शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:29 IST

कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे़ त्यातच शासनाचा हमीभाव गतवर्षीपेक्षा १४०० रूपयांनी कमी आहे़ त्यामुळे बळीराजा दोन्हींकडून अडचणीत सापडला आहे़

ठळक मुद्देबळीराजा संकटात : भाव कमी असल्याने पणन महासंघाकडे शेतक-यांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे़ त्यातच शासनाचा हमीभाव गतवर्षीपेक्षा १४०० रूपयांनी कमी आहे़ त्यामुळे बळीराजा दोन्हींकडून अडचणीत सापडला आहे़ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या केंद्रावरील कापूस खरेदी निरंक आहे तर सीसीआयच्या केंद्रावर ५ टक्केदेखील खरेदी नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़नांदेडसह हिंगोली, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश शेतकरी आपले पांढरे सोने नांदेड जिल्ह्यात येणाºया परराज्यातील व्यापाºयांना विकतात़, परंतु यंदा चित्र बदलल्याचे पहायला मिळत आहे़ नांदेडसह मराठवाड्यातील कापसावर बोंडअळी (गुलाबीअळी)चा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे़ कापसाचे बोंड पूर्णपणे आतील बाजूने खाऊन टाकणाºया या बोंडअळीचा प्रादुर्भाव बीटी बियाणांनी रोखता येतो, असा दावा करणाºया औषध कंपन्या आणि कपाशी बियाणे कंपन्यांचे सर्वच दावे यंदा फोल ठरले आहेत़ जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्रात सव्वालाख हेक्टरची घट झाली असून यंदा जवळपास सव्वादोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली आहे़ परंतु, उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्क्यांनी घटले आहे़ नांदेड, हिंगोली तसेच तेलंगणा राज्यात मध्य प्रदेश आणि गुजरात येथील व्यापाºयांच्या जिनिंग फॅक्ट्री आहेत़ तसेच परराज्यातील व्यापारीदेखील गावागावांत जाऊन खरेदी करीत आहेत़ शासनाने मागील वर्षात कापसाला प्रतिक्विंटल ५७०० रूपये भाव दिला होता़ तर ४३२० रूपये प्रतिक्विंटल भाव आहे़ जवळपास १४ रूपये प्रतिक्विंटलमागे यंदा भाव कमी जाहीर केला़ त्यामुळे व्यापारीदेखील ४४०० ते ४६०० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे कापसाची खरेदी करीत आहेत़ विरोधी पक्षासह शेतकरी संघटनांनी कापसाला वाढीव भाव देण्याची मागणी केली आहे़ यासाठी आंदोलने, मोर्चे काढले़ त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सरकारकडून कापसाचा वाढीव हमीभाव दिला जाईल, अशी अपेक्षा आहे़त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कापूस घरातच ठेवल्याचे शेतकरी कदम यांनी सांगितले़ तर कापूस घेवून येईपर्यंत ४५०० रूपये भाव देण्याचे आश्वासन देवून व्यापारी कापूस चांगल्या प्रतीचा नसल्याचे सांगून ४३०० रूपयेच भाव देऊन शेतकºयांची लूट केली जात आहे़