शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

स्ट्रक्चरल ऑडीट न केल्याने पूल कोसळला; दुर्घटनेसाठी सरकार जबाबदार असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 17:52 IST

एल्फीन्स्टनच्या घटनेनंतरही राज्य सरकारने केले दुर्लक्ष

नांदेड : एल्फिन्स्टन येथील घटनेनंतर राज्य सरकारने मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि राज्य शासन या दोघांनीही याकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे वारंवार पुल कोसळण्याच्या घटना घडत आहेत़ स्ट्रॅक्चरल ऑडीट न झाल्यामुळेच अशा घटना घडत असून याला सर्वस्वी शिवसेना आणि भाजपाचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे़

शुक्रवारी नांदेड विमानतळावर आले असताना मुंडे यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़ यावेळी मुंडे म्हणाले, आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेरही मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी केली होती़ एल्फीन्स्टनच्या घटनेनंतर राज्य सरकारनेही सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येईल असा शब्द दिला होता़ परंतु भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे पुल कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत़ अशा प्रकारच्या घटना रोखण्याची मनपातील सत्ताधारी सेना आणि राज्य सरकारातील भाजपाची जबाबदारी होती़ परंतु ही दोन्ही सरकारे असंवेदनशील आहेत़ मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे़ भाजपा मुंबईत बाहेर राहून चौकीदारी करीत आहे़ मग अशा घटना घडत असताना भाजपा काय झोपा काढीत होती काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ मुंबईत घटना घडलेली असताना शिवसेनेचा एकही मोठा पदाधिकारी त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेला नाही़ असेही मुंडे म्हणाले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेCST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाState Governmentराज्य सरकार