शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

नांदेड जिल्ह्यात पाण्यावर पाच वर्षांत १ अब्ज ४ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:52 AM

जिल्ह्यात पाच वर्षांत तब्बल १ अब्ज ४ कोटी २६ लाख रुपये पाणीटंचाई निवारणासाठी खर्च करण्यात आला आहे. यावर्षीचा खर्च आणखी निश्चित झाला नाही. यावर्षी जवळपास २५ ते ३० कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देनागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम ग्रामीण भागात नळ योजना विशेष दुरूस्तीचे कामे सुरूअडीच हजार लोकसंख्येसाठी एक टँकर पाणी

अनुराग पोवळे ।नांदेड : जिल्ह्यात पाच वर्षांत तब्बल १ अब्ज ४ कोटी २६ लाख रुपये पाणीटंचाई निवारणासाठी खर्च करण्यात आला आहे. यावर्षीचा खर्च आणखी निश्चित झाला नाही. यावर्षी जवळपास २५ ते ३० कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे.जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी पाच वर्षांत सर्वाधीक ४३ कोटी ५० लाखांचा खर्च २०१६ मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर गतवर्षी २७ कोटी १४ लाख रुपये पाणीटंचाई निवारणासाठी खर्च करण्यात आले. २०१६ मध्ये जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी २ हजार ९६० उपाययोजना हाती घेण्यात आल्या होत्या. त्यात सर्वाधीक खर्च टँकरने पाणीपुरवठा करण्यावर झाला होता. १९ कोटी ९५ लाख रुपये २०१६ मध्ये टँकरने पाणी देण्यासाठी खर्च करण्यात आला. खाजगी विहिरीही अधिग्रहीत करण्यात आल्या. १ हजार ३०९ विहीर अधिग्रहणासाठी १२ कोटी ७१ लाख रुपये खर्च केले. २०१७ मध्येही टँकरचा खर्च मात्र कमी झाला होता. केवळ ४७ टँकरने पाणी देण्यात आले होते. यासाठी १ कोटी ५९ लाख तर खाजगी विहीर अधिग्रहणासाठी सर्वाधीक २ कोटी ८ लाख रुपये खर्च झाले होते. २०१७ मध्ये ५८४ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीवरही ४० लाख रुपये २०१७ मध्ये आणि ७० लाख रुपये २०१६ मध्ये खर्च झाले होते.२०१८ मध्ये जिल्ह्यात १०९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. ६ कोटी ७० लाख ८९ हजार रुपये खर्च करण्यात आले होते. तर विहीर अधिग्रहणासाठी ४ कोटी ८६ लाख रुपये अदा केले.जिल्ह्यात २ हजार २०१४ मध्ये पाणीपुरवठ्याच्या १८४० उपाययोजना करण्यात आल्या होत्या. २०१५ मध्ये २ हजार ४३३, २०१६ मध्ये २ हजार ९६०, २०१७ मध्ये १ हजार ५९० आणि २०१८ मध्ये २ हजार ८२७ उपाययोजना करण्यात आल्या होत्या.जिल्ह्यात १ आॅक्टोबर २०१८ ते ३० जून २०१९ या कालावधीत ५ हजार २८१ पाणीपुरवठा उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विंधन विहिरीची दुरुस्ती, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, टँकरने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण आदी उपाययोजनांचा समावेश आहे. १३०५ गावांमध्ये या उपाययोजना केल्या जाणार आहेत.नळ योजनांच्या ३५१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यावर्षी टँकरची संख्या जवळपास ३६५ पर्यंत पोहोचेल असेही कृती आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात नळ योजना विशेष दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. ही कामे सध्या निविदास्तरावर तर काही कामे प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी पाणीपुरवठा योजनांची तीन लाखापर्यतची कामे २० मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.पाच वर्षांत २ हजार ८३ बोअर...जिल्ह्यात विंधन विहिरींद्वारेही पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुरुच आहे. मागील पाच वर्षात तब्बल २ हजार ८३ विंधन विहिरी प्रशासनाकडून मारण्यात आल्या आहेत. यातील किती विंधन विहिरी कोरड्या गेल्या हा प्रश्नच आहे.२०१४ मध्ये ४५८ विंधन विहिरीसाठी २ कोटी २९ लाख, २०१५ मध्ये १७० विंधन विहिरीसाठी ८५ लाख, २०१६ मध्ये ३५१ विंधन विहिरीसाठी १ कोटी ७५ लाख, २०१७ मध्ये ४२९ विंधन विहिरीसाठी १ कोटी ९२ लाख आणि २०१८ मध्ये ६७५ विंधन विहिरीसाठी ४ कोटी ५ लाख रुपये खर्च करण्यात आला होता.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद