शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

किनवट तालुक्यांवर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:44 IST

पैनगंगा नदीचीही धार कमी होत चालली आहे़

ठळक मुद्देजनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीरनद्या, तलाव आटले, हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा सोसण्याची वेळ

गोकुळ भवरे।किनवट : तालुक्यात मागील पावसाळ्यात झालेल्या धरसोड व अल्प पर्जन्यमानामुळे छोटे, मोठे नाले कोरडेठाक पडू लागले आहेत़ पैनगंगा नदीचीही धार कमी होत चालली आहे़ माळरानावरील भागातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून येत्या काळात १ लाख ५९८४ जनावरांच्या चा-याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे़किनवट तालुक्यात १९१ गावे १०५ वाडीतांडे असून तालुक्यात गायवर्ग ७००३६ , म्हैस वर्ग ७ हजार २२ , शेळ्या २५ हजार ९३१ , मेंढ्या २हजार ९९५ असे एकूण १ लाख ५ हजार ९८४ पशुधन आहे़ चांगला पाऊस झाला तर जंगलात चारा व पाण्याची समस्या निर्माण होत नाही़ मात्र अलीकडच्या काळात पर्जन्यमान घटत चालल्याने भूगभार्तील पाणी पातळी खोल जाऊन पाणी टंचाईची समस्या उदभवते़ गतवर्षी पन्नास टक्केच्या आत पावसाळा झाला़ यावर्षी ६६ टक्के इतकी नोंद असली तरी धरसोड पध्दतीने पाऊस झाला़ ११८ दिवसाच्या पावसाळ्यात ६९ वेळा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे़ त्यातही २० वेळा दोन अंकी तर ४९ वेळा एक अंकी पाऊस पडला आहे़ पावसाचा खंड यामुळे नदीनाल्याना मोठा पूर आला असला तरी जमिनीत पाणी मुरलेच नाही़पावसाचा खंड पडला त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला़ पन्नास टक्केच्या आतच उतारा आल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ कमी पावसाचा फटका जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्यावर बसणार आहे़ हे संकट ओढवल्याने व बहुतांश गावांना टंचाईच्या झळा बसणार असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून टंचाई पूर्व उपाय योजना आतापासूनच राबवून नागरिक व पशुपालक यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़किनवट तालुक्यावर ओढवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने वेळीच पावले उचलत भविष्यात निर्माण होणाºया संकटाचा सामान करण्यासाठी सज्ज राहा, आतापासूनच तयारीला लागा, अशा सूचना आ़ प्रदीप नाईक यांनी संबंधितांना दिल्या आहेत़ संभाव्य परिस्थितीवर आपण लक्ष ठेऊन असल्याचे ही आ़ प्रदीप नाईक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़

टॅग्स :Nandedनांदेडriverनदीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई