शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विद्यापीठाच्या सलग्न महाविद्यालयांत जुन्याच पद्धतीने पदवीचा अभ्यासक्रम

By प्रसाद आर्वीकर | Updated: June 17, 2023 15:58 IST

विद्यापीठ परिसर आणि स्वायत्त महाविद्यालयात या वर्षापासूनच नवीन शैक्षणिक धोरण लागू

नांदेड : नवीन शैक्षणिक धोरण की जुनेच, असा महाविद्यालयांसमोर निर्माण झालेला पेच आता मिटला आहे. शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १६ जून रोजी विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणेच पदवीचे प्रथम वर्षाचे प्रवेश दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र विद्यापीठ परिसर आणि स्वायत्त महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षापासूनच नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे.

राज्यात २०२३-२४ पासून नवीन शैक्षणिक धोरण-२०२० लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यासाठी नवीन अभ्यासक्रमदेखील तयार केला होता. मात्र नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी समोर येत आहेत. त्यामुळे या धोरणाची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षापासून करु नये, अशी मागणी केली जात होती. याच अनुषंगाने ९ जून रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतखाली सुकाणू समिती आणि सर्व अकृषीक विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत सुकाणू समितीने काही सुधारित शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार शासनाच्या उच्च तंत्र व शिक्षण मंत्रालयाने आदेश काढले असून, विद्यापीठांशी सलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये २०२४-२५ पासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे सलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये यावर्षीचे पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश जुन्या अभ्यासक्रमानुसारच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्वायत्त महाविद्यालयात नवे धोरणविद्यापीठ परिसरातील आणि स्वायत्त महाविद्यालयात मात्र २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासूनच नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवीचे प्रवेश होणार आहेत. नवीन धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणेच स्वायत्त महाविद्यालयांत पदवीचे शिक्षण दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

पदव्युत्तरसाठी अंमलबजावणी सुरुपदव्यु्त्तर अभ्यासक्रमासाठी मात्र राज्यात सर्वत्र नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करण्याची तयारी करावी लागणार आहे.

शासनाच्या निर्णयाचे स्वागतउच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांसोबत कुलगुरुंच्या झालेल्या बैठकीत शिक्षण धोरणाची अंमलबजावणी महाविद्यालयांमध्ये पुढील वर्षापासून करण्याचा निर्णय घेतला आहे. शासन निर्णयातील त्रुटी दूर करणे, विशेषत: विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य आणि कार्यभारावर प्रतिकुल परिणार होणार नाही, या दृष्टीने सुधारणा करणे गरजेचे आहे. तुर्तास शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत.- प्रा.डॉ.डी.एन. मोरे, विद्या परिषद सदस्य, स्वारातीम, नांदेड.

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडEducationशिक्षण