शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत जिल्हाधिकारी नांदेड डॉ. ...

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत जिल्हाधिकारी नांदेड डॉ. विपीन ईटनकर यांच्या संकल्पनेतून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियानाचे आयोजन करण्यात आले. परिसरात जवळपास ६० स्टॉल्सची उभारणी केली असून, लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात २६ जानेवारी रोजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सदर अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आ. अमरभाऊ राजूरकर, आ. मोहन अण्णा हंबर्डे, आ. बालाजीराव कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, माजी आ. हनुमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्यासह अधिकारी कर्मचारी, शेतकरी, ग्राहक उपस्थित होते.

उद्घाटनानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील यशस्वी शेतकऱ्यांची तसेच रयत बाजारात सहभागी शेतकऱ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात एकूण ११ शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या यशोगाथेची पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांना अशा पद्धतीने उत्पादित केलेल्या मालाची थेट विक्री केल्यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊन मालाची योग्य रक्कम मिळण्यासाठी मदत होईल, असे सांगितले.

या उपक्रमाला आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. राजेश पवार, पवार आदींनी भेट दिली.

शेतीमालाव्यतिरिक्त रेशीम उद्योग, मत्स्य व्यवसाय, गांडूळ खत, महिला बचत गट यांच्यामार्फत उत्पादित उत्पादने मोठ्या प्रमाणावर मांडण्यात आली आहेत. फळे, भाजीपाला विविध प्रकारचे धान्य, डाळी, मध, गूळ, ओल्या भुईमूग शेंगा अशी अनेक शेती उत्पादने त्याचबरोबर सफेद मुसळी, ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी, अशी नावीन्यपूर्ण उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती.

ग्राहकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

या उपक्रमात ग्राहकांना ताजा माल मिळत आहे आणि थेट विक्रीमुळे शेतकऱ्यांनासुद्धा अधिकचा दर मिळून फायदा होत आहे. २९ जानेवारीपर्यंत हा बाजार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू होणार आहे. यानंतरच्या काळातही अशा प्रकारच्या विक्रीचे काही स्टॉल्स जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ग्राहकांना उपलब्ध राहतील व शेतकऱ्यांचा थेट शेतीमाल विक्री करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांनी विविध माल खरेदी करून शेतकरी हित जोपासावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी केले आहे.