शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्ट्रक्चरल ऑडीट न केल्याने पूल कोसळला; दुर्घटनेसाठी सरकार जबाबदार असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 17:52 IST

एल्फीन्स्टनच्या घटनेनंतरही राज्य सरकारने केले दुर्लक्ष

नांदेड : एल्फिन्स्टन येथील घटनेनंतर राज्य सरकारने मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि राज्य शासन या दोघांनीही याकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे वारंवार पुल कोसळण्याच्या घटना घडत आहेत़ स्ट्रॅक्चरल ऑडीट न झाल्यामुळेच अशा घटना घडत असून याला सर्वस्वी शिवसेना आणि भाजपाचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे़

शुक्रवारी नांदेड विमानतळावर आले असताना मुंडे यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़ यावेळी मुंडे म्हणाले, आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेरही मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी केली होती़ एल्फीन्स्टनच्या घटनेनंतर राज्य सरकारनेही सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येईल असा शब्द दिला होता़ परंतु भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे पुल कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत़ अशा प्रकारच्या घटना रोखण्याची मनपातील सत्ताधारी सेना आणि राज्य सरकारातील भाजपाची जबाबदारी होती़ परंतु ही दोन्ही सरकारे असंवेदनशील आहेत़ मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे़ भाजपा मुंबईत बाहेर राहून चौकीदारी करीत आहे़ मग अशा घटना घडत असताना भाजपा काय झोपा काढीत होती काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ मुंबईत घटना घडलेली असताना शिवसेनेचा एकही मोठा पदाधिकारी त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेला नाही़ असेही मुंडे म्हणाले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेCST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाState Governmentराज्य सरकार