शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

धर्माबादेतील पंप हाऊस दुरुस्तीचे काम वेगाने सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:08 AM

येथील नगरपालिका अंतर्गत असलेल्या धर्माबाद शहराला एक नव्हे दोन दिवस नव्हे, तब्बल सात दिवसापासून ऐन उन्हाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले.

ठळक मुद्दे‘लोकमत’ इफेक्ट पालिका प्रशासन झाले जागे सात दिवसांपासून सुरु होता दूषित पाणी पुरवठा

धर्माबाद : येथील नगरपालिका अंतर्गत असलेल्या धर्माबाद शहराला एक नव्हे दोन दिवस नव्हे, तब्बल सात दिवसापासून ऐन उन्हाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. पंप दुरूस्ती करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून नांदेड येथील मेकॅनिकला बोलावण्यात आले. नगरपालिका वेगाने कामाला लागली. पंप दुरुस्तीमुळे २५ एप्रिल रोजी म्हणजेच आठव्या दिवशी शहराचा अख्खा पाणीपुरवठाच बंद करून टाकला.इळेगाव गोदावरी पात्रातून व बाभळी बंधारातून धर्माबाद शहराला पाणीपुरवठा होतो. इळेगाव गोदावरी पाञात दोन पंप असून त्यातील एक पंप मोटर आत खोलवर पाणी खेचतो़ तर एक पंप मोटर आत खोलवरच पाणी खेचत नाही. त्यातील एक पंप मोटर सात दिवसापूर्वीच खराब झाला तरी धर्माबाद नगरपालिकेने पंप दुरुस्तीसाठी काहीही हालचाली केल्या नाहीत. परिणामी नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. यंत्रणा ककामाला लागली. पंप दुरुस्तीसाठी नांदेडहून संबंधित कुशल कामगारांना बोलाविण्यात आले असून, संबंधित कामगारांनी पंप दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.‘लोकमत’च्या वृत्ताअगोदर पालिकेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना शहरात दूषित पाणी पुरवठा होत नसल्याचे माहिती नव्हते काय? नगरसेवकही यासंदर्भात काहीही बोलले नाहीत. हा एकूणच प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर आरोप नागरिकांंनी केला असून, दूषित पाण्यामुळे जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला पालिकेचे संबंधित जबाबदार राहतील, असेही नागरिकांंनी सांगितले.दुसरीकडे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात आनंदी आनंद आहे. विभागात अनुभवी आॅपरेटरची कमतरता आहे.पंप खराब झालाच तर काय करावे? काय करु नये? याचे ज्ञान सध्या असलेल्यांना नाही. एकूणच विभागात समन्वयाचा अभाव जाणवतो. दुसरीकडे पाणी पुरवठ्यावर मात्र लाखो रुपये खर्च दाखविला जातो, हा खर्च जातो कुठे? हा संशोधनाचा विषय आहे. नगरसेवकही याकडे लक्ष देण्यास तयार होत नसल्याने नागरिक नाराज झाले असून दाद मागावी कोणाकडे ? असा सवाल करीत आहेत.

पंप दुरूस्ती चालू असून बंधाऱ्यातील पाणीपातळी कमी झाली आहे. दुरूस्ती झाल्यानंतर शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल. जिल्हाधिकारी यांच्याकडे बळेगावचे पाणी सोडण्याची मागणी करणार आहोत-मंगेश देवरे, मुख्याधिकारी, धर्माबाद पालिकापाण्याची टाकी धुतली जात आहे जेथून पाणी घेतले जाते, तेथे प्रवाह नाही. पाणी डबक्यात जमा असल्याने ते खराब आहे. त्यामुळे दूषित पाणी येत असेल. इळेगाव गोदावरी येथील पंप खराब झाला आहे़ दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले.- अफजल बेगम अब्दूल सत्तार, नगराध्यक्षा, धर्माबादइळेगाव गोदावरीचे पंप हाऊस खराब होऊन सात दिवस झाले आहे. थेट रत्नाळीला होणारा पाणी पुरवठा दूषीत होत होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्याची मागणी केली आहे.-विनायकराव कुलकर्णी, उपनगराध्यक्ष, धर्माबाद

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाई