शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

फाळणीमुळे नव्हे तर द्वेषभावनेमुळेच गांधी हत्या - तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:09 AM

मुस्लिमांचे तुष्टीकरण आणि फाळणीला मान्यता दिल्यामुळेच गांधींची हत्या झाल्याचे सांगितले जाते़ मात्र फाळणी हे हत्येचे खरे कारण नाही़ तर धर्मवादी शक्तींनी त्यांचा दीर्घकाळ केलेला द्वेष हेच खरे कारण असल्याचे महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ अभ्यासक तुषार गांधी यांनी सांगितले़ ठोस पुरावा नसला तरी, गांधी हत्येच्या कटात सावरकरांचाही अप्रत्यक्ष सहभाग होता, असा आरोपही गांधी यांनी यावेळी केला़

ठळक मुद्देतुषार गांधी : कटात सावरकरांचाही अप्रत्यक्ष सहभाग

नांदेड : मुस्लिमांचे तुष्टीकरण आणि फाळणीला मान्यता दिल्यामुळेच गांधींची हत्या झाल्याचे सांगितले जाते़ मात्र फाळणी हे हत्येचे खरे कारण नाही़ तर धर्मवादी शक्तींनी त्यांचा दीर्घकाळ केलेला द्वेष हेच खरे कारण असल्याचे महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ अभ्यासक तुषार गांधी यांनी सांगितले़ ठोस पुरावा नसला तरी, गांधी हत्येच्या कटात सावरकरांचाही अप्रत्यक्ष सहभाग होता, असा आरोपही गांधी यांनी यावेळी केला़

येथील कुसुम सभागृहात साहित्य संमेलन व्याख्यानमालेत गांधी हत्येचे कारस्थानी आणि सावरकर या विषयावर ते बोलत होते़ यावेळी प्रा़ शेषराव मोरे, माजी खा़डॉ़व्यंकटेश काब्दे, उदय निंबाळकर, माजी मंत्री माधव किन्हाळकर, डॉ़वृषाली किन्हाळकर, प्रा़श्यामल पत्की, दीपनाथ पत्की, माजी आग़ंगाधरराव पटणे, प्रा़दत्ता भगत, डॉ़प्रभाकर देव, प्रा़लक्ष्मीकांत तांबोळी, प्राचार्य देवदत्त आणि प्रा़शारदा तुंगार आदी उपस्थित होते़

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे प्रत्यक्षरीत्या सामील होते़ हे दोघे त्यांना हत्यार पुरविणारे ग्वाल्हेरचे डॉ़परचुरे तसेच कटातील साथीदार विष्णू करकरे आणि दिगंबर बडगे हे सर्व स्वातंत्र्यवीर सावरकरांना गुरुस्थानी मानत़ त्यांच्या आज्ञेशिवाय ते कोणतेच कृत्य करीत नसत़ त्यामुळे गांधी हत्या खटल्यातून सावरकरांची ठोस पुराव्याअभावी सुटका झाली असली तरी, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे या कटात त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग होता़, असे तुषार गांधी यावेळी म्हणाले़ गांधीजींची हत्या ही भारताची सत्ता ताब्यात घेण्यासाठी धर्मवादी शक्तींनी रचलेल्या व्यापक कटाचे प्राथमिक पाऊल होते, असा दावाही त्यांनी केला़ सूत्रसंचालन डॉ़बालाजी चिरडे तर डॉ़विजय भोसले यांनी आभार मानले़