प्रकरण निपटा-यासाठी गरजुंचे दलालांकडुन शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST2020-12-30T04:23:41+5:302020-12-30T04:23:41+5:30

तालुक्यातील मोठे गांव म्हणुन कासराळी ची ओळख आहे.येथील वैध , अवैध प्रकरणाचा कारभार सुरळीत चालावा आणि प्रकरणाचा निपटारा व्यवस्थित ...

Exploitation by needy brokers to settle cases | प्रकरण निपटा-यासाठी गरजुंचे दलालांकडुन शोषण

प्रकरण निपटा-यासाठी गरजुंचे दलालांकडुन शोषण

तालुक्यातील मोठे गांव म्हणुन कासराळी ची ओळख आहे.येथील वैध , अवैध प्रकरणाचा कारभार सुरळीत चालावा आणि प्रकरणाचा निपटारा व्यवस्थित होण्यासाठी गरजुंना अर्थतंञाची दलालामार्फत गरज लागते.तालुकास्तरावची अपुरी माहिती आणि गरजूंच्या अनभिज्ञतेने मध्यस्थ (अडत्या ) गरज नसतांना गरजूंना मिळतात. प्रकरणाचा निपटारा करण्याची हमी देऊन मागणी होते. येथे सक्रीय दलाल स्वतःहून ही प्रकरणे गरजूंची दिशाभूल करुन हातात घेतात.तालुकास्तरावर फारसे काही वजन नसतांना या दलालांकडून व्यवहार पूर्ण होतो. माञ ठरलेला व्यवहार तडीस न जाता ती दलालांच्याच घशात जाते. तंटे , वाद आदी पोलिस ठाणे स्तरावरील प्रकरणे निपटा-यासाठी या दलालांकडून आर्थिक मागणी केली जाते. प्रकरण हाताळल्याचा आणि तंट्याच्या समितीत असल्याची बतावणी केली जाते. वास्तविक प्रकरण निपटा-याचे प्रकरण मिटणे कमी माञ रक्कमच अधिक घशात या दलालाच्या जाते.लोकांच्या अनभिज्ञ पणाचा असा गैरफायदा घेतला जात आहे.या प्रवृत्तीकडुन होणारे आर्थिक शोषण थांबविण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Exploitation by needy brokers to settle cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.