शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

किनवट तालुक्यांवर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:44 IST

पैनगंगा नदीचीही धार कमी होत चालली आहे़

ठळक मुद्देजनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीरनद्या, तलाव आटले, हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा सोसण्याची वेळ

गोकुळ भवरे।किनवट : तालुक्यात मागील पावसाळ्यात झालेल्या धरसोड व अल्प पर्जन्यमानामुळे छोटे, मोठे नाले कोरडेठाक पडू लागले आहेत़ पैनगंगा नदीचीही धार कमी होत चालली आहे़ माळरानावरील भागातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून येत्या काळात १ लाख ५९८४ जनावरांच्या चा-याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे़किनवट तालुक्यात १९१ गावे १०५ वाडीतांडे असून तालुक्यात गायवर्ग ७००३६ , म्हैस वर्ग ७ हजार २२ , शेळ्या २५ हजार ९३१ , मेंढ्या २हजार ९९५ असे एकूण १ लाख ५ हजार ९८४ पशुधन आहे़ चांगला पाऊस झाला तर जंगलात चारा व पाण्याची समस्या निर्माण होत नाही़ मात्र अलीकडच्या काळात पर्जन्यमान घटत चालल्याने भूगभार्तील पाणी पातळी खोल जाऊन पाणी टंचाईची समस्या उदभवते़ गतवर्षी पन्नास टक्केच्या आत पावसाळा झाला़ यावर्षी ६६ टक्के इतकी नोंद असली तरी धरसोड पध्दतीने पाऊस झाला़ ११८ दिवसाच्या पावसाळ्यात ६९ वेळा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे़ त्यातही २० वेळा दोन अंकी तर ४९ वेळा एक अंकी पाऊस पडला आहे़ पावसाचा खंड यामुळे नदीनाल्याना मोठा पूर आला असला तरी जमिनीत पाणी मुरलेच नाही़पावसाचा खंड पडला त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला़ पन्नास टक्केच्या आतच उतारा आल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ कमी पावसाचा फटका जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्यावर बसणार आहे़ हे संकट ओढवल्याने व बहुतांश गावांना टंचाईच्या झळा बसणार असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून टंचाई पूर्व उपाय योजना आतापासूनच राबवून नागरिक व पशुपालक यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़किनवट तालुक्यावर ओढवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने वेळीच पावले उचलत भविष्यात निर्माण होणाºया संकटाचा सामान करण्यासाठी सज्ज राहा, आतापासूनच तयारीला लागा, अशा सूचना आ़ प्रदीप नाईक यांनी संबंधितांना दिल्या आहेत़ संभाव्य परिस्थितीवर आपण लक्ष ठेऊन असल्याचे ही आ़ प्रदीप नाईक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़

टॅग्स :Nandedनांदेडriverनदीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई