शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

दोन पाळ्यांचा निर्णय अन्यायकारक- धोंडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:26 IST

मुंबईत झालेल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना केवळ दोन पाळ्या देऊन बोळवण करण्याचा निर्णय हा या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाचे वेधले लक्षशेतीसिंचन टाळण्याचा हा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : मुंबईत झालेल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना केवळ दोन पाळ्या देऊन बोळवण करण्याचा निर्णय हा या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले.याबाबत जलसंपदा विभागाला निवेदन देण्यात आले आहे. त्यात विष्णुपुरी प्रकल्प हा यावर्षी शंभर टक्के भरला असून मुबलक जलसाठा आहे. रब्बी हंगामासाठी किमान चार ते पाच आवर्तने (पाणी पाळ्या) लागतात व एवढे पाणी असताना चुकीची आकडेवारी देऊन शेती सिंचनापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा हा डाव असल्याचे सांगून मागील दहा वर्षापासून नांदेड शहरासाठी कधीही २५ ते २७ दलघमीच्यावर पाणी लागले नाही. बाष्पीभवन (१०) दलघमी धरले तरीही व नदी काठावरील उपसा १० ते १२ दलघमी असून धरणात एकूण ८२ दलघमी १०० टक्के भरल्यावरचा साठा असतो.उर्वरित ३० ते ३२ दलघमी शिल्लक साठ्यात प्रतिपाणी पाळी ६ ते ७ दलघमी लागणारे पाणी फक्त पहिल्या पाणी पाळीला ७ ते ९ दलघमी लागेल. पण चार ते पाच पाळ्या देता येत असताना व यापूवीर्ही सन २०११, २०१२ व २०१३ च्या हंगामात त्या दिल्या गेल्याही होत्या पण, आता मात्र जाणीवपूर्वक शेती सिंचन टाळण्याचे प्रयत्न आहे, ही बाब चुकीची आहे.जलसंपदा विभागाकडून व जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही पाण्याची व आरक्षणाची चुकीची माहिती दिली, तरीही या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही,याची खबरदारी घेतली पाहिजे होती.पण तसे झाले नाही. खरे तर यापूर्वी शेती सिंचन प्रकल्प पाण्याचे नियोजन आघाडी सरकारच्या काळात स्थानिक कालवा सल्लागार समितीकडे होते.या सरकरच्या काळात ते मुंबईत गेले.त्यांना फारशी माहिती नसते.गत वर्षीच्या हंगामात तर दोन महिने उशिरा पाणी सोडले. त्याचा शेतकऱ्यांना काहीही लाभ झाला नाही. यावर्षी तर दुष्काळाची स्थिती आहे. त्यामध्ये हा निर्णय आणखी शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे.

  • दोन पाणी पाळ्या रब्बी हंगामात देण्याची पाठ थोपवून घेणाऱ्यांनी दोन पाण्यात कोणती रब्बीची पिके पूर्णपणे घेता येतात ते ही सांगावे. सगळीकडेच अंधेरी नगरी चौपट राजा अशी अवस्था जनतेची झाली आहे. खरीप हंगाम हातून गेलाच आहे.आता किमान रब्बीचा हंगाम जाऊ नये यासाठी गहू, हरभरा, पिकासाठी चार ते पाच पाणी पाळ्या सोडाव्यात अशी मागणी धोंडगे यांनी केली.
  • उर्वरित ३० ते ३२ दलघमी शिल्लक साठ्यात प्रतिपाणी पाळी ६ ते ७ दलघमी लागणारे पाणी फक्त पहिल्या पाणी पाळीला ७ ते ९ दलघमी लागेल. पण चार ते पाच पाळ्या देता येत असताना व यापूवीर्ही सन २०११, २०१२ व २०१३ च्या हंगामात त्या दिल्या गेल्याही होत्या पण, आता मात्र जाणीवपूर्वक शेती सिंचन टाळण्याचे प्रयत्न आहे, ही बाब चुकीची आहे.
टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाई