शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जवळ असतानाही शहिदांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते हे दुर्दैव : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 19:54 IST

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ आज नांदेड येथून होत आहे.

नांदेड : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात राज्यातील दोन जवान शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु असताना मुख्यमंत्री त्या ठिकाणापासून जवळच होते, परंतु ते त्या ठिकाणी गेले नाही हे दुर्दैव असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली. 

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ आज नांदेड येथून होत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा गांधी मैदानावर संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या अंत्यसंस्कारा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणापासून जवळच होते. मात्र ते अंत्यसंस्काराला गेले नाहीत हे दुर्दैव आहे. पुलवामा येथील हल्ला झाला असाच भ्याड हल्ला शिवाजी राजांच्या काळात झाला होता. त्यावेळी शिवाजी राजे इशारे देत बसले नाही, त्यांनी  शाहिस्तेखानची याची बोटे छाटली. आता नियती आपल्या पाठीशी आहे, या निवडणुकीत विजय आपलाच होणार आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

'अच्छे दिन' वर लोक हसतात प्रधानमंत्री मोदी यांनी जनतेला चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखवले. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणार होते, 15 पैसे ही आले नाही, बजेट मध्ये शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार देतो असे आश्वासन दिले. परंतु या फसव्या घोषणांना आता जनता बळी पडणार नाही. भाजपच्या काळात महागाईचा डोंगर उभा राहिला आहे. आता कोणी चांगले दिवस येतील म्हणाले तर लोक हसतात, असे खुद्द गडकरी यांनीच कबुल केले असल्याचे मुंडे म्हणाले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेChief Ministerमुख्यमंत्रीNandedनांदेडpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला