शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जवळ असतानाही शहिदांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते हे दुर्दैव : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 19:54 IST

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ आज नांदेड येथून होत आहे.

नांदेड : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात राज्यातील दोन जवान शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु असताना मुख्यमंत्री त्या ठिकाणापासून जवळच होते, परंतु ते त्या ठिकाणी गेले नाही हे दुर्दैव असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली. 

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ आज नांदेड येथून होत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा गांधी मैदानावर संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या अंत्यसंस्कारा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणापासून जवळच होते. मात्र ते अंत्यसंस्काराला गेले नाहीत हे दुर्दैव आहे. पुलवामा येथील हल्ला झाला असाच भ्याड हल्ला शिवाजी राजांच्या काळात झाला होता. त्यावेळी शिवाजी राजे इशारे देत बसले नाही, त्यांनी  शाहिस्तेखानची याची बोटे छाटली. आता नियती आपल्या पाठीशी आहे, या निवडणुकीत विजय आपलाच होणार आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

'अच्छे दिन' वर लोक हसतात प्रधानमंत्री मोदी यांनी जनतेला चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखवले. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणार होते, 15 पैसे ही आले नाही, बजेट मध्ये शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार देतो असे आश्वासन दिले. परंतु या फसव्या घोषणांना आता जनता बळी पडणार नाही. भाजपच्या काळात महागाईचा डोंगर उभा राहिला आहे. आता कोणी चांगले दिवस येतील म्हणाले तर लोक हसतात, असे खुद्द गडकरी यांनीच कबुल केले असल्याचे मुंडे म्हणाले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेChief Ministerमुख्यमंत्रीNandedनांदेडpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला