शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अत्यल्प पावसामुळे किनवट तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 1:22 AM

तालुक्यात ११८ दिवसांच्या पावसाळ्यात केवळ ६९ दिवसच पावसाची नोंद झाली. २० दिवस दोन अंकी, ४९ दिवस केवळ एक अंकी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात मात्र १६ तारखेला तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत ८२१ मिलिमीटर म्हणजे ६६ टक्के इतक्याच पावसाची नोंद आहे़ त्यामुळे किनवट तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात ११८ दिवसांच्या पावसाळ्यात केवळ ६९ दिवसच पावसाची नोंद झाली. २० दिवस दोन अंकी, ४९ दिवस केवळ एक अंकी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात मात्र १६ तारखेला तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत ८२१ मिलिमीटर म्हणजे ६६ टक्के इतक्याच पावसाची नोंद आहे़ त्यामुळे किनवट तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.किनवट तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलिमीटर इतके असताना आजघडीला केवळ ८२१ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली आहे़ ११८ दिवसांच्या पावसाळ्यात ६९ दिवसच पावसाची नोंद झाली़ त्यात दोनअंकी पाऊस वीस वेळा, एक अंकी पाऊस ४९ वेळा झाला आहे़ १६ आॅगस्ट रोजी तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे़सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडला असल्याने व पडलेल्या पावसाचे पाणी वाहून गेल्याने तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़ सुरुवातीला म्हणजे पेरणीच्या वेळी चांगला पाऊस पडला़ त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने खरिपाची पेरणी केली़ नंतर मात्र पावसाने उघडीप दिली़पुढे पुढे पावसाने दगाच दिला अन् हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिसकावून गेल्यात जमा आहे़ जून महिन्यात सतरा दिवस, जुलै महिन्यात वीस दिवस, आॅगस्ट महिन्यात चोवीस दिवस व सप्टेंबर महिन्यात केवळ आठ दिवस पाऊस पडल्याची नोंद झाली आहे़ जून महिन्यात सतरा दिवसांत दहावेळा एक अंकी व सातवेळा दोन अंकी, जुलै महिन्यात तेरावेळा एक अंकी व सातवेळा, आॅगस्ट महिन्यात एकोणवीस वेळा एक अंकी तर केवळ पाचवेळा दोन अंकी पाऊस झाला आहे़ सप्टेंबर महिन्यात आठवेळा पाऊस पडला़ त्यात सातवेळा एक संकी तर एक वेळा दोन अंकी पाऊस झाला आहे़झालेल्या पावसाने नदीनाल्यांना पाणी आले़ प्रकल्प भरले मात्र बहुतांश प्रकल्प गाळात रुतलेले़ त्यामुळे जसजसे ऊन तापेल तसतसे नदी-नाले कोरडे पडतील़ प्रकल्प आटतील असेच चित्र राहणार आहे़ त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे टाकणार आहे़ तर खरिपाचा उताराही घटणार असल्याने तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली़ शासनाने किनवट तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे़ तशी मागणी आ़ प्रदीप नाईक यांनी लावून धरली. झालेला पाऊस याप्रमाणे - महिना झालेला पाऊस, पडावयाचा पाऊस या प्रमाणे जून १५१ (१७८), जुलै २२८ (३५७), आॅगस्ट ३६४ (३२२), सप्टेंबर ३६ (२२९) असा आहे़किनवट तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलिमीटर इतके असताना आजघडीला केवळ ८२१ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली.११८ दिवसांच्या पावसाळ्यात ६९ दिवसच पावसाची नोंद झाली़ त्यात दोनअंकी पाऊस वीस वेळा, एक अंकी पाऊस ४९ वेळा झाला आहे़ १६ आॅगस्ट रोजी तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे़

 

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाई