चौथा दिवसाअखेर ४३ पैकी ३१ ग्रामपंचायतींसाठी ३५२ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST2020-12-30T04:24:23+5:302020-12-30T04:24:23+5:30
३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर ऑफलाइन कागदपत्रे जमा केले जाणार आहेत. त्यासाठी ...

चौथा दिवसाअखेर ४३ पैकी ३१ ग्रामपंचायतींसाठी ३५२ अर्ज
३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर ऑफलाइन कागदपत्रे जमा केले जाणार आहेत. त्यासाठी निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. यासाठी २३ कक्ष तयार करण्यात आले आहेत. यासाठी शंभर ते दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये १२ निवडणूक निर्णय अधिकारी, १२ सहायक निवडणूक अधिकारी आदींची निवड करण्यात आली आहे. दाखल अर्जांची ३१ डिसेंबरला छाननी होणार आहे. त्यानंतर ४ जानेवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिवस आहे. ३७७ सदस्यांसाठी ३५२ अर्ज दाखल
सोमवारी ११ ग्रामपंचायतींसाठी ४६ व मंगळवारी २४ ग्रामपंचायतींसाठी ३०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात चोरंबा-११, रोडगी-११, मेंढला खु.-१७,मेंढला बु.-१४, जांभरून-८, लहान-९, आंबेगाव-१४, शहापूर-अमरापूर-हमरापूर -९, येळेगाव-३,चेणापूर-१, लोणी बु. -१६, लोणी खु.-१, पांगरी-१९, धामदरी-५, पार्डी-२, पिंपळगाव म.-७, गणपूर -२२, देळुब बु.-२४, निमगाव-२५, खैरगाव खु. बु. -१४,खैरगाव म. -२, कामठा बु.-२६, सांगवी खु./खडकी - १२,दाभड -८, मालेगाव-२३, भोगाव-६, उमरी-६, शेलगाव बु. ९, शेलगाव खु.२, शेणी २, देळुब खु.५, असे एकूण ३५२ अर्ज दाखल झाले आहेत.
नामनिर्देशन भरण्यासाठी अडीच तास वाढविला...
संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन दाखल करण्याच्या कालावधीत वाढ. इंटरनेट गती कमी, सर्व्हर डाऊन, अडचणी इत्यादी तक्रारीमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळावी. नामनिर्देशनपत्र पारंपरिक पद्धतीने (ऑफलाइन) स्वीकारण्याचा वेळ दि. ३० डिसेंबर रोजी ५:३० वाजतापर्यंत (अडीच तास) वाढविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सुजित नरहरे, निवडणूक अधिकारी मारोतराव जगताप यांनी दिली.