शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

'या' शेतकऱ्यांना स्मशानभूमी ठरतेय वरदान; पावसापासून लाख मोलाच्या शेतमालाचे होतेय संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2021 2:02 PM

अंत्यविधी एकही झाला नाही पण सोयाबीन ठेवण्यासाठी होतोय उपयोग

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली स्मशानभूमी

- सुनील चौरे

हदगाव ( नांदेड ) : सततच्या पावसामुळे ( Heavy Rainfall in Nanded ) तालुक्यातील सोयाबीन काढणी खोळंबली आहे. जस जमेल तसं शेतकरी पिक काढून घेत आहेत. मात्र, पावसाचा तडाखा सुरुच आहे. यावेळी केदारनाथ येथिल ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत बांधलेली स्मशानभूमी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतकरी काढलेले सोयाबीन येथेच पावसापासून रक्षण करण्यासाठी साठवून ठेवत आहेत. ( crematorium became boon to 'this' farmers )

सन २०१०-११ मध्ये बांधलेल्या ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत या स्मशानभूमीत अद्याप एकही अंत्यविधी झाला नाही. या स्मशानभूमीसमोर खंडु बाजीराव भिसे आणि त्यांच्या भावांची शेती आहे. त्यांना आठ एकर जमीन आहे. शेतीच्या बाजूने नाला आहे. शेतात मळणी यंत्र जात नाही. रस्त्यावर सोयाबीनसजा ढिग करण्यासाठी मुबलक जागा नाही. पण शेतासमोरील बांधलेली स्मशानभूमी रिकामीच असल्याने यांच्या डोक्यात एक कल्पना आली. आपण सोयाबीन येथे आणून जमा केले तर पावसामुळे होणारे नुकसान टाळता येईल. रस्त्यावर सोयाबीन आल्याने मळणी यंत्र ही मिळेल. दिड किमी डोक्यावर सोयाबिन घेऊन दिवसभर आठ दहा चक्करा करत चारही भावांनी सोयाबीन स्मशानभूमीतील सुरक्षित स्थळी ठेवले आहे. पीक सुरक्षित असल्याने त्याचे समाधान या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकू लागले आहे.

स्मशानभूमी ठरतेय वरदानअतिवृष्टी झाली नसती तर मळणी यंत्र शेतात आले असते. पण दोन वर्षांपासून आम्हाला स्मशानभूमीचा आधार घ्यावा लागत आहे. खरं तर ग्रामीण भागात स्मशानभूमीकडे कोणी सहसा फिरकतच नाही. पण केदारनाथ येथील स्मशानभूमी शेतकऱ्यांना मदत करीत असल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी आता मागे पुढे या स्मशानभूमीचा उपयोग घेत आहेत. आता हिरवं असलेल सोयाबीन बाजुला काढून दोन दिवस वाळवता येईल. दोन चार दिवस मळणी यंत्र नाही मिळाले तरी अडचण नाही असे खंडु भिसे म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस