शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आजोळातील अन्न-पाण्याशी राखले इमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:29 IST

शिवराज रामचंद्र भंडरवाड. वय वर्षे १६. जन्म आजोळी झाला. घरची आर्थिक स्थिती बेताचीच. राहायला पक्के घरदेखील नाही. त्यामुळे आजी-आजोबांनीच संगोपन केले. दहावीत शिकतानाच सुटीच्या दिवशी आजोबांच्या शेळ्या राखतो. २० आॅगस्ट रोजीही तो शेळ्या घेऊन गावाकडे परतत होता. गावातील दोघे पुरात वाहून जात असल्याचे पाहून त्याने जिवाची पर्वा न करता या दोघांना मृत्यूच्या तावडीतून बाहेर काढले.

ठळक मुद्देजिगरबाज शिवराजने जागवल्या पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या दोघांना वाचविल्याच्या आठवणी

वसंत जाधव/बालाजी मांजरमकर।लोकमत न्यूज नेटवर्कगडमा/मांजरम: शिवराज रामचंद्र भंडरवाड. वय वर्षे १६. जन्म आजोळी झाला. घरची आर्थिक स्थिती बेताचीच. राहायला पक्के घरदेखील नाही. त्यामुळे आजी-आजोबांनीच संगोपन केले. दहावीत शिकतानाच सुटीच्या दिवशी आजोबांच्या शेळ्या राखतो. २० आॅगस्ट रोजीही तो शेळ्या घेऊन गावाकडे परतत होता. गावातील दोघे पुरात वाहून जात असल्याचे पाहून त्याने जिवाची पर्वा न करता या दोघांना मृत्यूच्या तावडीतून बाहेर काढले.शिवराजच्या या धाडसाची ही कहाणी सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली आहे. शिवराजने ‘लोकमत’जवळ त्या दिवशीचा थरार सांगितला.शिवराज मांजरम (ता.नायगाव) येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकतो. देगाव (ता.नायगावचा) हे त्याचे मूळ गाव. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची़ वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. त्यामुळे शिवराज अंगणवाडीपासून आजोबा रामू गंगाराम केशवमोड यांच्याकडेच राहतो. केशवमोड हे देखील मजुरीचे काम करतात़ २० आॅगस्ट रोजी त्याचे आजोबा बाहेरगावी गेल्याने शाळेत पहिला तास संपल्यावर वर्गशिक्षक विजय काळे यांची परवानगी घेऊन शिवराज ४० शेळ्या चारण्यासाठी माळरानावर गेला. सकाळी ११ वाजता एका शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला़ मात्र पाऊस सुरू झाल्याने गावाकडे येता आले नाही. सायंकाळी पाच वाजता पाऊस कमी झाल्यावर तो ४० शेळ्यांना घेऊन गावाकडे जात होता.रस्त्यावरील एका पुलावरून पाणी वाहत असल्याने तो तिथेच थांबला. त्याच्यापाठोपाठ मजुरीचे काम करणारे भूमिहीन मजूरदार नामदेव कोंडिबा वंजारे (४८, रा.मांजरम) हे माधवराव उद्धवराव शिंदे यांच्या बैलांना घेवून गावाकडे निघाले होते. बैल न थांबल्याने वंजारेदेखील पुलावरून जात असताना वेगातील पाण्याच्या प्रवाहात ते पडले. ते वाहून जात असल्याचे लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता शिवराजने त्यांना बाहेर काढले. थोड्या वेळाने नामदेव गावाकडे आले. परंतु, शेळ्या जवळ असल्याने शिवराज तिथेच थांबला. काही वेळानंतर शेळीपालक व्यंकट लक्ष्मण विभूते (६०, रा.मांजरम) हे एक म्हैस व शेळ्यांना घेऊन गावाकडे जाण्यासाठी पुलाच्या अगदी जवळ थांबले असता पुलावरुन त्यांची म्हैस खाली पडली. पाठोपाठ पुलाचा काही भाग कोसळला.यातच विभूते पुराच्या पाण्यात पडले. ही घटना पाहून शिवराजने पुन्हा एकदा पाण्यात उडी घेतली़ तोपर्यंत विभूते यांनी दोन गटांगळ्या खाल्ल्या होत्या. तरीही शिवराजने त्यांना पकडून पोहत-पोहत विभूते यांनादेखील सुरक्षितपणे बाहेर काढले. या पुरात विभूते यांच्या चार शेळ्या वाहून गेल्या. या दोन्ही घटनांत मदत करताना शिवराजच्या आजोबाचा शेळ्यांमधील एक बोकड पुरात वाहून गेला. शिवराजच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.शाळेने केला सत्कारया घटनेनंतर दुसºया दिवशी शाळेत शिवराज उशिराने आल्यामुळे शिक्षकांनी त्यास कारण विचारले.शिवराजने घडलेली हकीकत सांगितली.त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक भुजंग सोनकांबळे यांनी शिवराजच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि ज्येष्ठांना ही माहिती दिली. या सर्व मंडळींनी शाळेत शिवराजचा कौतुक सोहळा घेतला. शिवराजला बालशौर्य पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी शाळेने व गावकºयांनी लेखी निवेदनाद्वारे लोकप्रतिनिधी व शासनाकडे केली आहे.अख्खी रात्र काढली जागूनशिवराजने सोबत शेळ्या असल्यामुळे व पुराचे पाणी कमी न झाल्याने व्यंकट विभूते यांच्यासह संपूर्ण रात्र मांजरम शिवारात जागून काढली. पहाटे तीननंतर ही मंडळी घराकडे परतली. 

आजोबांचेच योगदानया चांगल्या कामात आजोबांचेच खरे योगदान म्हणावे लागेल़ त्यांनी शाळेला सुटी घेऊन शेळ्या चारवण्यासाठी जाण्यास सांगितले़ म्हणून मी शेताकडे गेलो आणि या घटनेतून दोघांना वाचविले-शिवराज रामचंद्र भंडरवाड 

शिवराज देवरूपात धावला !पुलावरून कमरेएवढे पाणी वाहत होते. आम्हाला वाचतो असे वाटले नाही. पाण्याचा वेग जास्त होता. त्यावेळी शिवराज आमच्यासाठी देवरुपात धावून आला. त्याने स्वत: चा जीव धोक्यात घालून आम्हाला वाचविले. शिवराजच्या कामाबद्दल त्याचे कौतुक करायला आमच्याकडे शब्दच नाहीत. गावच्या बाईलेकीचं हे लेकरू खूप मोठ्ठं होवो.व्यंकट लक्ष्मण विभूते, नामदेव कोंडिबा वंजारे (रा.मांजरम.)

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसWaterपाणी