शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

भाजपाकडे २३७ आमदार, ज्यांना महायुतीत राहायचे नाही, ते बाहेर पडतील; अतुल सावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:23 IST

तांडा वस्ती निधी वाटपावरून नांदेड जिल्ह्यातील हदगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम यांनी उघड नाराजी व्यक्त करत पालकमंत्री अतुल सावे यांना पत्र लिहिले होते.

नांदेड : पाच वर्षे आमच्याकडे २३७ आमदार आहेत, आम्ही महायुतीत काम करतो. ज्यांना युतीत राहायचे त्यांनी रहावे ज्यांना नसेल रहायचे ते बाहेर पडतील, असे खणखणीत प्रत्युत्तर पालकमंत्री अतुल सावे यांनी शिवसेना आमदाराच्या नाराजी पत्रावर विचारलेल्या प्रश्नाला दिले. मंत्री सावे यांच्या भूमिकेमुळे शिवसेना आमदारांना धक्का बसला आहे. भाजपला आता शिवसेनेची गरज नाही, असे सूचक विधान त्यांनी दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.

पालकमंत्री अतुल सावे हे सोमवारी जिल्हा दौऱ्यावर हाेते. त्यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या बैठका तसेच पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली. तद्नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी वार्तालाप केला. तांडा वस्ती निधी वाटपावरून नांदेड जिल्ह्यातील हदगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम यांनी उघड नाराजी व्यक्त करत मंत्री सावे यांना पत्र लिहिले होते. तसेच भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून आमदारांमध्ये असलेली नाराजी पुढे आली होती.

दरम्यान, पालकमंत्री सावे हे सोमवारी दौऱ्यावर असताना त्यांना आमदारांच्या नाराजीबाबत विचारले असता त्यांनी तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठीचे प्रस्ताव आमदारांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविले अपेक्षित आहे. ज्यांचे प्रस्ताव आले, त्यांना निधी दिलेला आहे. यापूर्वी मी स्वत आमदार तुषार राठोड यांना १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी दिलेला असल्याचेही त्यांनी सांगितले. तर कदम हे पहिल्यांदाच निवडून आलेत, त्यांना प्रस्ताव कुणामार्फत येतात किंवा कोण मंजुरीला पाठवतो, याची पडताळणी करावी, अगोदर त्याची माहिती घ्यावी, असा सल्लाही आमदार बाबुराव कदम यांना दिला. तांडा वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून येत असतात, तक्रारी करणाऱ्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन बसावे. त्यांच्या भागातील तांड्याचे प्रस्ताव आणि कामाबाबत त्यांच्यामार्फत प्रस्ताव पाठवावेत. आमदार राठोड यांना विचारा गतवर्षी किती निधी आला होता, हे तर नवीन आमदार आहेत, त्यांचे प्रस्ताव अजून आले नाहीत असे सावे म्हणाले.

आमदार पाटलांच्या पुढाकारातून गैरसमज दूर!तांडा वस्ती सुधार योजनेतील निधी वाटपावरून आमदार बाबूराव कदम यांनी पालकमंत्री सावे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तद्नंतर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मंत्री सावे यांनीदेखील शिवसेना आमदाराच्या पत्रावरून विचारलेल्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले. दरम्यान, हा वाद वाढू नये, आमदाराची भूमिका ही जनसामान्यांची भावना असून प्रत्येक मतदार संघाला समान न्याय मिळावा, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घ्यावी या अनुषंगाने मंत्री सावे यांच्याशी चर्चा करून आमदार कदम यांचे झालेले गैरसमज दूर करत दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घेतला. तसेच एकाच मतदारसंघात अधिक निधी जाऊ नये, त्यामुळे कोणी तरी एकच व्यक्ती निधीचे नियोजन करत आहे, असा समज आमदारांमध्ये पसरत आहे. यामध्ये पालकमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालावे, अशी मागणीदेखील आमदार पाटील यांनी केली.

टॅग्स :Atul Saveअतुल सावेNandedनांदेडShiv SenaशिवसेनाBJPभाजपा