शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

दोन पाळ्यांचा निर्णय अन्यायकारक- धोंडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:26 IST

मुंबईत झालेल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना केवळ दोन पाळ्या देऊन बोळवण करण्याचा निर्णय हा या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाचे वेधले लक्षशेतीसिंचन टाळण्याचा हा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : मुंबईत झालेल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना केवळ दोन पाळ्या देऊन बोळवण करण्याचा निर्णय हा या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले.याबाबत जलसंपदा विभागाला निवेदन देण्यात आले आहे. त्यात विष्णुपुरी प्रकल्प हा यावर्षी शंभर टक्के भरला असून मुबलक जलसाठा आहे. रब्बी हंगामासाठी किमान चार ते पाच आवर्तने (पाणी पाळ्या) लागतात व एवढे पाणी असताना चुकीची आकडेवारी देऊन शेती सिंचनापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा हा डाव असल्याचे सांगून मागील दहा वर्षापासून नांदेड शहरासाठी कधीही २५ ते २७ दलघमीच्यावर पाणी लागले नाही. बाष्पीभवन (१०) दलघमी धरले तरीही व नदी काठावरील उपसा १० ते १२ दलघमी असून धरणात एकूण ८२ दलघमी १०० टक्के भरल्यावरचा साठा असतो.उर्वरित ३० ते ३२ दलघमी शिल्लक साठ्यात प्रतिपाणी पाळी ६ ते ७ दलघमी लागणारे पाणी फक्त पहिल्या पाणी पाळीला ७ ते ९ दलघमी लागेल. पण चार ते पाच पाळ्या देता येत असताना व यापूवीर्ही सन २०११, २०१२ व २०१३ च्या हंगामात त्या दिल्या गेल्याही होत्या पण, आता मात्र जाणीवपूर्वक शेती सिंचन टाळण्याचे प्रयत्न आहे, ही बाब चुकीची आहे.जलसंपदा विभागाकडून व जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही पाण्याची व आरक्षणाची चुकीची माहिती दिली, तरीही या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही,याची खबरदारी घेतली पाहिजे होती.पण तसे झाले नाही. खरे तर यापूर्वी शेती सिंचन प्रकल्प पाण्याचे नियोजन आघाडी सरकारच्या काळात स्थानिक कालवा सल्लागार समितीकडे होते.या सरकरच्या काळात ते मुंबईत गेले.त्यांना फारशी माहिती नसते.गत वर्षीच्या हंगामात तर दोन महिने उशिरा पाणी सोडले. त्याचा शेतकऱ्यांना काहीही लाभ झाला नाही. यावर्षी तर दुष्काळाची स्थिती आहे. त्यामध्ये हा निर्णय आणखी शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे.

  • दोन पाणी पाळ्या रब्बी हंगामात देण्याची पाठ थोपवून घेणाऱ्यांनी दोन पाण्यात कोणती रब्बीची पिके पूर्णपणे घेता येतात ते ही सांगावे. सगळीकडेच अंधेरी नगरी चौपट राजा अशी अवस्था जनतेची झाली आहे. खरीप हंगाम हातून गेलाच आहे.आता किमान रब्बीचा हंगाम जाऊ नये यासाठी गहू, हरभरा, पिकासाठी चार ते पाच पाणी पाळ्या सोडाव्यात अशी मागणी धोंडगे यांनी केली.
  • उर्वरित ३० ते ३२ दलघमी शिल्लक साठ्यात प्रतिपाणी पाळी ६ ते ७ दलघमी लागणारे पाणी फक्त पहिल्या पाणी पाळीला ७ ते ९ दलघमी लागेल. पण चार ते पाच पाळ्या देता येत असताना व यापूवीर्ही सन २०११, २०१२ व २०१३ च्या हंगामात त्या दिल्या गेल्याही होत्या पण, आता मात्र जाणीवपूर्वक शेती सिंचन टाळण्याचे प्रयत्न आहे, ही बाब चुकीची आहे.
टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाई