शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पुनर्भरणामुळे बोअरचे पाणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:41 IST

दुष्काळावर मात व पाण्याची बचत करण्यासाठी बारूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाने छतावरील पाण्याचे पुनर्भरण करून हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच राबविला आहे़

ठळक मुद्देबारूळ ग्रा़पं़चा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच बारूळ येथील प्रा़आक़ेंद्रात यशस्वी प्रयोग

बारूळ : दुष्काळावर मात व पाण्याची बचत करण्यासाठी बारूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाने छतावरील पाण्याचे पुनर्भरण करून हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच राबविला आहे़बारूळ व परिसरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे़ मे महिन्यात बारूळ व परिसरातील अनेक बोअरचे पाणी आटल्या जाते किंवा अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत होते़ धरण उशाला असूनही अनेक बोअर व विहिरीच्या घशाला कोरड पडली आहे़पण जलसंधारण विभागातीलच असलेला हा उपक्रम पंचायत समिती बैठकीत गटविकास अधिकारी यांनी छतावरील पाण्यातून पुनर्भरण उपक्रम बारूळ येथे राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या़ हा उपक्रम चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून बारूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात आला़ यासाठी ग्रामपंचायत छतावरील सर्व पाणी छतावर एकत्रित करून ते सर्व पाणी पीव्हीसी पाईप लाईनद्वारे बोअरमध्ये सोडण्यात आले़ त्यामुळे या उन्हाळ्यात येथील रुग्णाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही़ हा उपक्रम प्रत्येक बोअरजवळील छतावरील पाण्याचे नियोजन करून या पाण्याचे योग्य विल्हेवाट सोय ग्रा़पं़ कार्यालयाच्या वतीने चालू आहे़ या उपक्रमामुळे प्रत्येक बोअर उन्हाळ्यात पाणी राहण्यासाठी मदत होते़ हा प्रयोग उपक्रम जिल्ह्यात प्रथमच बारूळ येथे करण्यात आला आहे़परिसरात हा उपक्रम राबविल्यास पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे़

बारूळ प्रा़आ़ केंद्रात दररोज १०० ते १५० बाह्य व आंतररुग्ण ओपीडी होते़ या रुग्णांचे दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती़ पण ग्रा़पं़ कार्यालयाच्या पुढाकारातून येथील बंद पडलेले बोअर चालू झाले़ त्याचे कारण छतावरील पाण्याचे बोअरमध्ये सोडून पुनर्भरणा केल्याने पाणीपातळी वाढली आहे-डॉ़आरक़े़ मुनेश्वर, वैद्यकीय अधिकारी, बारूऴरुग्णांच्या व येथील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्रयोग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतावरील पाण्यातून बोअरमध्ये पाईपलाईनद्वारे सोडून बोअरचे पुनर्भरण करण्यात आला़ हा उपक्रम साध्य झाल्याने येथील पाण्याच्या समस्या सुटल्या असून इतरांनाही पुनर्भरण केल्यास पाणीटंचाईचे संकट दूर होईल़-शंकरराव नाईक, सरपंच, बारूऴप्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतावरील पाण्यातुन पुनर्भरण करणे हा जिल्ह्यातील प्रथम उपक्रम बारूळ येथे करण्यात आला़ या उपक्रमामुळे पाण्याची बचत, टंचाईवर मात करून समस्या सोडवून या ग्रामपंचायतीने उपक्रमातून वेगळा आदर्श तयार केला आहे़ -डॉ़व्ही़जी़ आदमपूरकर, ग्रामविकास अधिकारी, बारूऴ

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई