शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पुनर्भरणामुळे बोअरचे पाणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:41 IST

दुष्काळावर मात व पाण्याची बचत करण्यासाठी बारूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाने छतावरील पाण्याचे पुनर्भरण करून हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच राबविला आहे़

ठळक मुद्देबारूळ ग्रा़पं़चा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच बारूळ येथील प्रा़आक़ेंद्रात यशस्वी प्रयोग

बारूळ : दुष्काळावर मात व पाण्याची बचत करण्यासाठी बारूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाने छतावरील पाण्याचे पुनर्भरण करून हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच राबविला आहे़बारूळ व परिसरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे़ मे महिन्यात बारूळ व परिसरातील अनेक बोअरचे पाणी आटल्या जाते किंवा अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत होते़ धरण उशाला असूनही अनेक बोअर व विहिरीच्या घशाला कोरड पडली आहे़पण जलसंधारण विभागातीलच असलेला हा उपक्रम पंचायत समिती बैठकीत गटविकास अधिकारी यांनी छतावरील पाण्यातून पुनर्भरण उपक्रम बारूळ येथे राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या़ हा उपक्रम चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून बारूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात आला़ यासाठी ग्रामपंचायत छतावरील सर्व पाणी छतावर एकत्रित करून ते सर्व पाणी पीव्हीसी पाईप लाईनद्वारे बोअरमध्ये सोडण्यात आले़ त्यामुळे या उन्हाळ्यात येथील रुग्णाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही़ हा उपक्रम प्रत्येक बोअरजवळील छतावरील पाण्याचे नियोजन करून या पाण्याचे योग्य विल्हेवाट सोय ग्रा़पं़ कार्यालयाच्या वतीने चालू आहे़ या उपक्रमामुळे प्रत्येक बोअर उन्हाळ्यात पाणी राहण्यासाठी मदत होते़ हा प्रयोग उपक्रम जिल्ह्यात प्रथमच बारूळ येथे करण्यात आला आहे़परिसरात हा उपक्रम राबविल्यास पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे़

बारूळ प्रा़आ़ केंद्रात दररोज १०० ते १५० बाह्य व आंतररुग्ण ओपीडी होते़ या रुग्णांचे दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती़ पण ग्रा़पं़ कार्यालयाच्या पुढाकारातून येथील बंद पडलेले बोअर चालू झाले़ त्याचे कारण छतावरील पाण्याचे बोअरमध्ये सोडून पुनर्भरणा केल्याने पाणीपातळी वाढली आहे-डॉ़आरक़े़ मुनेश्वर, वैद्यकीय अधिकारी, बारूऴरुग्णांच्या व येथील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्रयोग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतावरील पाण्यातून बोअरमध्ये पाईपलाईनद्वारे सोडून बोअरचे पुनर्भरण करण्यात आला़ हा उपक्रम साध्य झाल्याने येथील पाण्याच्या समस्या सुटल्या असून इतरांनाही पुनर्भरण केल्यास पाणीटंचाईचे संकट दूर होईल़-शंकरराव नाईक, सरपंच, बारूऴप्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतावरील पाण्यातुन पुनर्भरण करणे हा जिल्ह्यातील प्रथम उपक्रम बारूळ येथे करण्यात आला़ या उपक्रमामुळे पाण्याची बचत, टंचाईवर मात करून समस्या सोडवून या ग्रामपंचायतीने उपक्रमातून वेगळा आदर्श तयार केला आहे़ -डॉ़व्ही़जी़ आदमपूरकर, ग्रामविकास अधिकारी, बारूऴ

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई