शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

राज्यात सत्ता बदल होताच शिवसेनेचे १० खासदार भाजपात येणार: प्रताप पाटील चिखलीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 13:14 IST

आमदारांसोबतच खासदारांवर देखील आपल्या कंपूत ठेवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान

नांदेड: शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांचा वेगळा गट स्थापन करून राज्यात सत्ताबदल करण्यास बंडखोर एकनाथ शिंदे सरसावले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठे विधान करत त्यानंतर भाजपची रणनीती उघड केली आहे. राज्यात सत्ता बदल होताच शिवसेनेचे १० खासदार भाजपात दाखल होतील असा दावा चिखलीकर यांनी केला आहे. 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यात पुन्हा एकदा सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर अचानक शिवसेनेचे प्रभावशाली नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत गुजरात गाठले. तेथून शिवसेनेच्या काही आमदारांसह त्यांनी आसाममधील गुवाहाटी गाठली आहे. शिंदे यांच्या बंडखोरीने सेनेत उभी फुट पडली आहे. तब्बल ४० आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या आमदारांचा वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन करण्याचा शिंदे यांचा हेतू आहे. यासर्व राजकीय उलाढालीवर भाजपाकडून अद्याप कोणीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. कदाचित अजित पवार यांच्या सोबत फसलेल्या पहाटेच्या शपथविधीमुळे भाजपा काळजी घेत आहे. शिंदे यांचा वेगळा गट निर्माण झाल्यानंतर भाजपा आपली भूमिका स्पष्ट करेल असे दिसत आहे. दरम्यान, शिंदे यांच्या बंडानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर सातत्याने होणाऱ्या बैठकातून त्यांची व्यूहरचना तयार असल्याचे संकेत मिळत आहेत.

राज्यात सत्ता बदल करणे यासोबतच सेनेला मोठे खिंडार पडण्याची तयारी शिंदे यांनी केलेली आहे. माजी खासदार-आमदार, पदाधिकारी यांचा त्यांच्या गटाला पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपा यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर राज्यात आणखी मोठी राजकीय उलाढाल होऊ शकते. तसे संकेत नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले आहेत. राज्यात सत्ता बदल झाल्यास शिवसेनेचे १० खासदार भाजपात प्रवेश करतील असा दावा खा. चिखलीकर यांनी केला आहे. या दाव्यामुळे आमदारांसोबतच खासदारांवर देखील आपल्या कंपूत ठेवण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे राहिले आहे. 

बंडखोर कल्याणकरांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही नांदेड येथील शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे आहेत. दरम्यान,  कल्याणकर यांच्या कार्यालयावर संतप्त शिवसैनिक हल्ला करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार चिखलीकर यांनी आमदार कल्याणकर यांची पाठराखण केली. कल्याणकर हे सेना भाजपचे उमेदवार होते. त्यांच्यासाठी भाजपाने ही मेहनत घेतली. हिंदुत्वाच्या मुद्यावर ते शिंदे सोबत गेले आहेत. त्यामुळे कल्याणकर यांच्या केसाला धक्का लागणार नाही याची हमी खासदार चिखलीकर यांनी घेऊन एकप्रकारे शिवसैनिकांना इशारा दिला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाPratap Patil Chikhalikarप्रताप पाटील चिखलीकरNandedनांदेडMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ