शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नांदेड दक्षिणवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 1:01 AM

नांदेड दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांना विधानसभा लढविण्याचा आग्रह धरला आहे. काँग्रेस आ. अमरनाथ राजूरकर यांनी एका खाजगी कार्यक्रमात केलेल्या या विधानानंतर काँग्रेसबरोबरच सेना-भाजपाही आमनेसामने उभी ठाकली असून तिन्ही पक्षांतून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

ठळक मुद्देराजकारण निघाले ढवळून : काँग्रेस-भाजप वादात सेनेचीही उडी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांना विधानसभा लढविण्याचा आग्रह धरला आहे. काँग्रेस आ. अमरनाथ राजूरकर यांनी एका खाजगी कार्यक्रमात केलेल्या या विधानानंतर काँग्रेसबरोबरच सेना-भाजपाही आमनेसामने उभी ठाकली असून तिन्ही पक्षांतून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.विष्णूपुरी येथे झालेल्या कार्यक्रमात खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे आ. राजूरकर यांनी विधान केले. असे झाल्यास काँग्रेसची एक जागा वाढेल. सोबतच नांदेड दक्षिणचाही विकास होईल, असे विधान त्यांनी केले होते. यावर शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी काँग्रेस आमदारावर टीकेची झोड उठविली. इतकी वर्षे जिल्ह्यावर वर्चस्व असताना नांदेडचा विकास काँग्रेसला का करता आला नाही? अशी टीका त्यांनी केली. जिल्हा परिषदेसह महानगरपालिकेवरही कॉंग्रेसची सत्ता असताना पुन्हा विकासासाठी काँग्रेस हवी, असे म्हणणे निरर्थक असल्याचे आनंद जाधव यांनी म्हटले होते.दरम्यानच्या काळात आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी एका कार्यक्रमात मागच्यावेळी माझ्यामुळेच नांदेड दक्षिणमध्ये भाजपा उमेदवार पराभूत झाला. आता मीच भाजपाचा उमेदवार निवडून आणेन असे सांगत येत्या काळात जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व वाढलेले दिसेल, असा दावा आ. चिखलीकर यांनी केला. या व्यक्तव्याचाही जाधव यांनी समाचार घेतला.नांदेड दक्षिणची जागा मतदार आणि निष्ठावंत शिवसैनिकांमुळेच आम्ही जिंकली होती. त्यामुळे निवडून आणण्याबाबतचे फुकटचे श्रेय घेवू नये, असा टोला त्यांनी आ. चिखलीकर यांना लगावला होता.दरम्यान, उपमहापौर विनय गिरडे यांनीही या वादात उडी घेतली आहे. चिखलीकरांना टीकेचे लक्ष्य करीत मनपा निवडणुकीत ज्यांच्या खांद्यावर भाजपाची जबाबदारी होती, ते ८१ पैकी केवळ ६ जागा निवडणूक आणू शकले. त्यांना स्वत:च्या पुतण्याला मनपा निवडणुकीत विजयी करता आले नाही. ते इतरांना पराभूत किंवा विजयी कसे करणार ? असा सवाल गिरडे पाटील यांनी केला आहे.राज्यात जितके पक्ष आहेत ते सर्व पक्ष फिरून झाले आहेत. २०१९ पर्यंत कंधार-लोह्याचे हे आमदार भाजपमध्ये तरी राहतील काय ? असा प्रश्नही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.---नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीत मोठी चुरस होती. येथून शिवसेना निसटत्या मताधिक्क्याने विजयी झाली होती. त्यामुळेच येवू घातलेल्या निवडणुकीसाठी या मतदारसंघावर प्रमुख पक्षांचा डोळा आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नावाची काँग्रेसने गुगली टाकल्यानंतर नांदेड-दक्षिणमधील राजकारण ढवळून निघाले. काँग्रेसने खा. चव्हाण यांचे नाव घेवून विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. या बरोबरच पक्षांतर्गत इच्छुकांनाही एकप्रकारे इशारा दिला आहे.

टॅग्स :NandedनांदेडPoliticsराजकारणAshok Chavanअशोक चव्हाणAmara Rajurakarअमर राजूरकर