शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

देशात पाण्याची मोठी समस्या, केंद्र सरकार फक्त तमाशा बघत आहे; मुख्यमंत्री KCR यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 17:50 IST

'आपल्या देशात पाण्याचा मोठा साठा, तरीदेखील पाण्यासाठी राज्या-राज्यांमध्ये वाद निर्माण केले जात आहेत.'

नांदेड: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये जाहिर सभा घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत देशातील पाणी समस्येवर प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा अजेंडाही सांगितले. ते म्हणाले, विचारधारा बदलली तर भारत बदलेल. भारताला बदलण्यासाठी आमचा पक्ष खूप प्रयत्न करेल. देशात लोकांची दिशाभूल केली जाते. देशात पाण्याचा मुभलक साठा आहे. आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. आपल्या देशात 1.40 लाख टीएमसी पाऊस पडतो. त्यातील अर्ध्याचे बाष्पीकरण होते. उरलेले पाण्यातील मोठा साठा वाया जातो. कोणत्याच सरकारने कधीच पाण्याचे योग्य नियोजन केले नाही.

सरकार दमदार असेल, योजना बदलल्या तर प्रत्येकाला पाणी मिळू शकते. देशात चांगले पाणी मिळत नाही, केंद्र सरकार फक्त तमाशा बघतंय. सतलज-रावीसाठी पंजाब लढतोय, गोदावरीसाठी महाराष्ट्र-कर्नाटक लढतोय, महानदीसाठी ओरिसा लढतोय. पाण्याचा मुभलक साठा आहे, देवाने आपल्याला पाणी दिलंय. पण, देशातील नागरिक पाण्यापासून वंचित आहे. योग्य नियोजन केल्यावर प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल.

पाण्याची संपत्ती देशात आहे, तरीदेखील देशातील लोकांना यासाठी त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचा पाण्याबाबत मोठा अजेंडा आहे. सरकार खोटं बोलून दिशाभूल करत आहे. त्यामुळे देशाला एक दिशा देणारे सरकार आले पाहिजे. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पाण्यासाठी कोणाकडे भीक मागायची गरज नाही, आपण योग्य नियोजन केले पाहिजे. त्यामुळेच मी म्हणतोय, देशात विचारधारा बदलली पाहिजे.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandaनंदा water shortageपाणीकपातMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण