शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

देशात पाण्याची मोठी समस्या, केंद्र सरकार फक्त तमाशा बघत आहे; मुख्यमंत्री KCR यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 17:50 IST

'आपल्या देशात पाण्याचा मोठा साठा, तरीदेखील पाण्यासाठी राज्या-राज्यांमध्ये वाद निर्माण केले जात आहेत.'

नांदेड: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये जाहिर सभा घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत देशातील पाणी समस्येवर प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा अजेंडाही सांगितले. ते म्हणाले, विचारधारा बदलली तर भारत बदलेल. भारताला बदलण्यासाठी आमचा पक्ष खूप प्रयत्न करेल. देशात लोकांची दिशाभूल केली जाते. देशात पाण्याचा मुभलक साठा आहे. आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. आपल्या देशात 1.40 लाख टीएमसी पाऊस पडतो. त्यातील अर्ध्याचे बाष्पीकरण होते. उरलेले पाण्यातील मोठा साठा वाया जातो. कोणत्याच सरकारने कधीच पाण्याचे योग्य नियोजन केले नाही.

सरकार दमदार असेल, योजना बदलल्या तर प्रत्येकाला पाणी मिळू शकते. देशात चांगले पाणी मिळत नाही, केंद्र सरकार फक्त तमाशा बघतंय. सतलज-रावीसाठी पंजाब लढतोय, गोदावरीसाठी महाराष्ट्र-कर्नाटक लढतोय, महानदीसाठी ओरिसा लढतोय. पाण्याचा मुभलक साठा आहे, देवाने आपल्याला पाणी दिलंय. पण, देशातील नागरिक पाण्यापासून वंचित आहे. योग्य नियोजन केल्यावर प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल.

पाण्याची संपत्ती देशात आहे, तरीदेखील देशातील लोकांना यासाठी त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचा पाण्याबाबत मोठा अजेंडा आहे. सरकार खोटं बोलून दिशाभूल करत आहे. त्यामुळे देशाला एक दिशा देणारे सरकार आले पाहिजे. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पाण्यासाठी कोणाकडे भीक मागायची गरज नाही, आपण योग्य नियोजन केले पाहिजे. त्यामुळेच मी म्हणतोय, देशात विचारधारा बदलली पाहिजे.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandaनंदा water shortageपाणीकपातMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण