शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी २८२ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 6:49 PM

नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपये प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्दे शासनाने नुकसानीपोटी ६ हजार रुपये प्रतिहेक्टर ऐवजी १० हजार रुपये प्रतिहेक्टर मदत देण्याचा निर्णय घेतला.जिल्ह्याची एकूण मागणी आता ५६५कोटी १३ लाख ३६हजार ३५० रुपये इतकी झाली आहे.

नांदेड : अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात ५ लाख ६४ हजार ५१९ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण नुकसान पाहता २८२ कोटी ५६ लाख ६९ हजार ३५० रुपयांची गरज आहे. 

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पूरपरिस्थिती यामुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत दिली जाईल असे शासनाने घोषित केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत वितरीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात जिरायत पिकांचे ५ लाख ६३ हजार ४०९ हेक्टर क्षेत्रातील, बागायत ७०० हेक्टर आणि फळ पिकांचे ४०९.४५ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले होते. सर्वाधिक फटका हा हदगाव तालुक्याला बसला होता. हदगाव तालुक्यात ६५ हजार ६२१ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधित झाली होती. त्या खालोखाल लोहा तालुक्यात ५२ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रात, किनवट तालुक्यात ४८हजार ४७२, देगलूर तालुक्यात ४४ हजार ८२९, मुखेड तालुक्यात ४८ हजार ७९५ हेक्टर तसेच इतर तालुक्यात एकूण ५ लाख ६४ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले होते. 

या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपये प्राप्त झाले आहे. यामध्ये नांदेड तालुक्याला १० कोटी ३३ लाख ४४ हजार रुपये, अर्धापूर ८ कोटी ५१ लाख ४ हजार रुपये, कंधार २० कोटी ७६ लाख ७९ हजार रुपये, लोहा २६ कोटी ३६ लाख १७ हजार रुपये, बिलोली १६ कोटी २० लाख ८९ हजार रुपये, नायगाव १९ कोटी १९लाख ६४ हजार रुपये, देगलूर २२ कोटी ४१ लाख ४४हजार रुपये, मुखेड २४ कोटी ४० लाख ६४ हजार रुपये, भोकर १९ कोटी ५७ लाख ६७ हजार रुपये, मुदखेड ७ कोटी २९ लाख ८४ हजार रुपये, धर्माबाद १० कोटी २३ लाख ५९ हजार रुपये, उमरी १४ कोटी ३७ लाख ६७ हजार रुपये, हदगाव ३२ कोटी ८१ लाख ४ हजार रुपये, हिमायतनगर १५ कोटी ९९लाख२९हजार रुपये, किनवट २४ कोटी २३ लाख ६३ हजार रुपये आणि माहूर तालुक्याला ९ कोटी ८३ लाख ७७ हजार रुपये मदतीपोटी पहिल्या टप्प्यात मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आता बँकेकडे लागल्या आहेत. पैसे जमा होण्याची प्रतीक्षा आहे.

१८० कोटींची मागणी वाढलीजिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मदतीसाठी प्रचलित शासन निर्णयानुसार शासनाकडे ३८४ कोटी ८० लाख १२ हजार रुपयांची मागणी केली होती. शासनाने नुकसानीपोटी ६ हजार रुपये प्रतिहेक्टर ऐवजी १० हजार रुपये प्रतिहेक्टर मदत देण्याचा निर्णय घेतला. बागायत व फळपिकांसाठीही मदत वाढवून देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याची मागणी आता १८०कोटींनी वाढली आहे. पहिल्या टप्प्यात ५०टक्के रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. जिल्ह्याची एकूण मागणी आता ५६५कोटी १३ लाख ३६हजार ३५० रुपये इतकी झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडagricultureशेती