शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

पाकी काळाडोह, जाकापूर साठवण तलावालाही उपलब्धता प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:19 IST

रेणापूर-सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे व पिंपळढव येथील साठवण तलावाची निर्मिती करणे यासाठीचे शासनाचे दोन दिवसांपूर्वीच पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता भोकर तालुक्यातील पाकी काळाडोह व जाकापूर साठवण तलावाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले पाणी उलब्धता प्रमाणपत्रही मिळाले आहे.

ठळक मुद्देभोकरवासियांना दिलासा अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यशभोकर तालुक्याचा पाणीप्रश्न लागणार मार्गी

नांदेड : रेणापूर-सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे व पिंपळढव येथील साठवण तलावाची निर्मिती करणे यासाठीचे शासनाचे दोन दिवसांपूर्वीच पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता भोकर तालुक्यातील पाकी काळाडोह व जाकापूर साठवण तलावाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले पाणी उलब्धता प्रमाणपत्रही मिळाले आहे. मागील काही वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांचे हे यश असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले असून, यामुळे भोकर तालुक्याचा पाणीप्रश्न मिटेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.भोकर तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी अशोकराव चव्हाण यांच्यासह आ. अमिताताई चव्हाण मागील काही वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये पाणी उपलब्धता प्रमाणपत्र हाच मोठा अडसर ठरत होता. यासाठी वेगवेगळ्या पातळ्यावर लढाई लढण्यात आली. राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. या आराखड्यामध्ये सर्वात आधी मध्य गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे २९.८१ टीएमसी पाणी मिळाले. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.२९.८१ टीएमसी पाण्यापैकी १७ दलघमी पाणी भोकर तालुक्याच्या सुधा उपखोºयाच्या वाट्याला आले. त्यातून भोकर तालुक्यातील अनेक लघु मध्यम प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेणापूर-सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे व पिंपळढव आणि दिवशी येथील साठवण तलाव निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नाशिकच्या नियोजन व जल विज्ञान विभागाकडून नुकतेच मिळाले.हे प्रमाणपत्र अशोकराव चव्हाण यांनी पिंपळढव येथील एका कार्यक्रमात ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंचांना सुपूर्द केले. गावकऱ्यांनीही या निर्णयाचे पेढे वाटून स्वागत केले. या घटनेस २४ तास उलटले नाहीत तोच पाकी काळाडोह व जाकापूर येथील साठवण तलावासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवून घेण्यात यश मिळाले आहे.

मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्याला पाण्याची उपलब्धता रहावी, यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी मोठे काम केले आहे़ सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझाही अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे़ या पाठपुराव्याला यश मिळाले असून नुकत्याच मिळालेल्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्रामुळे भोकर तालुका अधिक सुजलाम होईल, असा विश्वास वाटतो़ -अशोक चव्हाण

 

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण