शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
2
“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
3
"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार
4
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
5
भारतीय 'सबीह खान' यांची Apple मध्ये जादू! २३४ कोटींचे वार्षिक पॅकेज; कुठे झालंय शिक्षण?
6
भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी?
7
कारचा चक्काचूर, कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांना अपघात; दोघे जागीच दगावले
8
२५ वर्षे सत्ता, पण मूलभूत प्रश्न सुटले नाही?; शिंदेसेनेचे उत्तर, विरोधकांना आयतीच संधी, नेते म्हणाले…
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना शुभ-फलदायी, पैशांचा ओघ राहील; ४ राशींना संघर्ष, संमिश्र काळ!
10
पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
11
आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 
12
"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
13
हिस्ट्री शीटर ते थेट निवडणुकीच्या रिंगणात; अंगावर २५ गुन्हे असलेल्या सज्जू मलिकला राष्ट्रवादीकडून उमेदवारी
14
दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ
15
भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
16
'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
17
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
18
महापालिका रणांगणात मनसेची 'नवी फळी'; २६ उमेदवार कोट्यवधी संपत्तीचे मालक
19
पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला कंडक्टरने एसटीतून हायवेवर उतरवले!
20
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडे २३७ आमदार, ज्यांना महायुतीत राहायचे नाही, ते बाहेर पडतील; अतुल सावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:23 IST

तांडा वस्ती निधी वाटपावरून नांदेड जिल्ह्यातील हदगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम यांनी उघड नाराजी व्यक्त करत पालकमंत्री अतुल सावे यांना पत्र लिहिले होते.

नांदेड : पाच वर्षे आमच्याकडे २३७ आमदार आहेत, आम्ही महायुतीत काम करतो. ज्यांना युतीत राहायचे त्यांनी रहावे ज्यांना नसेल रहायचे ते बाहेर पडतील, असे खणखणीत प्रत्युत्तर पालकमंत्री अतुल सावे यांनी शिवसेना आमदाराच्या नाराजी पत्रावर विचारलेल्या प्रश्नाला दिले. मंत्री सावे यांच्या भूमिकेमुळे शिवसेना आमदारांना धक्का बसला आहे. भाजपला आता शिवसेनेची गरज नाही, असे सूचक विधान त्यांनी दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.

पालकमंत्री अतुल सावे हे सोमवारी जिल्हा दौऱ्यावर हाेते. त्यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या बैठका तसेच पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली. तद्नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी वार्तालाप केला. तांडा वस्ती निधी वाटपावरून नांदेड जिल्ह्यातील हदगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम यांनी उघड नाराजी व्यक्त करत मंत्री सावे यांना पत्र लिहिले होते. तसेच भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून आमदारांमध्ये असलेली नाराजी पुढे आली होती.

दरम्यान, पालकमंत्री सावे हे सोमवारी दौऱ्यावर असताना त्यांना आमदारांच्या नाराजीबाबत विचारले असता त्यांनी तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठीचे प्रस्ताव आमदारांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविले अपेक्षित आहे. ज्यांचे प्रस्ताव आले, त्यांना निधी दिलेला आहे. यापूर्वी मी स्वत आमदार तुषार राठोड यांना १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी दिलेला असल्याचेही त्यांनी सांगितले. तर कदम हे पहिल्यांदाच निवडून आलेत, त्यांना प्रस्ताव कुणामार्फत येतात किंवा कोण मंजुरीला पाठवतो, याची पडताळणी करावी, अगोदर त्याची माहिती घ्यावी, असा सल्लाही आमदार बाबुराव कदम यांना दिला. तांडा वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून येत असतात, तक्रारी करणाऱ्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन बसावे. त्यांच्या भागातील तांड्याचे प्रस्ताव आणि कामाबाबत त्यांच्यामार्फत प्रस्ताव पाठवावेत. आमदार राठोड यांना विचारा गतवर्षी किती निधी आला होता, हे तर नवीन आमदार आहेत, त्यांचे प्रस्ताव अजून आले नाहीत असे सावे म्हणाले.

आमदार पाटलांच्या पुढाकारातून गैरसमज दूर!तांडा वस्ती सुधार योजनेतील निधी वाटपावरून आमदार बाबूराव कदम यांनी पालकमंत्री सावे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तद्नंतर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मंत्री सावे यांनीदेखील शिवसेना आमदाराच्या पत्रावरून विचारलेल्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले. दरम्यान, हा वाद वाढू नये, आमदाराची भूमिका ही जनसामान्यांची भावना असून प्रत्येक मतदार संघाला समान न्याय मिळावा, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घ्यावी या अनुषंगाने मंत्री सावे यांच्याशी चर्चा करून आमदार कदम यांचे झालेले गैरसमज दूर करत दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घेतला. तसेच एकाच मतदारसंघात अधिक निधी जाऊ नये, त्यामुळे कोणी तरी एकच व्यक्ती निधीचे नियोजन करत आहे, असा समज आमदारांमध्ये पसरत आहे. यामध्ये पालकमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालावे, अशी मागणीदेखील आमदार पाटील यांनी केली.

टॅग्स :Atul Saveअतुल सावेNandedनांदेडShiv SenaशिवसेनाBJPभाजपा