शहरं
Join us  
Trending Stories
1
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
2
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
3
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
4
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
5
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
6
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
7
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
8
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
9
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
10
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
11
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
12
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
13
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
14
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
15
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
16
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
18
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
19
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
20
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:29 IST

कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे़ त्यातच शासनाचा हमीभाव गतवर्षीपेक्षा १४०० रूपयांनी कमी आहे़ त्यामुळे बळीराजा दोन्हींकडून अडचणीत सापडला आहे़

ठळक मुद्देबळीराजा संकटात : भाव कमी असल्याने पणन महासंघाकडे शेतक-यांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे़ त्यातच शासनाचा हमीभाव गतवर्षीपेक्षा १४०० रूपयांनी कमी आहे़ त्यामुळे बळीराजा दोन्हींकडून अडचणीत सापडला आहे़ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या केंद्रावरील कापूस खरेदी निरंक आहे तर सीसीआयच्या केंद्रावर ५ टक्केदेखील खरेदी नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़नांदेडसह हिंगोली, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश शेतकरी आपले पांढरे सोने नांदेड जिल्ह्यात येणाºया परराज्यातील व्यापाºयांना विकतात़, परंतु यंदा चित्र बदलल्याचे पहायला मिळत आहे़ नांदेडसह मराठवाड्यातील कापसावर बोंडअळी (गुलाबीअळी)चा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे़ कापसाचे बोंड पूर्णपणे आतील बाजूने खाऊन टाकणाºया या बोंडअळीचा प्रादुर्भाव बीटी बियाणांनी रोखता येतो, असा दावा करणाºया औषध कंपन्या आणि कपाशी बियाणे कंपन्यांचे सर्वच दावे यंदा फोल ठरले आहेत़ जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्रात सव्वालाख हेक्टरची घट झाली असून यंदा जवळपास सव्वादोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली आहे़ परंतु, उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्क्यांनी घटले आहे़ नांदेड, हिंगोली तसेच तेलंगणा राज्यात मध्य प्रदेश आणि गुजरात येथील व्यापाºयांच्या जिनिंग फॅक्ट्री आहेत़ तसेच परराज्यातील व्यापारीदेखील गावागावांत जाऊन खरेदी करीत आहेत़ शासनाने मागील वर्षात कापसाला प्रतिक्विंटल ५७०० रूपये भाव दिला होता़ तर ४३२० रूपये प्रतिक्विंटल भाव आहे़ जवळपास १४ रूपये प्रतिक्विंटलमागे यंदा भाव कमी जाहीर केला़ त्यामुळे व्यापारीदेखील ४४०० ते ४६०० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे कापसाची खरेदी करीत आहेत़ विरोधी पक्षासह शेतकरी संघटनांनी कापसाला वाढीव भाव देण्याची मागणी केली आहे़ यासाठी आंदोलने, मोर्चे काढले़ त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सरकारकडून कापसाचा वाढीव हमीभाव दिला जाईल, अशी अपेक्षा आहे़त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कापूस घरातच ठेवल्याचे शेतकरी कदम यांनी सांगितले़ तर कापूस घेवून येईपर्यंत ४५०० रूपये भाव देण्याचे आश्वासन देवून व्यापारी कापूस चांगल्या प्रतीचा नसल्याचे सांगून ४३०० रूपयेच भाव देऊन शेतकºयांची लूट केली जात आहे़