शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

नांदेड जिल्ह्यातील पेठवडजमध्ये ‘बाटली’ उभीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 1:01 AM

नांदेड: कंधार तालुक्यातील पेठवडज येथे दारुची बाटली आडवी का उभी? यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली़ मतदार यादीतून ऐनवेळी वगळलेली नावे, तारखेत अनेकवेळा केलेला बदल अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक प्रक्रियाच आक्षेपांच्या भोवºयात सापडली आहे़ प्रशासनाने मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्याचा दाखला देत उभ्या बाटलीचे समर्थन केले आहे़

ठळक मुद्देअनेक महिलांची नावे गायब, तारखेतही अनेकवेळा बदल मतदान प्रक्रियाच आक्षेपांच्या भोवºयात

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: कंधार तालुक्यातील पेठवडज येथे दारुची बाटली आडवी का उभी? यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली़ मतदार यादीतून ऐनवेळी वगळलेली नावे, तारखेत अनेकवेळा केलेला बदल अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक प्रक्रियाच आक्षेपांच्या भोवºयात सापडली आहे़ प्रशासनाने मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्याचा दाखला देत उभ्या बाटलीचे समर्थन केले आहे़जवळपास सहा हजार लोकसंख्या असलेले कंधार तालुक्यातील पेठवडज हे गाव बाजारपेठेसाठी प्रसिद्ध़ परंतु वीटभट्टी आणि ऊसतोडीसाठी गावातील अनेक कुटुंब दरवर्षी स्थलांतर करतात़ त्यामुळे दारुबंदीसाठी दिवाळीपूर्वी मतदान घ्यावे, अशी मागणी गेल्या सात वर्षांपासून दारु विक्रीच्या विरोधात असलेल्या शिक्षिका जनाबाई भालेराव यांनी केली होती़, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले़ २० मे रोजी ग्रामसभेत ठराव झाला होता़ १५२९ महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन त्यावेळी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले़ त्यानंतर २३ जुलै रोजी मतदान घ्यावे असे पत्र काढण्यात आले़ उत्पादन शुल्कच्या नियमानुसार यावर एक महिन्यात कार्यवाही करणे अपेक्षित होते़परंतु मतदान घेण्याच्या सात दिवसांपूर्वी तशी नोटीस काढणेही आवश्यक आहे़ परंतु प्रशासनाने २१ नोव्हेंबरला पत्र काढले अन् २३ नोव्हेंबरला मतदान घेण्याचे ठरले, परंतु प्रशासकीय अडचण होण्याची चिन्हे दिसताच ९ डिसेंबरला मतदान घेण्याचे निश्चित करण्यात आले़ तत्पूर्वी स्वाक्षºयांची पडताळणी करण्यात आली़ पडताळणीला ६२९ महिला उपस्थित होत्या़ त्यामध्ये चुडाजी वाडीच्या महिलाही होत्या़ परंतु मतदानाच्या दिवशी मात्र मतदार यादीत त्यांची नावे नसल्याची बाब पुढे आली़ प्रशासनाने २४२० महिला मतदान करतील असे जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात या यादीतून मयत, लग्न होवून माहेरी गेलेल्या, स्थलांतरित या महिलांची नावे समाविष्ट होती़ प्रशासनाने सर्वेक्षण करुन मतदान यादीतून ही नावे गाळण्याची गरज होती, परंतु ती नावे तशीच ठेवून पात्र असलेल्या चुडाजी वाडीच्या महिलांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले़आजघडीला गावात सर्वेक्षण केल्यास १२०० पेक्षा अधिक महिला नसतील असा दावाही शिक्षिका भालेराव यांनी केला आहे़त्यामुळे मतदार यादीतील हा गोंधळ शेवटपर्यंत सुरुच होता़ मतदानाच्या वेळी काही मद्यपींनी गोंधळ घातल्यानंतर मतदान न करताच अनेक महिलांना माघारी पाठविण्यात आले़ असा आरोपही भालेराव यांनी केला आहे़ एकूणच बाटलीसाठी झालेली ही मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवºयात सापडली आहे, परंतु त्यामध्ये दारुबंदीसाठी लढणाºया महिलांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे़ दारुबंदी होईपर्यंत लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार महिलांनी केला़लढा सुरुच राहणारदारुबंदीच्या विरोधात पेठवडजमध्ये २०११ पासून महिलांचा लढा सुरु आहे़ दारुमुळे आजपर्यंत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत़ दारुबंदीसाठी महिला पुढे आल्या़ परंतु प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नाही़ मतदार याद्यामध्ये गोंधळ होता़ मतदानाच्या तारखाही बदलण्यात आल्या़ त्यामुळे गोंधळात भरच पडली़ परंतु त्यामुळे खचून न जाता दारुबंदीचा हा लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार शिक्षिका भालेराव यांनी केला़