शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

जवळ असतानाही शहिदांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते हे दुर्दैव : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 19:54 IST

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ आज नांदेड येथून होत आहे.

नांदेड : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात राज्यातील दोन जवान शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु असताना मुख्यमंत्री त्या ठिकाणापासून जवळच होते, परंतु ते त्या ठिकाणी गेले नाही हे दुर्दैव असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली. 

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ आज नांदेड येथून होत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा गांधी मैदानावर संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या अंत्यसंस्कारा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणापासून जवळच होते. मात्र ते अंत्यसंस्काराला गेले नाहीत हे दुर्दैव आहे. पुलवामा येथील हल्ला झाला असाच भ्याड हल्ला शिवाजी राजांच्या काळात झाला होता. त्यावेळी शिवाजी राजे इशारे देत बसले नाही, त्यांनी  शाहिस्तेखानची याची बोटे छाटली. आता नियती आपल्या पाठीशी आहे, या निवडणुकीत विजय आपलाच होणार आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

'अच्छे दिन' वर लोक हसतात प्रधानमंत्री मोदी यांनी जनतेला चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखवले. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणार होते, 15 पैसे ही आले नाही, बजेट मध्ये शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार देतो असे आश्वासन दिले. परंतु या फसव्या घोषणांना आता जनता बळी पडणार नाही. भाजपच्या काळात महागाईचा डोंगर उभा राहिला आहे. आता कोणी चांगले दिवस येतील म्हणाले तर लोक हसतात, असे खुद्द गडकरी यांनीच कबुल केले असल्याचे मुंडे म्हणाले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेChief Ministerमुख्यमंत्रीNandedनांदेडpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला