शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

राज्यघटना बदलण्याचा भाजपाचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:20 IST

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी अ‍ॅड. प्र्रकाश आंबेडकर यांना आघाडीसोबत घेण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत केले. प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी ५ ते ६ वेळा भेटी दिल्या मात्र अ‍ॅड. आंबेडकर हे आघाडीसोबत आले नाहीत. याची मनापासून खंत आहे.

ठळक मुद्देजयभीमनगरमध्ये अशोक चव्हाण यांचा घणाघात काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ देण्याचे केले आवाहन

नांदेड : धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी अ‍ॅड. प्र्रकाश आंबेडकर यांना आघाडीसोबत घेण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत केले. प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी ५ ते ६ वेळा भेटी दिल्या मात्र अ‍ॅड. आंबेडकर हे आघाडीसोबत आले नाहीत. याची मनापासून खंत आहे. भारतीय संविधान बदलू इच्छिणारे भाजपचे सरकार हटवण्याची गरज असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.नांदेडमध्ये जयभीमनगर, गंगाचाळ या भागात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी, रिपाइं, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, मित्रपक्षाचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आल्या. या सभेस माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आ. शरद रणपिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भाजप सरकार आरएसएसच्या विचारावर चालणारे आहे. भारतीय संविधान बदलण्याचे आरएसएसचे प्रयत्न सुरुच आहेत. भाजप सरकारच्या काळात संविधान जाळण्यात आले. संविधान जाळणारे, संविधानाचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आल्याचेही चव्हाण म्हणाले. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या जातीयवादी सरकारने नांदेड जिल्ह्याचा कोट्यवधींचा दलितवस्ती विकास निधी रोखला. त्यामुळे या सरकारला आता अब की बार बस कर यार म्हणण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.माजी मंत्री हंडोरे यांनी देशात भारतीय राज्यघटनेऐवजी मनुस्मृती अंमलात आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला. त्याचवेळी आरएसएस, विश्व हिंदू परिषद व सनातनचे पदाधिकारी देशाला हिंदू राष्ट्र करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे राज्यघटना बदलू इच्छिणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारच्या काळात महागाईचा आलेख वाढला आहे. सीबीआय, आरबीआय यासारख्या संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्याचाही ते म्हणाले. आ. रणपिसे यांनी जिल्ह्याचाच नव्हे, तर राज्याचा विकास करण्याची ताकद अशोक चव्हाण यांच्यामध्ये असल्याचे सांगितले. भाजपा या जातीयवादी सरकारच्या काळात मागासवर्गीयांच्या अनेक योजना बंद पडल्या. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मतांचे विभाजन होऊ देऊ नका, मत विभाजनासाठीच वंचित बहुजन आघाडी व सपा-बसपा निवडणुकीच्या रिंगणात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी सुभाष रायबोले, रमेश गोडबोले यांचेही भाषण झाले.सभेस किशोर स्वामी, विरेंद्रसिंघ गाडीवाले, विलास धबाले, मोहिनी येवनकर, गणपतराव धबाले, विजय येवनकर, उमेश पवळे, संगीता डक, ज्योती रायबोले, नागनाथ गड्डम, दुष्यंत सोनाळे, संदीप सोनकांबळे, व्यंकट मुदीराज, प्रफुल्ल सावंत, रुपेश यादव, संतोष मानधने, बाळासाहेब देशमुख, प्रशांत सोनकांबळे, अमित वाघ, श्रावण वाघमारे, शेख फयुम, मो. सोहेल आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :nanded-pcनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस