शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची लढत वंचितसोबतच; विरोधीपक्ष नेताही वंचितचाच दिसेल : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 14:40 IST

शरद पवारांनी काळाची पावले ओळखावीत

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत भविष्य असल्याचे  वाटत नसल्यानेच ते पक्ष सोडत आहेत़ निकाल पाहिल्यानंतर वंचितची टीम ए तर काँग्रेसची टीम बी झाल्याचे स्पष्ट

नांदेड : शरद पवार मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्यावर मी भाष्य करणार नाही, मात्र त्यांचा पक्ष अगोदरच ठराविक भागात मर्यादित होता़  अलिकडील दिवसात पंतप्रधान मोदींच्या कामावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपामध्ये येत आहेत़ या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत भविष्य असल्याचे  वाटत नसल्यानेच ते पक्ष सोडत आहेत़ पवारांनी ही काळाची पावले ओळखली पाहिजेत अशी टिप्पणी करीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची खरी लढत वंचित बहुजन आघाडीसोबत असेल़ निवडणुकीनंतर विरोधी पक्ष नेताही वंचितचाच दिसेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केले़

शनिवारी सकाळी नांदेड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते़  यावेळी कामगार मंत्री सभांजी पाटील निलंगेकर, भाजपा प्रदेश महासचिव आ़ सुजितसिंह ठाकूर, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, खा़ प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष आ़ राम पाटील रातोळीकर, शहर महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आदी उपस्थित होते़ आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाची शंभर टक्के युती राहिल, असे स्पष्टीकरणही फडणवीस यांनी यावेळी दिले़ नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावर शिवसेनेने आक्षेप घेतल्याबाबत विचारले असता, नारायण राणे हे सध्या भाजपमध्येच आहेत, ते भाजपाचे विद्यमान खासदार आहेत़  त्यांचा पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा विषय आहे़ याबाबतचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेवून करण्यात येईल असे ते म्हणाले़ लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीवर भाजपाचा बी टीम असल्याचा आरोप करीत होती, परंतु लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर वंचितची टीम ए तर काँग्रेसची टीम बी झाल्याचे स्पष्ट झाले आहे़  विधानसभा निवडणुकीतही आमचा खरा सामना वंंचितसोबतच रंगेल असे ते म्हणाले़ 

पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली़ केंद्रिय गृहनिर्माण मंत्रालयाने नुकतीच तीन लाख घरांना मंजुरी दिली आहे़ यातील सव्वालाख घरे महाराष्ट्रासाठी आहेत़  आजवर राज्यातील ११ लाख २० हजार बेघरांना आवास योजनेच्या माध्यमातून घरे दिल्याचे सांगत या योजनेअंतर्गत पुढील वर्षीपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल याबरोबरच २०११ च्या बेसलाईन सर्वेत ज्यांची नावे आलेली नाहीत, नव्याने सर्वे करून अशांना या यादीत समाविष्ट करून घेण्यात येत आहे़ या सर्वांनाही २०२२ पर्यंत हक्काची घरे मिळतील असे त्यांनी सांगितले़ बाभळी बंधाऱ्याचे पाणी तेलंगणात वाहून जात आहे़ याचा कोणताही फायदा महाराष्ट्रातील भागाला मिळत नाही़ आॅक्टोबरअखेर गेट  टाकणे चुकीचेच आहे़ आम्ही याबाबत सर्वोच्च न्यायालयात जात आहोत़  दुसरीकडे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा