शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

नुकसानग्रस्त पिकांचे कृषी विभागाकडून पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:41 IST

नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे उष्ण हवामानामुळे तीन एकर केळी पीक करपून जाऊन शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १६ मे रोजी प्रकाशित होताच नांदेड कृषी विभागाने तातडीने केळी पिकांची पाहणी केली व शेतक-याला नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे अहवाल सादर केला.

ठळक मुद्देकेळीची बाग करपली नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे केला अहवाल सादर

मालेगाव : नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे उष्ण हवामानामुळे तीन एकर केळी पीक करपून जाऊन शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १६ मे रोजी प्रकाशित होताच नांदेड कृषी विभागाने तातडीने केळी पिकांची पाहणी केली व शेतक-याला नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे अहवाल सादर केला.शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. नांदेड जिल्ह्यात काही दिवसांपासून उष्णतेने उच्चांकी गाठली आहे. या उष्णतेचा परिणाम आता शेती पिकांवर होऊन शेतक-यावर नवे संकट उभे राहिले आहे. नांदुसा येथील शेतकरी गणेश तुकाराम जनकवाडे व मारोती तुकाराम जनकवाडे यांनी तीन एकर शेतीमध्ये केळीची लागवड केली आहे. त्यांच्या शेतात केळी उत्पादनास मुबलक पाणी उपलब्ध आहे. परंतु उष्णतेमुळे तीन एकरमधील केळी करपून गेली आहे. शिवाय पाने फाटल्यामुळे केळीच्या घडांची वाढ खुंटून ते गळून पडत आहेत. सध्या बाजारात केळी पिकांना मोठी मागणी असून ऐन हंगामाच्या काळात जनकवाडे यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याकडे कृषी विभागाच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केले होते.या बाबतच्या नुकसानीचे वृत्त १६ मे रोजी प्रकाशित झाल्यानंतर कृषी विभागाला जाग आली. त्याच दिवशी नांदेड कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक अश्विनी वासालकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसान झालेल्या केळी पिकांची पाहणी केली व नुकसानीचा अहवाल पीक विमा कंपनीकडे पाठविला आहे.पिकांची पाहणी गरजेचीजिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे अनेक तालुक्यातील केळी, संत्रा, मोंसबी, डाळींबाच्या बागा सुकल्या आहेत़ अनेक वर्षांपासून जगविलेली झाडे अचानक करपत असल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे़ त्यामुळे सर्वच ठिकाणी पाहणी करण्याची गरज आहे़

नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे प्रखर उष्णतेमुळे केळीचे नुकसान झाले. उष्ण हवामानामुळे पाने फाटून केळीची वाढ होत नाही. यामुळे केळीचे घडही गळून पडत आहेत. नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे अहवाल सादर केला आहे -अश्विनी वासालकर, कृषी सहायक, नांदेड

टॅग्स :NandedनांदेडTemperatureतापमानdroughtदुष्काळFarmerशेतकरी