शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

बिलोली शहरासह ग्रामीण भागातील ओसाड विहिरी बनल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:53 AM

तालुक्यातील ग्रामीण तथा शहरी भागात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी विहिरी खोदण्यात आल्या होत्या. परंतु, दिवसेंदिवस जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्याने तसेच नागरिकांनी बोअरवेल जास्त घेतल्याने विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे.

ठळक मुद्देविहिरींवर लोखंडी पिंजरे टाकणे गरजेचे

बिलोली : तालुक्यातील ग्रामीण तथा शहरी भागात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी विहिरी खोदण्यात आल्या होत्या. परंतु, दिवसेंदिवस जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्याने तसेच नागरिकांनी बोअरवेल जास्त घेतल्याने विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे. परिणामी, ओसाड पडलेल्या विहिरी लहान मुले तथा मोकाट गुराढोरांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरत आहेत. त्या ओसाड विहिरीवर स्थानिक प्रशासनाने लोखंडी पिंजरे टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.३० ते ३५ वर्षांआधी पाण्याच्या दृष्टीने घरोघरी विहिरी खोदल्या गेल्या होत्या. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी जनतेचे हित जोपासून ग्रामीण तथा शहरी भागात विहिरींची निर्मिती प्रशासनाने केली होती. त्यामुळे ज्याच्या घरी विहिरी नव्हत्या, त्यांना सार्वजनिक ठिकाणच्या विहिरींवरुन पाणी भरणे सोपे जात होते. पाणी भरण्याच्या दृष्टीने नागरिकांना विहिरींचे अनन्यसाधारण महत्त्व होते.परंतु, दिवसेंदिवस विहिरींतील पाण्याची पातळी खोल गेल्याने ग्रामीण तथा शहरी भागात बोअरवेलची निर्मिती करण्यात आली. त्याद्वारे पिण्याचे पाणी सार्वजनिक नळ तसेच घरगुती नळाद्वारे पोहोचविणे शक्य झाले. त्यामुळे सर्वात आधी घरगुती विहिरी पूर्णपणे आटल्याने त्या माती अथवा स्लब टाकून बुजविण्यात आल्या. परंतु, ग्रामीण तथा शहरी भागात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या ओसाड विहिरी अजूनही उघड्याच आहेत. त्यावर कोणत्याच प्रकारचे लोखंडी पिंजरे नसल्याने मोकाट जनावरे, लहान मुलांच्या जीविताच्या दृष्टीने धोकादायक बनल्या आहेत. धार्मिक सण जसे पतंग उत्सवात मुले पतंग उडवताना तसेच खेळताना इतके मग्न होतात की, पतंगाच्या मागे लागल्याने या ओसाड विहिरींचे शिकार बनतात.या ओसाड विहिरी अतिशय जुन्या असल्याने काठ पूर्णपणे ढासाळले आहेत. परिणामी मुले, जनावरे त्यात पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण तथा शहरी भागातील ओसाड विहिरी ज्या प्रशासनाच्या अंतर्गत येतात त्यावर त्यांनी लोखंडी पिंजरे टाकण्याची मागणी ग्रामीण व शहरी भागातून होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी