शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

किनवट तालुक्यांवर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:44 IST

पैनगंगा नदीचीही धार कमी होत चालली आहे़

ठळक मुद्देजनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीरनद्या, तलाव आटले, हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा सोसण्याची वेळ

गोकुळ भवरे।किनवट : तालुक्यात मागील पावसाळ्यात झालेल्या धरसोड व अल्प पर्जन्यमानामुळे छोटे, मोठे नाले कोरडेठाक पडू लागले आहेत़ पैनगंगा नदीचीही धार कमी होत चालली आहे़ माळरानावरील भागातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून येत्या काळात १ लाख ५९८४ जनावरांच्या चा-याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे़किनवट तालुक्यात १९१ गावे १०५ वाडीतांडे असून तालुक्यात गायवर्ग ७००३६ , म्हैस वर्ग ७ हजार २२ , शेळ्या २५ हजार ९३१ , मेंढ्या २हजार ९९५ असे एकूण १ लाख ५ हजार ९८४ पशुधन आहे़ चांगला पाऊस झाला तर जंगलात चारा व पाण्याची समस्या निर्माण होत नाही़ मात्र अलीकडच्या काळात पर्जन्यमान घटत चालल्याने भूगभार्तील पाणी पातळी खोल जाऊन पाणी टंचाईची समस्या उदभवते़ गतवर्षी पन्नास टक्केच्या आत पावसाळा झाला़ यावर्षी ६६ टक्के इतकी नोंद असली तरी धरसोड पध्दतीने पाऊस झाला़ ११८ दिवसाच्या पावसाळ्यात ६९ वेळा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे़ त्यातही २० वेळा दोन अंकी तर ४९ वेळा एक अंकी पाऊस पडला आहे़ पावसाचा खंड यामुळे नदीनाल्याना मोठा पूर आला असला तरी जमिनीत पाणी मुरलेच नाही़पावसाचा खंड पडला त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला़ पन्नास टक्केच्या आतच उतारा आल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ कमी पावसाचा फटका जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्यावर बसणार आहे़ हे संकट ओढवल्याने व बहुतांश गावांना टंचाईच्या झळा बसणार असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून टंचाई पूर्व उपाय योजना आतापासूनच राबवून नागरिक व पशुपालक यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़किनवट तालुक्यावर ओढवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने वेळीच पावले उचलत भविष्यात निर्माण होणाºया संकटाचा सामान करण्यासाठी सज्ज राहा, आतापासूनच तयारीला लागा, अशा सूचना आ़ प्रदीप नाईक यांनी संबंधितांना दिल्या आहेत़ संभाव्य परिस्थितीवर आपण लक्ष ठेऊन असल्याचे ही आ़ प्रदीप नाईक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़

टॅग्स :Nandedनांदेडriverनदीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई