शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रक्चरल ऑडीट न केल्याने पूल कोसळला; दुर्घटनेसाठी सरकार जबाबदार असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 17:52 IST

एल्फीन्स्टनच्या घटनेनंतरही राज्य सरकारने केले दुर्लक्ष

नांदेड : एल्फिन्स्टन येथील घटनेनंतर राज्य सरकारने मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि राज्य शासन या दोघांनीही याकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे वारंवार पुल कोसळण्याच्या घटना घडत आहेत़ स्ट्रॅक्चरल ऑडीट न झाल्यामुळेच अशा घटना घडत असून याला सर्वस्वी शिवसेना आणि भाजपाचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे़

शुक्रवारी नांदेड विमानतळावर आले असताना मुंडे यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़ यावेळी मुंडे म्हणाले, आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेरही मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी केली होती़ एल्फीन्स्टनच्या घटनेनंतर राज्य सरकारनेही सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येईल असा शब्द दिला होता़ परंतु भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे पुल कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत़ अशा प्रकारच्या घटना रोखण्याची मनपातील सत्ताधारी सेना आणि राज्य सरकारातील भाजपाची जबाबदारी होती़ परंतु ही दोन्ही सरकारे असंवेदनशील आहेत़ मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे़ भाजपा मुंबईत बाहेर राहून चौकीदारी करीत आहे़ मग अशा घटना घडत असताना भाजपा काय झोपा काढीत होती काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ मुंबईत घटना घडलेली असताना शिवसेनेचा एकही मोठा पदाधिकारी त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेला नाही़ असेही मुंडे म्हणाले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेCST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाState Governmentराज्य सरकार