शहरं
Join us  
Trending Stories
1
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
2
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
3
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
4
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
5
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
6
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
7
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
8
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
9
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
10
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
11
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
12
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
13
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
14
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
15
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
16
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
17
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
18
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
19
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
20
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना

दोन पाळ्यांचा निर्णय अन्यायकारक- धोंडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:26 IST

मुंबईत झालेल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना केवळ दोन पाळ्या देऊन बोळवण करण्याचा निर्णय हा या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाचे वेधले लक्षशेतीसिंचन टाळण्याचा हा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : मुंबईत झालेल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना केवळ दोन पाळ्या देऊन बोळवण करण्याचा निर्णय हा या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले.याबाबत जलसंपदा विभागाला निवेदन देण्यात आले आहे. त्यात विष्णुपुरी प्रकल्प हा यावर्षी शंभर टक्के भरला असून मुबलक जलसाठा आहे. रब्बी हंगामासाठी किमान चार ते पाच आवर्तने (पाणी पाळ्या) लागतात व एवढे पाणी असताना चुकीची आकडेवारी देऊन शेती सिंचनापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा हा डाव असल्याचे सांगून मागील दहा वर्षापासून नांदेड शहरासाठी कधीही २५ ते २७ दलघमीच्यावर पाणी लागले नाही. बाष्पीभवन (१०) दलघमी धरले तरीही व नदी काठावरील उपसा १० ते १२ दलघमी असून धरणात एकूण ८२ दलघमी १०० टक्के भरल्यावरचा साठा असतो.उर्वरित ३० ते ३२ दलघमी शिल्लक साठ्यात प्रतिपाणी पाळी ६ ते ७ दलघमी लागणारे पाणी फक्त पहिल्या पाणी पाळीला ७ ते ९ दलघमी लागेल. पण चार ते पाच पाळ्या देता येत असताना व यापूवीर्ही सन २०११, २०१२ व २०१३ च्या हंगामात त्या दिल्या गेल्याही होत्या पण, आता मात्र जाणीवपूर्वक शेती सिंचन टाळण्याचे प्रयत्न आहे, ही बाब चुकीची आहे.जलसंपदा विभागाकडून व जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही पाण्याची व आरक्षणाची चुकीची माहिती दिली, तरीही या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही,याची खबरदारी घेतली पाहिजे होती.पण तसे झाले नाही. खरे तर यापूर्वी शेती सिंचन प्रकल्प पाण्याचे नियोजन आघाडी सरकारच्या काळात स्थानिक कालवा सल्लागार समितीकडे होते.या सरकरच्या काळात ते मुंबईत गेले.त्यांना फारशी माहिती नसते.गत वर्षीच्या हंगामात तर दोन महिने उशिरा पाणी सोडले. त्याचा शेतकऱ्यांना काहीही लाभ झाला नाही. यावर्षी तर दुष्काळाची स्थिती आहे. त्यामध्ये हा निर्णय आणखी शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे.

  • दोन पाणी पाळ्या रब्बी हंगामात देण्याची पाठ थोपवून घेणाऱ्यांनी दोन पाण्यात कोणती रब्बीची पिके पूर्णपणे घेता येतात ते ही सांगावे. सगळीकडेच अंधेरी नगरी चौपट राजा अशी अवस्था जनतेची झाली आहे. खरीप हंगाम हातून गेलाच आहे.आता किमान रब्बीचा हंगाम जाऊ नये यासाठी गहू, हरभरा, पिकासाठी चार ते पाच पाणी पाळ्या सोडाव्यात अशी मागणी धोंडगे यांनी केली.
  • उर्वरित ३० ते ३२ दलघमी शिल्लक साठ्यात प्रतिपाणी पाळी ६ ते ७ दलघमी लागणारे पाणी फक्त पहिल्या पाणी पाळीला ७ ते ९ दलघमी लागेल. पण चार ते पाच पाळ्या देता येत असताना व यापूवीर्ही सन २०११, २०१२ व २०१३ च्या हंगामात त्या दिल्या गेल्याही होत्या पण, आता मात्र जाणीवपूर्वक शेती सिंचन टाळण्याचे प्रयत्न आहे, ही बाब चुकीची आहे.
टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाई