शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कोरोना, केंद्राचा आर्थिक असहकार; संकटांचा सामना करत महाविकास आघाडी दमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 12:33 IST

Ashok Chavhan On Mahavikas Aaghdi Govt: केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

नांदेड : राज्यात महाविकास आघाडी ( Mahavikas Aaghadi ) सरकारच्या काळातच कोरोना ( Corona Virus ) महामारीचे संकट आणि केंद्र सरकारने राज्याशी पुकारलेला असहकार या दोन्ही संकटांचा युद्धपातळीवर मुकाबला करत राज्य सरकार टिकून आहे (Mahavikas Aghadi is strong by facing adversity) . आज सरकारची दोन वर्ष पूर्ण झाली असून, जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यात सरकारला यश आले आहे. यापुढेही आत्मविश्वासाने आणि मजबुतीने महाविकास आघाडी जनतेचे काम करेल, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavhan ) यांनी व्यक्त केले. (Ashok Chavhan On Mahavikas Aaghdi Govt's 2yrs ) 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. कोरोना या जागतिक महामारीमुळे राज्याच्या तिजोरीला १ लाख ५७ हजार कोटींचा फटका बसला. परंतु, या परिस्थितीतही नैसर्गिक संकटात सापडलेल्या सामान्य जनतेला खंबीरपणे साथ देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. यामध्ये जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी अल्पावधीतच हजारो खाटांची उपलब्धता करुन लाखो नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम या सरकारने केले. त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी योजनेत ३०.७७ लाख शेतकऱ्यांना १९ हजार ६४४ कोटी रुपयांचा लाभ दिला. पिकांच्या नुकसानभरपाईपोटी एनडीआरएफच्या निकषाहूनही अधिक मदत देणारे दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जाहीर केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. क्यार, महाचक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ यातून बाधित झालेल्या नागरिकांना ८ हजार ३५६ कोटी तर गारपीट, अवेळी पाऊस, शेतीचे नुकसान, अतिवृष्टी आदींचा फटका बसलेल्या नागरिकांना ३ हजार ३९६ कोटी असे एकूण ११ हजार ७५२ कोटी रुपये देण्याचे काम सरकारने केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

राज्य सरकारची केंद्राकडून आर्थिक कोंडीमहाविकास आघाडी सरकार कोरोना या महामारीबरोबरच नैसर्गिक आपत्तींचा सामना करत असताना, केंद्राने राज्याच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे. परंतु, केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. जीएसटीचा राज्याचा वाटा आणि परतावा वेळेवर दिला नाही. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या, पालघर येथील साधूंचे हत्याकांड अशा प्रकरणात जाणीवपूर्वक राज्य सरकारची बदनामी केले. सरकारमधील नेत्यांच्या पाठीमागे केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा लावला. परंतु, सरकारच्या प्रामाणिकपणामुळे आजघडीला राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये जनतेने भाजपला जागा दाखवून देण्याचे काम केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

एनसीबीच्या कारवाईचे चव्हाणांकडून समर्थननांदेड जिल्ह्यात एनसीबीच्या पथकाने गांजाप्रकरणी केलेल्या कारवाईचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी समर्थन केले. जनहितासाठी अशा प्रकारच्या कारवाई होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच राज्यात ज्याठिकाणी दंगली घडविण्याचा कट काही समाजकंटक तसेच काही संघटनांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकार