शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Drought In Marathwada : कंधार तालुक्यातील सोनमाळ्यासह ४० तांडे ओसाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 5:26 PM

दुष्काळवाडा : सोनमाळतांड्यासह ४० हून अधिक, तांड्यांवरील स्त्री-पुरूष बालकांसह रोजगारासाठी भटकंती करीत असल्याने बहुतांश घरे कुलूपबंद असल्याचे भयावह चित्र आहे.

- गंगाधर तोगरे, कंधार (जि.नांदेड)

कंधार तालुक्यात दुष्काळी चटके, रोजगाराचा अभाव, मुला-मुलींचे विवाह व उच्चशिक्षणाचा प्रश्न आदींनी गांगरून गेलेल्या तांड्यावरील नागरिकांनी ऊसतोडणीसाठी व रोजगारासाठी हंगामी स्थलांतर केल्याने तांडे ओसाड पडल्याचे चित्र आहे. सोनमाळतांड्यासह ४० हून अधिक, तांड्यांवरील स्त्री-पुरूष बालकांसह रोजगारासाठी भटकंती करीत असल्याने बहुतांश घरे कुलूपबंद असल्याचे भयावह चित्र आहे.

तालुक्यात यावर्षी अवेळी झालेल्या व परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ यामुळे खरीप हंगामावर पाणी फेरले. बोंडअळीचा ससेमिरा, सोयाबीनची मर रोगाने केलेली वाताहत, पिकांचा घटलेला उतारा आदींने दुष्काळाच्या चटक्यात शेतकरी अडकला. खरीप हंगामाने शेतकरी व शेतमजुराची निराशा केली. त्यामुळे कामासाठी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी व विवाहाला लागणाऱ्या खर्चाची तजवीज करण्यासाठी ऊसतोड, बांधकाम, वीटकामासाठी नागरिकांना  हंगामी स्थलांतर करणे भाग झाले.

तालुक्यातील सोनमाळतांडाची उपजीविका कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहे. ९५ टक्के शेती निसर्गपावसावर आहे. कुटुंबसंख्या ८० पेक्षा अधिक आहे. दुष्काळाने शेतीची साथ मिळाली नाही. त्यामुळे जवळपास ७० % कुटुंब हंगामी स्थलांतरित झाली आहेत. अनेकांनी सोबतीला मुले घेऊन गेली आहेत. काहींनी वृद्ध माता-पित्यांना पशुधनाचा सांभाळ, मुलांच्या शिक्षणासाठी तांड्यावर ठेवले आहे. तालुक्यात नरेगातंर्गत कामे अत्यल्प चालू आहेत. सुमारे ४९० मजूर २९ कामावर असल्याचे समजते. कामे जलदगतीने व अधिक सुरु करण्याची मोठी उदासीनता आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर हंगामी स्थलांतरित होत आहेत.

सोनमाळतांड्याची जी स्थिती आहे. तशीच कमी अधिक प्रमाणात हिरामणतांडा, घणातांडा, ढाकूतांडा, रामातांडा, गणातांडा, रोहिदासतांडा, खेमातांडा, भोजूतांडा, गणपूरतांडा, दुर्गातांडा, उदातांडा, जयरामतांडा, रामानाईकतांडा, नरपटवाडीतांडा, पोमातांडा, रेखातांडा, वहादतांडा, दिग्रसतांडा, गुंटूरतांडा, महादेवमाळतांडा, लच्छमातांडा, हरिलालतांडा, गोविंदतांडा, बदुतांडा, गांधीनगर, राठोडनगर, लिंबातांडा, चोळीतांडा, केवळातांडा, महादेवतांडा, देवलातांडा, पटाचातांडा, घोडजतांडा, बाळांतवाडीतांडा, धर्मापुरीतांडा, गुलाबवाडीतांडा, पांगरातांडा, लालवाडीतांडा, बाचोटीतांडा, हाळदातांडा, चौकीमहाकायातांडा, कांशीरामतांडा, नेहरूनगरतांडा, बोळकातांडा, शिराढोणतांडा वाडी गावात अशीच स्थिती स्थलांतरित नागरिकांची आहे.

तांड्यावर प्राथमिक सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यात पुन्हा निसर्गाने दगा दिला की, घरप्रपंचाचे गणित कोलमडते. त्या फाटक्या संसाराला शिवण्यासाठी अशी कसरत करावी लागते. प्रत्यक्ष तांड्यावरील चित्र अतिशय वेदनादायक असेच आहे. उन्हाळा अद्याप दूर असून आता अशी स्थिती आहे. दोन महिन्यानंतर तांडे, वाडी, गावे पाणीटंचाई व दुष्काळाने होरपळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

बळीराजा काय म्हणतो ?

- गतवर्षी व यावर्षी दुष्काळाने जगणे कठीण केले आहे. रोजगार करण्यासाठी मुलगा व सून ऊसतोडणीसाठी गेले आहेत. माझे वय ८० असल्याने काम होत नाही. त्यामुळे मला येथे राहणे आवश्यक आहे. अन्यथा मी पण मुलासोबत गेले असते. दोन लेकरांचा सांभाळ करते. - केवळाबाई अंबादास पवार, (सोनमाळ तांडा, ता.कंधार)

- दिवसेंदिवस निसर्ग कोपत आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती बिघडत असल्याने रोजगार हवा. मुलगा, नातू, नातसून परराज्यात ऊसतोडणीसाठी गेले. माझे वय ९० आहे. श्रमाचे काम होत नाही. घरसांभाळ, पशुधन सांभाळ करावा लागतो. पाणी प्रश्न आहे. त्यात विद्युत पुरवठा ही समस्या आहे. - तोलबा बदु जाधव (सोनमाळतांडा ता.कंधार)

- तालुक्यात दुष्काळाचे चटके भयावह आहेत. नरेगातंर्गत कामे सुरू करण्यासाठी प्रशासन व संबंधित यंत्रणा उदासीन आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हंगामी स्थलांतरित होणे भाग पडत आहे. रोजगार, उद्योग, सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. - उत्तम चव्हाण, (पं.स.सदस्य, कंधार )

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाNandedनांदेड