शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पिकविम्यात डावलल्याने शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:35 IST

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १० लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी ४८ कोटी रुपये विमा कंपनीकडे भरले होते. परंतु, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अवघा १८ कोटी रुपयांचा पिकविमा मंजूर झाला आहे.

ठळक मुद्देमाहूरमध्ये २० रोजी आंदोलन तर मुखेड, कंधार तालुक्यातील २१ ठिकाणी शनिवारी होणार रास्तारोको

नांदेड : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १० लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी ४८ कोटी रुपये विमा कंपनीकडे भरले होते. परंतु, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अवघा १८ कोटी रुपयांचा पिकविमा मंजूर झाला आहे. शेतक-यांचे मोठे नुकसान होऊनही ऐन दुष्काळात बळीराजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम विमा कंपनीसह प्रशासनाकडून झाल्याने या प्रकाराबाबत कमालीचा संताप व्यक्त होत आहे. या निषेधार्थ २० मे रोजी माहूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे तर शनिवारी १८ मे रोजी मुखेड, कंधार तालुक्यातील २१ ठिकाणी धरणे आंदोलन होणार आहे.देगलूर तालुक्यातील आकडेवारी पाहता सात वर्षाचे उंबरठा उत्पन्नाचा आधार घेऊन ऐन दुष्काळात विमा कंपनीने सोयाबीन, मूग व उडीद पिकाचा विमा मंजूर केला नाही. ज्या पिकाचा कमी शेतक-यांनी विमा काढला होता त्या कापूस व संकरित ज्वारी या पिकाचा विमा मंजूर केला आहे. शासनाने सोयाबीन, मूग व उडीद पिकाचा विमा मंजूर करण्यात तात्काळ पावले उचलावीत अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरु, असा इशारा देगलूर तालुक्यातील शेतकºयांनी दिला आहे.२०१६ साली देगलूर तालुक्यात अतिवृष्टी होवून सोयाबीन, मूग व उडीदाचे पीक शेतकºयांच्या डोळ्यादेखत गेले होते. त्यावेळी ज्या शेतकºयांनी आपल्या खरीप पिकाचा विमा उतरविला नव्हता अशा शेतकºयांना ५० टक्के विमा मिळाला होता. आता तर २०१६ सालापेक्षा भयानक दुष्काळ असताना विमा कंपनीने सोयाबीन, मूग व उडीद पिकाचा विमा नामंजूर करुन शेतकºयांना वाºयावर सोडले आहे. त्यामुळे शेतकºयांत नाराजी असून नगदी खरीप पिकाचा विमा मंजूर झाला नाही़ तर येणाºया विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम युती शासनाला भोगावे लागतील असे इशारे शेतकरी देत आहेत.जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या आशेने सोयाबीन, मूग व उडीद या नगदी पिकाचा विमा उतरविला होता. मात्र विमा कंपनीने कापूस व संकरीत ज्वारी या दोन पिकाचा विमा सध्या मंजूर करून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. या प्रकाराबाबत शेतकºयातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत़काँग्रेस, मित्रपक्षातर्फे २१ ठिकाणी धरणेपिकविमा परतावा न मिळाल्याने काँग्रेससह मित्रपक्ष आक्रमक झाले आहेत. शासनाबरोबरच पिकविमा कंपनीच्या विरोधात माजी आ. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून शनिवारी एकाच दिवशी मुखेड आणि कंधार तालुक्यातील २१ ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे बेटमोगरेकर यांनी सांगितले.शेतकºयांना सरसकट पिकविमा मंजूर करावा, शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला रोजगार द्यावा, जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा, पाणीटंचाईबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जि.प. चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्यासह मुखेडचे नगराध्यक्ष बाबूराव देबडवार आणि पदाधिकाºयांनी सांगितले. सदर आंदोलन सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत करण्यात येणार आहे.या आंदोलनात जि़प़सदस्या सुशीलाबाई बेटमोगरेकर, मंगाराणी अंबुलगेकर, शेषेराव चव्हाण, राजन देशपांडे, सुभाष पाटील, बालाजी बंडे, प्रकाश उलगुलवार, बाबुराव गिरे, शिवराज आवडके यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी, पीआरपी, स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत़३९९ शेतक-यांना केवळ १ लाख ७० हजार मंजूरदेगलूर : सहा मंडळात ३ हजार ५७ शेतक-यांनी कापसाचा विमा उतरविला होता. त्या शेतक-यांना विमा देण्यासाठी २ कोटी ३२ लाख रुपये तुटपुंजी मदत विमा कंपनीने दिली आहे. तर संकरित ज्वारीचा ३९९ शेतक-यांनी विमा उतरविला होता़ त्या शेतकºयांना केवळ १ लाख ७० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तूर पिकाचा विमा मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे़ मात्र त्यासाठी विमा कंपनीने एक छदाम रुपया सुद्धा अद्यापपर्यंत मंजूर केला नाही. या प्रकाराबाबत शेतक-यात संतापाची लाट आहे़४८ तासात शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करामाहूर : सर्वाधिक पिकविमा भरूनही नियमानुसार ४८ तासात शेतक-यांच्या खात्यात संबंधीत पिक विमा संरक्षीत रक्कम जमा झालेली नाही़ ही रक्कम तातडीने अदा करावी या मागणीकरीता संभाजी ब्रिगेडसह किसन ब्रिगेड आक्रमक झाली आहे़ याचा मागणीसाठी या दोन्ही संघटनासह शेतकरी बांधवांच्यावतीने २० मे रोजी माहूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येत असल्याचे अविनाश टनमने, सुनील वानखेडे, विलास गावंडे, दिलीप सुकले आदींनी सांगितले़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीMONEYपैसा