शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटना बदलण्याचा भाजपाचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:20 IST

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी अ‍ॅड. प्र्रकाश आंबेडकर यांना आघाडीसोबत घेण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत केले. प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी ५ ते ६ वेळा भेटी दिल्या मात्र अ‍ॅड. आंबेडकर हे आघाडीसोबत आले नाहीत. याची मनापासून खंत आहे.

ठळक मुद्देजयभीमनगरमध्ये अशोक चव्हाण यांचा घणाघात काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ देण्याचे केले आवाहन

नांदेड : धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी अ‍ॅड. प्र्रकाश आंबेडकर यांना आघाडीसोबत घेण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत केले. प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी ५ ते ६ वेळा भेटी दिल्या मात्र अ‍ॅड. आंबेडकर हे आघाडीसोबत आले नाहीत. याची मनापासून खंत आहे. भारतीय संविधान बदलू इच्छिणारे भाजपचे सरकार हटवण्याची गरज असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.नांदेडमध्ये जयभीमनगर, गंगाचाळ या भागात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी, रिपाइं, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, मित्रपक्षाचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आल्या. या सभेस माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आ. शरद रणपिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भाजप सरकार आरएसएसच्या विचारावर चालणारे आहे. भारतीय संविधान बदलण्याचे आरएसएसचे प्रयत्न सुरुच आहेत. भाजप सरकारच्या काळात संविधान जाळण्यात आले. संविधान जाळणारे, संविधानाचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आल्याचेही चव्हाण म्हणाले. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या जातीयवादी सरकारने नांदेड जिल्ह्याचा कोट्यवधींचा दलितवस्ती विकास निधी रोखला. त्यामुळे या सरकारला आता अब की बार बस कर यार म्हणण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.माजी मंत्री हंडोरे यांनी देशात भारतीय राज्यघटनेऐवजी मनुस्मृती अंमलात आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला. त्याचवेळी आरएसएस, विश्व हिंदू परिषद व सनातनचे पदाधिकारी देशाला हिंदू राष्ट्र करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे राज्यघटना बदलू इच्छिणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारच्या काळात महागाईचा आलेख वाढला आहे. सीबीआय, आरबीआय यासारख्या संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्याचाही ते म्हणाले. आ. रणपिसे यांनी जिल्ह्याचाच नव्हे, तर राज्याचा विकास करण्याची ताकद अशोक चव्हाण यांच्यामध्ये असल्याचे सांगितले. भाजपा या जातीयवादी सरकारच्या काळात मागासवर्गीयांच्या अनेक योजना बंद पडल्या. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मतांचे विभाजन होऊ देऊ नका, मत विभाजनासाठीच वंचित बहुजन आघाडी व सपा-बसपा निवडणुकीच्या रिंगणात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी सुभाष रायबोले, रमेश गोडबोले यांचेही भाषण झाले.सभेस किशोर स्वामी, विरेंद्रसिंघ गाडीवाले, विलास धबाले, मोहिनी येवनकर, गणपतराव धबाले, विजय येवनकर, उमेश पवळे, संगीता डक, ज्योती रायबोले, नागनाथ गड्डम, दुष्यंत सोनाळे, संदीप सोनकांबळे, व्यंकट मुदीराज, प्रफुल्ल सावंत, रुपेश यादव, संतोष मानधने, बाळासाहेब देशमुख, प्रशांत सोनकांबळे, अमित वाघ, श्रावण वाघमारे, शेख फयुम, मो. सोहेल आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :nanded-pcनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस