शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बरडशेवाळा येथे अंगणवाडीसमोरच उरकला अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:50 IST

बरडशेवाळा गावात दोन जिल्हा परिषद शाळा व पाच अंगणवाड्या आहेत़ त्यापैकी नांदेड-नागपूर महामार्गावर रस्त्यालगत एक जिल्हा परिषद शाळा आहे़ बाजूलाच अंगणवाडी आहे़ केवळ १५ फूट अंतरावर असलेल्या अंगणवाडीसमोर १० सप्टेंबर रोजी एक अंत्यविधी उरकण्यात आला़ यामुळे सकाळी विद्यार्थ्यांना बाजूच्या रस्त्याने जावे लागले़ विशेष म्हणजे, गावात स्मशानभूमी आहे़

सुनील चौरे।लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : बरडशेवाळा गावात दोन जिल्हा परिषद शाळा व पाच अंगणवाड्या आहेत़ त्यापैकी नांदेड-नागपूर महामार्गावर रस्त्यालगत एक जिल्हा परिषद शाळा आहे़ बाजूलाच अंगणवाडी आहे़ केवळ १५ फूट अंतरावर असलेल्या अंगणवाडीसमोर १० सप्टेंबर रोजी एक अंत्यविधी उरकण्यात आला़ यामुळे सकाळी विद्यार्थ्यांना बाजूच्या रस्त्याने जावे लागले़ विशेष म्हणजे, गावात स्मशानभूमी आहे़पूर्वी तळ्याच्या काठी अंत्यविधी होत असत़ परंतु, लोकवस्ती वाढल्याने ही स्मशानभूमी गावाच्या मध्यभागी झाली़ जागा रिकामी असल्याने (गायरान) येथे शाळेची मोठी इमारत आहे़ समोर एरिगेशनचे कार्यालय आहे़ त्यामुळे येथे कॅम्पची शाळा झाली़ परंतु स्मशानभूमी हटविण्यात आली नाही़शाळेला संरक्षक भिंत केली तरी हा विषय बंद होतो़ तसा ठराव ग्रामपंचायतने एप्रिल महिन्यात घेतला होता़ परंतु, अद्यापही भिंत उभारण्यात आली नाही़ गावपुढारी या जागेत अतिक्रमण करून रस्त्यालगत प्लॉट विक्री करण्याचा गोरखधंदा करीत असल्याने ते संरक्षक भिंतीला विरोध करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे़खरे तर येथे मोठे तळे आहे़ शाळेच्या व अंगणवाडीला लागून त्यामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षकांना विशेष लक्ष ठेवावे लागते़ अपघात होण्याची दाट शक्यता आहे़ तर दुसरीकडे पाण्याची भीती़ त्यामध्ये भर म्हणून स्मशानभूमी अंगणवाडीलगतच आहे़विद्यार्थी म्हणजे गावची संपत्ती़ त्यांचे शिक्षण, आरोग्य याची काळजी गावावर असतेच़ पण या गंभीर प्रकाराला कोणी लक्षात घेत नाही़ जिल्हा परिषद शाळेमध्ये खाजगी शाळा भरतात काय? शाळेच्या प्रांगणात अंत्यविधी उरकतात काय? तरीही प्रशासन याकडे गंभीरपणे बघण्यास तयार नाही़

याविषयी अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका चव्हाण म्हणतात, हा प्रकार गंभीर असून अंगणवाडीच्या मुलाचे वय ३ ते ६ वयोगटातील असते़ पाठीमागे तळे व समोर स्मशानभूमी़ यामुळे विद्यार्थी, पालकांत भीतीचे वातावरण असते़

शाळेचे मुख्याध्यापक एम़एस़ कदम म्हणतात, हा प्रकार गंभीर आहे़ त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे़ ग्रामपंचायतचे सहकार्य मिळत नाही़ जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरिबांचे मुलबाळं शिक्षण घेतात़ त्यांच्यासाठी कोणी लक्ष देत नाहीत़ यापूर्वी ‘लोकमत’ने १० एप्रिलच्या अंकात हा विषय लावून धरला होता; पण पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ च आहे़

शालेय समितीचे अध्यक्ष श्रीधर मस्के यांनी याविषयी खंत व्यक्त केली़ विद्यार्थ्यांचे वय खेळणे, बागडण्याचे आहे़ या वयात अंत्यविधीच्या घटना डोळ्यांसमोर होणे म्हणजे त्यांच्या बालपणावर विपरीत परिणाम होतो, असे मानसशास्त्र सांगते़ त्यामुळेच घरी कोणाचा मृत्यू झाल्याने आपण मुलांना स्मशानभूमीत नेत नाही़ परंतु येथील विद्यार्थ्यांना मात्र अंत्यविधी ‘लाईव्ह’ बघायला मिळतो़

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाStudentविद्यार्थी