शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

महाजनादेश यात्रेतील मुख्यमंत्र्यांची वक्तव्ये अहंकार आणि हुकूमशाही मानसिकतेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 7:26 PM

भाजपाची महाजनादेश यात्रा म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा आरोप

नांदेड : जनतेच्या दर्शनासाठी ही महाजनादेश यात्रा होती की जनतेला दर्शन देण्यासाठी ? असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला आहे. या यात्रेतील मुख्यमंत्र्यांची वक्तव्ये अहंकाराचा दर्प आणि हुकूमशाही मानसिकता दर्शविणारी होती. यात्रेच्या माध्यमातून केवळ घोषणाबाजी झाली. ही यात्रा म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेची केलेली निव्वळ धूळफेक असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनंतर सोमवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन यात्रेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. यात्रा लोकांसाठी असती तर मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद        साधला असता. त्यांची निवेदने स्वीकारली असती. मात्र जनतेचे म्हणणे ऐकून न घेता मुख्यमंत्र्यांनी यात्रेच्या माध्यमातून खोटे पण  रेटून बोलण्याचा धडाका लावला होता, असे ते म्हणाले. यात्रा येण्यापूर्वीच अनेक कार्यकर्त्यांची धडपकड करण्यात आली. काहींना नजरकैदेत ठेवण्यात आले. पोलिसांनीही याबाबत तारतम्य बाळगले नाही. धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नीला नजरकैदेत ठेवून महिलांप्रति असलेला सरकारचा दृष्टिकोनही दाखवून                              दिला. असाच लाजीरवाणा प्रकार राज्यभरात घडला. या दडपशाहीचा काँग्रेसच्या वतीने मी निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रमात एकाही महत्त्वाच्या मुद्यावर, सार्वजनिक प्रश्नावर ठोस आश्वासन दिले नाही.  नांदेडकरांचे पाणी पळविण्याचा  प्रयत्न झाला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केले नाही. आता इसापूरचे पाणी नांदेड शहराला देण्याचे सुतोवाच करुन नांदेड शहर विरुद्ध ग्रामीण असा नवा वाद निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. कसलीही माहिती न घेता याबाबत मुख्यमंत्री बोलले. इसापूरचे पाणी नांदेडला देणार असाल तर शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्नही चव्हाण यांनी केला. शासनाच्या या निर्णयामुळे यवतमाळ, हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील ६४ हजार हेक्टर सिंचनक्षेत्र कमी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

नांदेड शहर आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेडमध्ये काही घोषणा केल्या. मात्र, या घोषणा पाहिल्यानंतर मला कल्याण, डोंबिवली आणि नाशिक महापालिकेची आठवण झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधीचा निधी कल्याण, डोंबिवलीला देण्याची घोषणा याच मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र डोंबिवलीकरांना काहीही मिळाले नाही. तीच बाब नाशिकची. नाशिक दत्तक घेण्याची घोषणा करणारे मुख्यमंत्री त्यानंतर         नाशिककडे फिरकलेही नाहीत.  त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर किती विश्वास ठेवायचा? असा  सवाल चव्हाण यांनी केला. पक्षांतरावर बोलताना चव्हाण          म्हणाले की, खऱ्या अर्थाने नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची उत्तम वेळ आली आहे.

अतिरेकी रिंधापुढे पोलीस हतबलअतिरेकी असलेला रिंधा नांदेडमध्ये डॉक्टर्स, क्लासेसचालकांसह नगरसेवकांकडेही खंडणीची सर्रास मागणी करीत आहे. अशाप्रकारच्या सहा ते सात घटना मागील काही दिवसांत पुढे आल्या आहेत. कोकूलवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या मुलालाही खंडणीसाठी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र या गंभीर प्रकारानंतरही पोलीस यंत्रणा सुस्त असल्याचे दिसते. पोलिसांची भीती उरलेली नसल्यानेच रिंधासारख्या प्रवृत्ती वाढत असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्रा