकांसाठी विमा भरला आहे़ यामध्ये सर्वाधिक मुखेड तालुक्यातील ८ हजार ६६२ शेतकऱ्यांनी पीकविमा भराला आहे़ त्यापाठोपाठ नायगाव तालुक्यातील ४ हजार ७१५ शेतकऱ्यांनी, देगलूर तालुक्यातील २ हजार ९२ शेतकऱ्यांनी, बिलोली - ७२५, हदगाव - ३१८, अर्धापूर - १५३, नांदेड तालुक्यातील ११४, कंधार तालुक्यातील ८५, लोहा - ३१, धर्माबाद - ११, मुदखेड - ८, हिमायतनगर तालुक्यातील ८ शेतकऱ्यांनी, भोकर तालुक्यातील ६ तर किनवट तालुक्यातून केवळ दोन शेतकऱ्यांनी रबीचा पीकविमा भरला आहे़ सदर योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येत आहे़ रबी हंगामातील पिकासाठी दीड टक्के ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. 

या योजनेंतर्गत विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पुढीलप्रमाणे आहे़ पीक- गहू बागायती- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी ३५ हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ५२५ रुपये, विमा लागू असलेले तालुके नांदेड (सर्व महसूल मंडळ). अधिसूचना तालुकास्तरीय कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, भोकर. ज्वारी- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी २६ हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ३९० रुपये, विमा लागू असलेले तालुके बिलोली, धर्माबाद, मुखेड (सर्व महसूल मंडळ), अधिसूचना तालुकास्तरीय- देगलूर, नायगाव, नांदेड, किनवट, हदगाव. हरभरा- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी २४ हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ३६० रुपये, विमा लागू असलेले तालुके नांदेड, अर्धापूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, देगलूर, मुखेड, किनवट (सर्व महसूल मंडळ). अधिसूचना तालुकास्तरीय नायगाव, हिमायतनगर, मुदखेड या तालुक्यांना विमा लागू असेल. ही योजना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी- मार्फत राबविण्यात येत आहे़ दरम्यान, विमा भरण्यासाठी ३१ डिसेंबर ही अखेरची मुदत असल्याने शेतकऱ्यांनी विविध बँकांसमोर गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे़ त्यामुळे उर्वरित दिवसात विमाधारक शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे कृषि विभागाने सांगितले़ 

अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावारबी पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट, काढणीपश्चात नुकसान आदी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बागायती गहू, ज्वारी (जि), हरभरा या पिकासाठी ही योजना लागू आहे.रबी हंगामातील लागू असलेल्या पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरवावा़ या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या बँकेशी किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आऱ बी़ चलवदे यांनी केले आहे़ 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती