शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

तुती लागवडीतून आर्थिक कोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 11:49 IST

यशकथा : वार्षिक सुमारे ४५ हजार खर्चाच्या शेतीतून ४ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न काढत त्यांनी आर्थिक कोष उभारण्याची किमया साधली आहे.

- डॉ. गंगाधर तोगरे (कंधार, जि.नांदेड)

नावंद्याचीवाडी (ता. कंधार) येथील दत्ता माधवराव केंद्रे या शेतकऱ्याने आपल्या बोरी बु.मधील ३ एकर शेतीत रेशीम उद्योग उभारला आहे. वार्षिक सुमारे ४५ हजार खर्चाच्या शेतीतून ४ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न काढत त्यांनी आर्थिक कोष उभारण्याची किमया साधली आहे.

तालुक्यातील भौगोलिक क्षेत्रफळ पाहता शेती व्यवसाय करणे मोठे जिकिरीचे आहे. बालाघाट डोंगर, निसर्ग पावसावरील शेतीचे भवितव्य, पावसाचा लपंडाव, अल्प सिंचन आदीमुळे शेती संकटात असते; परंतु शेतीत नवीन प्रयोग करीत आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी मोजकेच असतात. त्यात दत्ता केंद्रे यांनी अथक परिश्रमाने, मानार प्रकल्पाच्या पाण्याचा योग्य वापर करीत तुती लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. बोरी बु. शिवारात तीन एकर शेतीची नांगरटी, पाळी, सरी तयार केली.

गत सात ते आठ वर्षांपासून हा प्रयोग करीत असल्याने बेणे घरचेच उपयोगात आणले. १५ हजार कांडीचे संगोपन केले. ३ बाय ५ बाय दीड अशा पद्धतीने लागवड केली. एका महिन्यात तीन एकरची झाडे तोडली जातात. विविध टप्प्यात अंडेपुंज तयार होतात. आजघडीला ५०० च्या आसपास रेशीम किड्यांची संख्या आहे. हे किडे रेशीम तयार करतात. एका वर्षात बारा ते तेरा क्विंटल रेशीम तयार होत असल्याचे दत्ता केंद्रे यांनी सांगितले. याचा भाव प्रति किलो ३०० ते ३५० रुपये असा आहे़ शेतात २५ बाय ८० आकाराच्या कीटक संगोपनगृह उभारून तेथे रेशीम किडे जतन केले जातात आणि रेशीम तयार करण्यासाठी ते उपयुक्त असल्याने त्यांची आवश्यक ती काळजी घेतली जाते.

तालुका कृषी कार्यालय व मंडळ कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळते. तुळशीराम नागरगोजे हाडोळी (जहा.) यांचे सततचे सहकार्य मिळते. त्यातून मिळणारी ऊर्जा क्रियाशील बनवते. केलेले परिश्रम, कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ यामुळे शेतीत काम करण्याचा नवा उत्साह मिळतो आणि थकवा लुप्त होतो. नांदेड, जालना, अंबाजोगाई या ठिकाणासह कर्नाटक राज्यात बाजारपेठ आहे. खर्च जाता चार लाखांच्या आसपास उत्पन्न मिळते. मागील वर्षी प्रति क्विंटल ६० हजारांचा भाव मिळाला होता. भावात चढ-उतार होत असतो; परंतु रेशीम उद्योग हा किफायतशीर बनत आहे हे एकंदरीत बाबीवरून दिसते.

बोरी बु़ गाव महादेव मंदिरामुळे चर्चेत आले आहे. गावासह परिसर भक्तिमय झाला आहे. शक्ती, उक्ती व भक्ती याचा सुरेख संगम साधत शेतकऱ्यांनी आपली शेती फुलविली आहे. त्यात केंद्रे यांनी  रेशीम शेतीचा प्रयोग केला आहे. तुतीची काळजी, रेशीम किडे यांचे संगोपन करीत, कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य घेत आर्थिक कोष निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी केला. पूर्वी बाजारपेठ ही बाब अवघड होती; परंतु आता विक्रीसाठी तितकी पायपीट करावी लागत नाही़.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी