शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

देशात पाण्याची मोठी समस्या, केंद्र सरकार फक्त तमाशा बघत आहे; मुख्यमंत्री KCR यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 17:50 IST

'आपल्या देशात पाण्याचा मोठा साठा, तरीदेखील पाण्यासाठी राज्या-राज्यांमध्ये वाद निर्माण केले जात आहेत.'

नांदेड: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये जाहिर सभा घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत देशातील पाणी समस्येवर प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा अजेंडाही सांगितले. ते म्हणाले, विचारधारा बदलली तर भारत बदलेल. भारताला बदलण्यासाठी आमचा पक्ष खूप प्रयत्न करेल. देशात लोकांची दिशाभूल केली जाते. देशात पाण्याचा मुभलक साठा आहे. आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. आपल्या देशात 1.40 लाख टीएमसी पाऊस पडतो. त्यातील अर्ध्याचे बाष्पीकरण होते. उरलेले पाण्यातील मोठा साठा वाया जातो. कोणत्याच सरकारने कधीच पाण्याचे योग्य नियोजन केले नाही.

सरकार दमदार असेल, योजना बदलल्या तर प्रत्येकाला पाणी मिळू शकते. देशात चांगले पाणी मिळत नाही, केंद्र सरकार फक्त तमाशा बघतंय. सतलज-रावीसाठी पंजाब लढतोय, गोदावरीसाठी महाराष्ट्र-कर्नाटक लढतोय, महानदीसाठी ओरिसा लढतोय. पाण्याचा मुभलक साठा आहे, देवाने आपल्याला पाणी दिलंय. पण, देशातील नागरिक पाण्यापासून वंचित आहे. योग्य नियोजन केल्यावर प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल.

पाण्याची संपत्ती देशात आहे, तरीदेखील देशातील लोकांना यासाठी त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचा पाण्याबाबत मोठा अजेंडा आहे. सरकार खोटं बोलून दिशाभूल करत आहे. त्यामुळे देशाला एक दिशा देणारे सरकार आले पाहिजे. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पाण्यासाठी कोणाकडे भीक मागायची गरज नाही, आपण योग्य नियोजन केले पाहिजे. त्यामुळेच मी म्हणतोय, देशात विचारधारा बदलली पाहिजे.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandaनंदा water shortageपाणीकपातMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण