शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

हदगाव तालुक्यातील दहा गावांतील योजनांची वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:39 AM

१४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : १४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा करणा-या योजनांचे वीजबिल थकल्याने दिवसेंदिवस बिलांचा आकडा वाढत गेला. दरम्यान, वीज पुरवठा खंडित केल्यानंतरच लोकप्रतिनिधींकडून दबाव टाकून चारअंकी आकड्याचे वीजबिल भरून वेळ मारून नेली जात आहे़ दरम्यान, ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर १३ व्या अथवा १४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठ्याचे बिल भरण्याची अनुमती मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिली आहे. तरीही गावपुढारी, ग्रामसेवक ही रक्कम भरण्यास तयार नाहीत़ त्यामुळे मार्च एण्डचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १० गावांतील पाणीपुरवठा करणाºया योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. विशेष म्हणजे, केवळ सावरगाव (माळ) या एकाच गावाने थकित बिलांचा भरणा केला आहे. तर विद्युत बिलांच्या थकबाकीदार यादीमध्ये मनाठा, पळसवाडी, चोरंबा (खु़), वरवट, कवाना, तालंग, माळझरा, जगापूर, गायतोंड, चेंडकापूर या गावांचा समावेश आहे़ मनाठा गावाकडे ५ लाख तर उर्वरित आठ गावांकडे २५ लाख रूपयांची थकबाकी आहे.थकबाकीपोटी महावितरणने या गावांची वीज खंडित करून आठवडा उलटला तरीही कोणत्याही ग्रामपंचायतींनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ग्रामस्थांकडून सेवाकर वसूल करून बिल भरण्याची तसदी घेतली नाही़ प्रत्येक गावांमध्ये दलित वस्ती, शाळा दुरुस्ती, संरक्षक भिंत, अंगणवाडी दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्याचा हिशेब व बिले काढण्यातच ही मंडळी व्यस्त आहे़ दुसरीकडे सर्वसामान्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ तर थकित वीजबिलांचा भरणा केल्याशिवाय संबंधित गावांतील वीजपुरवठा सुरळीत न करण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे़ त्यामुळे पाण्यासाठीची भटकंती कधी थांबेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे़वीजबिल भरल्याशिवाय जोडणी नाही- वाठोरेवीजबिल भरल्याशिवाय वीजजोडणी करण्यात येणार नाही़ कोणाच्याही दबावाला हे खाते बळी पडणार नाही़ कारण आमच्या नोकरीला धोका निर्माण होत असल्याने इतरांचा विचार का करावा? थकबाकी भरा असे आवाहन अभियंता व्ही़पी़ वाठोरे यांनी केले़

टॅग्स :WaterपाणीNandedनांदेडmahavitaranमहावितरणagricultureशेती