शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

संशयाच्या वादळाने होतो कुटुंबाचा विनाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:06 IST

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत एका पेक्षा एक सरस नाट्य कलाकृतींचा आस्वाद नांदेडकर रसिक प्रेक्षकाना मिळतो आहे. मानवी स्वभावात दडून बसलेले संशय नावाचे वादळ कधी उफाळेल आणि सुखी चाललेल्या कुटुंबाचा विनाश करेल हे सांगता येत नाही. हेच ‘द. गिफ्ट’ या नाट्यकृतीने अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिले.

ठळक मुद्देराज्य हौशी नाट्य स्पर्धा : ‘द गिफ्ट’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत एका पेक्षा एक सरस नाट्य कलाकृतींचा आस्वाद नांदेडकर रसिक प्रेक्षकाना मिळतो आहे. मानवी स्वभावात दडून बसलेले संशय नावाचे वादळ कधी उफाळेल आणि सुखी चाललेल्या कुटुंबाचा विनाश करेल हे सांगता येत नाही. हेच ‘द. गिफ्ट’ या नाट्यकृतीने अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिले.हेमंत एदलाबादकर लिखित, शुभंकर एकबोटे दिग्दर्शित हे दोन पात्री नाटक रसिक प्रेक्षकाना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरले. कुसुम सभागृह येथे हनुमान नगर सांस्कृतिक सेवा मंडळ, पुण्याच्या वतीने सादर झालेले हे नाटक आजच्या काळातील स्त्री पुरुषांचे ताणलेले नातेसंबंध, त्यात आलेला अधिक मोकळेपणा, जागतिक स्वैेराचारांचे उमटलेलं प्रतिबिंब या आणि आशा अनेक गोष्टींचा परिणाम या नाटकातून दिसत होता.या नाटकातील मिताली (अधिश्री वाडोदकर) आणि यश (राजेश काटकर) यांच्या लग्नाला एक वर्ष होण्यास काही तास बाकी असतात आणि ते एक दुसºयांना काय गिफ्ट देणार या उत्सुकतेत असतात. बारा वाजण्यास काही तास शिल्लक असल्या कारणाने त्यांच्यात गप्पा रंगतात आणि अश्यातच अनपेक्षित येणारा मितालीच्या आॅफिसमधील तिच्या मित्राचा फोन जे सोबत स्त्री मुक्ती विषयी काम करीत असतात. आणि सुरु होतो संशयाचा खेळ. लग्नाला एक वर्ष पूर्ण होत असताना दोघेही वर्षभरातील संशयाच्या जागा भरून काढतात आणि नाटकाच्या शेवटी हे सर्व मिथ्य आहे. फक्त संशय आहे हे उघड होतं. वास्तववादी स्वरुपातील नेपथ्य चिन्मय पटवर्धन यांनी उभे केले, अनिल टाकळकर यांनी प्रकाशयोजना सांभाळली, तर वेशभूषा रचना पटवर्धन आणि संगीत वृषाली काटकर यांनी आशयानुरूप साकारली.स्वर्गातील तीन जोडप्यांची कथाशंकरराव चव्हाण सभागृहात विद्यासागर अध्यापक लिखित, दिग्दर्शीत ‘दर्द ए डिस्को’ हे नाटक सादर झाले. स्वर्गात आलेल्या तीन जोडपे व एक मॅनेजरवर यांच्यावर आधारित नाटक आहे. या नाटकात नाटककाराने फँटसीचा आधार घेत विविध पात्रांच्या संवादातून मानवी मनातील सेक्सविषयीचे विचार, भावना व त्यांकडे बघण्याची त्यांचा दृष्टीकोन अभिव्यक्त केला आहे. कशासाठी हे वासनांचे डोह? कधी सुटका होणार ह्यातून? कधी या जन्म मृत्युच्या अग्निपरीक्षेतून बाहेर पडणार? असे प्रत्येकालाच सामान्यपणे पडणारे पण मानवी जगण्याचं नेमकं प्रयोजन तरी काय हे शोधणारे, तसेच प्रश्नही निर्माण करणारे हे नाटक आहे. ज्यातून नेणिवेचा एक नवीनच पटल उलगडत जातो. यात प्रभाकर वर्तक, उमा नामजोशी, धनश्री गाडगीळ, अनुप बेलवलकर, अनिरुद्ध दांडेकर, आफरीन शेख, यशवंत कुलकर्णी यांनी भूमिका साकारल्या.